Wednesday, 18 February 2026

देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर

राज्यसभेच्या 37 जागांवर 16 मार्च रोजी निवडणूक


निवडणूक आयोगाने बुधवारी 10 राज्यांमधील राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक घेतली जाईल. रिक्त होणाऱ्या जागांपैकी 12 जागा एनडीएच्या ताब्यात आहेत, तर 25 जागांवर विरोधकांचे वर्चस्व आहे. 

सर्वाधिक महाराष्ट्रातील 7, तामिळनाडूतील 6 आणि पश्चिम बंगाल-बिहारमधील प्रत्येकी 5 जागांवर निवडणूक घेतली जाईल. शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. 

16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी केली जाईल. राज्यसभेच्या या ३७ जागा येत्या एप्रिल महिन्यात रिक्त होणारा आहेत. महाराष्ट्र (७), ओडिशा (४), तमिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), आसाम (३), बिहार (५), छत्तीसगड (२), हरियाणा (२), हिमाचल प्रदेश (१) आणि तेलंगणा (२) अशी या जागांची संख्या आहे. 

या जागांसाठी २०२० मध्ये द्विवार्षिक निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी आसाम, बिहार, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठे यश मिळवले होते. महाराष्ट्रात या जागा भाजपा, दोन्ही गट एकत्र असलेली शिवसेना, दोन्ही गट एकत्र असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात विभागलेल्या होत्या. तमिळनाडूमध्ये डीएमकेच्या नेतृ्त्वाखालील युतीने बहुतांश जागा जिंकल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने आणि ओडिशामध्ये बिजू जनता दल यांचा दबदबा दिसून आला होता.

कसे असेल वेळापत्रक?

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, या निवडणुकींचे नोटिफिकेशन २६ फेब्रुवारी रोजी जारी केले जाईल. तर अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ही ५ मार्च असणार आहे. अर्जाची छाननी आणि ही ६ मार्च रोजी केली जाईल आणि अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख ९ मार्च असणार आहे. तर १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ पर्यंत मतदान होईल आणि त्यानंतर ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. निवडणुकीची प्रक्रिया ही २० मार्चपर्यंत पूर्ण केली जाईल.

अशी होते राज्यसभा निवडणूक

राज्यसभा खासदारांसाठी निवडणुकीची प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा खूप वेगळी आहे. राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात, म्हणजे जनता नाही तर आमदार त्यांना निवडतात. निवडणुका दर दोन वर्षांनी होतात, कारण राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे आणि त्याचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभा जागांची एकूण संख्या 245 आहे. यापैकी 233 जागांवर अप्रत्यक्षपणे निवडणुका होतात आणि 12 सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी किती मतांची आवश्यकता असते, हे आधीच ठरलेले असते. मतांच्या संख्येची गणना एकूण आमदारांची संख्या आणि राज्यसभा जागांच्या संख्येच्या आधारावर होते. यात एका आमदाराच्या मताचे मूल्य 100 असते.

बॅलेट पेपरवर खास पेनाने मतदान होणार

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, मतदान करताना केवळ रिटर्निंग ऑफिसरने दिलेल्या निश्चित मानकाचा व्हायलेट रंगाचा स्केच पेनच वापरला जाईल. इतर कोणत्याही पेनाचा वापर वैध मानला जाणार नाही. आयोगाने म्हटले आहे की, निवडणुका शांततापूर्ण आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी निरीक्षक नियुक्त केले जातील. निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये EVM आणि VVPAT बाबत जनजागृती मोहीम देखील सुरू केली आहे. आयोगाच्या मते, 5 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 1.20 लाखांहून अधिक लोकांनी डेमो कॅम्पमध्ये भाग घेतला. 1.16 लाखांहून अधिक लोकांनी मॉक मतदान केले. 10 फेब्रुवारीपर्यंत 29 हजारांहून अधिक मतदान केंद्रांची ठिकाणे मोबाइल डेमो व्हॅनद्वारे कव्हर केली गेली आहेत. ही मोहीम EVM डेमो सेंटर आणि मोबाइल व्हॅनद्वारे राबवली जात आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 


रोहित पवार यांच्या नजरेतून घातपाताचा दृष्टीकोन; विलिनीकरणाचे गुपित; मार्गदर्शक कागदपत्रांचा गुलदस्त्यातील अर्थ; राजकीय सल्लागार कंपनीवरील आकस

विमान अपघात दुर्घटनेवरील संशयकल्लोळ 



पुणे- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेला विमान अपघात की घातपात याबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे नवनवीन दावे-प्रतिदावे, शंका उपस्थित केल्या जात आहेत. विशेषतः कर्जत जमखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार सातत्याने या विषयी चौकशी कशी करावी, चौकशीची व्याप्ती कशी असावी, त्यामध्ये कोणत्या व्यक्तींचा सहभाग असावा वगेरे याबाबत मागणी करीत आहेत याबरोबरच त्यांचा आरोपांचा थेट रोख दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे राहिलेला दिसून येत आहे. तसेच सरकारवर थेट आरोप करण्याचे टाळून यंत्रणामधील दोष दर्शवून चौकशी बाबत शंका उपस्थित करताना दिसून येत आहे. 

१३ व्या दिवसापासून विमान अपघात की घातपात याबाबत पत्रकार परिषदांचा धडाका आमदार रोहित पवार यांनी लावला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या घटनेबाबत दादांचे चाहते व सामान्य नागरिकांच्या मनात संशयाचे काहूर माजले आहे. खंर तर अशा संवेदनशील विषयावर उघडपणे आपले मत व्यक्त करताना अनेक मात्तबर कच खाताना देखील दिसून येत आहे. संशयाचे भूत महाराष्ट्राच्या किती दिवस मानगुटीवर राहणार आहे हे येणाऱ्या काळातील यंत्रणांच्या चौकशी अहवाल जाहीर होईल तो पर्यन्त तरी अशीच स्थिती राहण्याची शक्यता वाटते. 

घटनाक्रम आणि घटना पाहता या संशयकल्लोळ मध्ये राजकीय पतंगबाजी होताना देखील दिसून यंते आहे. गंभीर विषयावरील पत्रकारपरिषदेत राजकीय आरोपांनी लक्ष्य केले जात असल्याचे देखील आढळून येत असल्याने घटनेच्या चौकशीची व्याप्ती पुढील काळात व्यापक होईल अशी शक्यता निर्माण होऊ पाहत आहे. विमान अपघात की घातपात प्रकरणी तांत्रिक प्रश्न वगळता राजकीय आरोप व वक्तव्य करुन चौकशीची दिशा पुढील काळात भरकटत जाणार तर नाहीना अशी शंका वाटणे स्वाभाविक आहे.

रोहित पवार यांच्या नजरेतून घातपाताचा एक दृष्टीकोन समजून घ्या. 

त्यांच्या मते विलिनीकरणाची जी चर्चा सुरु होती, ती दादा आणि आम्हालाच माहिती आहे. एक चर्चा अशी होती की, एनडीए बरोबर आम्ही सत्तेत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नसावी. दुसरा दुष्टीकोन असा आहे की, दादाचं एनडीएमध्ये राहणार नाहीत. दादाचं बाहेर निघून रस्त्यावरची सामान्य लोकांची लढाई आमच्या सोबत लढतील हा दृष्टीकोन एक गटाला आवडला नसावा. यात राजकारण, यात घातपात असं म्हणायचं असेल तर दोन दृष्टीकोनांपैकी एक दृष्टीकोन कुठलातरी असावा, त्या दृष्टीकोनाला पाठिंबा देणारा एक गट असू शकतो असं रोहित पवार म्हणाले.

आता दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण होणार याबाबत अजित दादांबरोबर चर्चा काय झाली हे दादा आणि आम्हालाच माहिती आहे असे रोहित पवार यांचे म्हणणे आहे मग रोहित पवार यांना काय चर्चा झाली माहीत असताना ते सत्य उघड का करीत नाहीत असा प्रश्न सामान्यांना पडतो आहे. त्यांनी विलिनीकरणाचे दोन कारणांची शक्यता वर्तविली एक एनडीए बरोबर आम्ही सत्तेत जाणार आणि दादाचं एनडीएमध्ये राहणार नाहीत बाहेर निघून रस्त्यावरची सामान्य लोकांची लढाई आमच्या सोबत लढतील असा जर तर वरील अंदाज व्यक्त केला हे कशासाठी करीत आहेत. चौकशीच्या विषयात विलीनीकरण विषय घुसडून राजकीय आरोप करणे आणि दुसऱ्या गटाला दोषी धरुन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करणे कुठतरी खटकत आहे. 

मार्गदर्शक कागदपत्रांच्या माध्यमातून 200 पट ताकद लावली जाणार होती पण 50 पटच ताकद लावली! 

मार्गदर्शक कागदपत्रांचा अर्थ मात्र गुलदस्त्यात 

मार्गदर्शक कागदपत्रांच्या माध्यमातून 200 पट ताकद लावली जाणार होती पण 50 पटच ताकद लावली गेली आणि 150 पट ताकद का लावली नाही? असा सवाल रोहित पवार यांनी विमान दुर्घटना विषयी चौकशी मध्ये प्रश्न उपस्थित केला. आता याची चौकशी कोणती यंत्रणा करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मार्गदर्शक कागदपत्रांचा अर्थ मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवला आहे. पण कदाचित जे जिल्हा परिषदेतले अजितदादांच्या पक्षातले जे कोणी उमेदवार असतील, त्यांना हा मुद्दा कळेल असाही त्यांनी संदर्भ दिला. 

मार्गदर्शक कागदपत्रांचा अर्थ निवडणुकीतील आर्थिक रोकड पुरवठा!

रोहित पवार यांचा सरळ राष्ट्रवादीच्या गटातील प्रमुख नेत्यांवर आरोप आहे कि, अजित दादा जिल्हा परिषद, पंचायत समिति निवडणुक 200 पट ताकद लावली जाणार होती पण 50 पटच ताकद लावली गेली आणि 150 पट ताकद का लावली नाही? म्हणजे २०० पट आर्थिक रोकड पुरवठा केला जाणार होता त्यामध्ये कपात करुन केवळ 50 पटच प्रत्यक्षात वाटप केले उर्वरित 150 पट आर्थिक रोकड पुरवठा केला नाही तो गेला कोठे असा भ्रष्टाचार, गफला बाबत थेट आरोप आहे. 

रोहित पवार यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीतील प्रमुख नेते आणि राजकीय सल्लागार कंपनी 

विमान अपघात दुर्घटनेवर शंका कुशंका आणि त्या संशयाच्या वादळात राष्ट्रवादीतील प्रमुख नेते आणि राजकीय सल्लागार कंपनी निगडीत आरोपांचे काहूर यामुळे चौकशीला दिशा देण्याचा प्रयत्न होतो आहे का अशी शंका आता व्यक्त होताना दिसून येत आहे. पहिल्या पत्रकार परिषदेत दादांना उशीर झाला आणि ते रोडने एवजी विमान प्रवासाला त्यांना भाग पाडले असावे अशी पहिली शंका उपस्थित केली. मग पूर्व विदर्भातील एका नेत्याने फाईल वर आजच सही झाली पाहिजे त्याकरिता वेळ गेला कि घालविला ही एक शंका घेतली मग ती कोणती फाईल, नेता कोणता, वगेरे-वगेरे, दुसरी शक्यता वर्तविली कि त्या दिवशी राजकीय सल्लागार कंपनीचे कंत्राट कायम ठेवण्यास विरोध होता त्यावरच चर्चा झाली कि काय मग विरोध होता म्हणून विपरीत घडवले ही एक शंका घेऊन नुकतेच त्या कंपनीने २ विमाने खरेदी केलेली आहेत वगेरे-वगेरे आरोप केले. उघड उघड टार्गेटवर राष्ट्रवादीतील प्रमुख नेते आणि राजकीय सल्लागार कंपनी आहे हे सर्वसामान्यांना जाणवले. तांत्रिक कारणांवरुन तातडीने घेतलेला शपथविधी व अन्य राजकीय निर्णय खलबते आणि राजकीय सल्लागार कंपनीचा सहभाग कुठ तरी खटकत असावा अशी देखील शंका सर्वसामान्यांना जाणवते. 

सरकारवर थेट आरोप करणे का टाळत आहे 

विमान अपघात दुर्घटनेवर शंका कुशंका व्यक्त करताना रोहित पवार सरकारवर थेट आरोप करणे का टाळत आहे असाही काहींना प्रश्न पडतो. एकीकडे सरकारच्या चौकशीवर अविश्वास व्यक्त करताना दिसून येत आहे, स्वतः खासगी गुप्तचर संस्थेकडून तपास करुन घेत आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या ट्रोलर वर बरस्ताना दिसून आले. किंबविना राज्यात राजकीय भूकंप होणार अशी पोस्ट केल्याचा दावा करुन सदर ती पोस्ट हटवली याबाबत गंभीर आरोप देखील केला. पेड ट्रोलर आहेत मी घाबरत नाही असेही वक्तव्य केली. यावरून  सत्ताधारी पक्षावर रोष आहे परंतु थेट टीका करणे टाळत आहेत मग याचे कारण काय असावे याबाबतही सर्वसामान्यांनामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसून येत आहे. रोहित पवार यांच्या राजकीय आरोपांना भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे परंतु दादांच्या विमान अपघात चौकशीचा फोकस अन्यत्र वळविणे ही बाब खूप धक्कादायक आणि चाहत्यांना वेदनादायक वाटते आहे. 

रोहित पवार यांच्या आरोपांचा व घडामोडींचा घटनाक्रम

दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुर्दैवी दुर्घटना अपघात; उपमुख्यमंत्री अजित दादांचे अपघाती निधन


दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी तृणमूल कॉँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याकडून अपघात नव्हे घातपात असा आरोप 


दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जी यांच्या आरोपांचे खंडन अपघातच असून राजकारण नको तर जयंत पाटील यांच्याकडून विलीनीकरण बाबत भाष्य 


दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे अंत्यसंस्कार


दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी उर्वरित विधी संपन्न


दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजीच उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्रा पवार शपथ घेणार वृत्त, तर खासदार सुप्रिया सुळे अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना


दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी जेष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री शपथविधी बाबत कल्पना नाही असे वक्तव्य, पार्थ पवार भेटीला, नंतर रोहितसह भेटीचा फोटो व्हायरल, खलबत झाल्याचा बोलका फोटो  


दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली


दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी पवार कुटुंबीय मधून रोहित पवार यांचे ट्विट मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..! अशा भावना व्यक्त 


दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वरळी (मुंबई) येथील घरी भेट देऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्याचे फोटोसह रोहित पवार यांचे ट्विट 


दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी निष्ठावान कार्यकर्ते सुदाम बोडके (रा. ढिकाबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांनाही धक्का बसला आणि यातच त्यांचं दुर्दैवी निधन झाल्याने त्यांच्या घरी सांत्वनपर भेट घेतल्याचे फोटोसह रोहित पवार यांचे ट्विट 


दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट पुढच्या काळात चौकशी होईलही आणि आम्हीही त्यासाठी पाठपुरावा करु 


दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं आज पोरकी झालीत आणि त्यांच्या डोक्यावर पुन्हा छत्र धरण्याची खूप अवघड जबाबदारी आमच्यासारख्या नवीन पिढीवर आलीय.


दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुण सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्याचे रोहित पवार यांचे ट्विट


दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने अत्यंत वाईट पद्धतीने काढून टाकले. ही बाब अत्यंत संतापजनक, याबाबत चौकशी करून सरकारने संबंधितांवर कारवाई करावी.  


दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय... छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…!


दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरील चौथऱ्यावर जाऊन आज पुन्हा एकदा दादांना श्रद्धांजली अर्पण केली…


दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट या दुःखद घटनेमुळं नियोजन करुनही पवार कुटुंबाला कोणत्याही उमेदवाराच्या प्रचाराला जाता आलं नाही, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. हीच_ती_योग्य_वेळ आणि मा. अजितदादांचे विचार पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खरी #श्रद्धांजली आहे!


दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पिंपळी (बारामती) इथं सहकुटुंब मतदानाचा पवित्र हक्क बजावून मा. अजितदादांच्या विचारांना श्रद्धांजली अर्पण केली. 


दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट आदरणीय पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित असून त्यांना ॲडमिट करण्यात आलं नाही तर ते डॉक्टरांच्या निगराणीखाली एका रुममध्ये आहेत. जेष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल


दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार


दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांची पहिली पत्रकार परिषद विमान अपघाताबाबत प्रेझेंटेशन, विविध शंका उपस्थित व चौकशी कक्षा वाढवविण्याची मागणी,  सर्व शंकांचं निरसन झालं पाहिजे, तोपर्यंत आम्ही याबाबत पाठपुरावा करत राहू, 


दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट अपघाती निधनाच्या चौकशीचा विषय हा आमच्यासाठी महत्त्वाचा असून तो योग्य दिशेने जाण्यासाठी माझ्या काही बैठका सुरु आहेत. त्यामुळं १२ फेब्रुवारी रोजी राजकीय विषयावर घेण्यात येणारी पत्रकार परिषद पुढे ढकलावी लागतेय...


दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांची दुसरी दिल्ली येथे पत्रकार परिषद, मुंबईतील प्रेझेंटेशन पुनरप्रसारण, गृहमंत्री यांच्यासह अनेकांना भेटण्याची वेळ मागणी परंतु वेळ दिली नसल्याचे स्पष्ट 


दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजीच उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार व नेते गृहमंत्री यांच्यासह पंतप्रधान यांच्याशी भेटी गाठी मात्र रोहित पवार यांचा वेगळा अजेंडा 


दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. पायलटवर कोणाचा दबाव होता का ? याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष #तपास_झालाच_पाहिजे.


दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSRकंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.


दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट गृहमंत्री अमित शाह साहेब, नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू जी तसेच DGCA ची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भेट होऊ शकली नाही. त्यामुळं प्रेझेंटेशनसह आमच्या सर्व शंका गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री आणि DGCAयांना ई-मेल पाठवून या अपघाताबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची विनंती 


दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत.


दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट दुर्दैवी अपघातानंतर २० दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आला नाही. केवळ VSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर उशीर होत नाही ना? की कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.  आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येत आहे त्यावरून मी ५ दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे. असो, आम्ही मात्र दादांचा अपघात की घात याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही! (दोन दिवसात पुन्हा पत्रकार परिषदेत भेटू)


दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांचे ट्विट न्यायालयीन कामासाठी मुंबईत न्यायालयात गेलो असताना तिथं काही वकील मंडळी भेटली आणि अजितदादांच्या अपघाताचा विषय तडीस नेऊन सत्य जनतेपुढं आणण्याची विनंती त्यांनी केली.

दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांची तिसरी पत्रकार परिषद  दुसऱ्यांदा सविस्तर प्रेझेंटेशनसह पत्रकार परिषद घेऊन हा तपास निष्पक्ष होण्यासाठी देशाबाहेरील दोन एजन्सीची मदत घेण्याची आणि देशाचे व या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी राज्याचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते, कुटुंबातील आणि पक्षातील प्रतिनिधी आणि काही तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी केली. कंपनीची संशयास्पद भूमिका, कंपनीच्या मालकाचे राजकीय लागेबांधे, विमान कंडीशन, पायलटची मनःस्थिती, ब्लॅक बॉक्समधील डेटाबाबत निर्माण झालेल्या शंका,


राजकीय आरो

दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांची पहिली पत्रकार परिषद विमान अपघाताबाबत प्रेझेंटेशन यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप 

दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांची पत्रकार परिषद अपघाताबाबत प्रेझेंटेशन यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप 

राष्ट्रवादी विलीनीकरण बाबत वक्तव्य 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, अंकुश काकडे, शशिकांत शिंदे यांच्याकडून दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण ठरले होते व त्याची तारीख १२ होती असे वक्तव्य 

राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेत्यांकडून विलीनीकरण बाबत ठरल्याचे माहिती नाही हे स्पष्ट. 

विलीनीकरण बाबत मुख्यमंत्री यांची प्रतिक्रिया त्यावर आक्षेप घेऊन संबंध काय अशी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून उलट प्रतिक्रिया

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरण बाबत विषय संपला असल्याचे स्पष्ट करुन कोणीही याबाबत बोलू नये असे वक्तव्य 

रोहित पवार यांच्याकडून मात्र याबाबत विषय सातत्याने चर्चिला जाणे. इडि कारवाई बाबतही भाष्य, 

दुर्घटनेच्या चौकशीच्या मागणी पत्रकार परिषदेत दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित पवार यांच्याकडून पुन्हा वक्तव्य


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 




Friday, 30 January 2026

राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेत बदल; ५ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; ९ ला मतमोजणी



उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

मा. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात २८ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करतील, आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होईल. संबंधित ठिकाणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 





Wednesday, 28 January 2026

अजित दादांच्या अकाली दुर्घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला; जिल्हा परिषदा निवडणुकां पुढे ढकलण्याची शक्यता!

निवडणुकांवर दुख:चे सावट; सर्व पक्षांकडून प्रचार स्थगित 


बारामतीजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या दुर्दैवी दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 2026 च्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. अजित दादांच्या अकाली दुर्घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वच सुन्न झाले असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून नेतृत्व हरपल्याने पोरके झाल्याची भावना निर्माण झालेली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका आजपासून सुरु होणार होता मात्र या दुर्घटनेमुळे निवडणुकांवर दुख:चे सावट असून प्रक्रियेतील सहभागाचा विचार करु शकत नाहीत. सर्व राजकीय पक्षांकडून प्रचार स्थगित करण्यात आलेला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जिल्हा परिषदा निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झालेली असून याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. 


वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव हे सातारा जिल्ह्यातील लोणंद गावचे रहिवासी

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख विदीप जाधव (PSO),पिंकी माळी आणि सुमित कपूर अशी करण्यात आली आहे. विमानाचे वैमानिक कॅप्टन साहिल मदन (पायलट-इन-कमांड) आणि फर्स्ट ऑफिसर हे होते. मुंबई पोलीस दलातील 2009 बॅचचे कॉन्स्टेबल विदीप जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. विदीप जाधव हे सातारा जिल्ह्यातील लोणंद गावचे रहिवासी होते. जाधव हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर तसेच सहकाऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. 

पिंकी माळी कोण आहेत? 

पिंकी माळी ही शिवकुमार माळी यांची मुलगी होती. ती अपघातावेळी अजितदादांसोबत विमानात उपस्थित होती. क्रु मेंमर म्हणून ती कार्यरत होती.  गेल्या ५ वर्षापासून पिंकी माळी क्रु मेंमर म्हणून काम करत होती. याआधी अजित पवारांसोब ३ वेळा प्रवास केला होता. पिंकी माळी ही प्रायव्हेट विमानामध्ये नेहमी राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यासोबत क्रु मेंमर म्हणून प्रवास करायची..पिंकी माळीचे पालक झाले भावूकपिंकी माळीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ' पहाटे अजितपवारांसोबत बारामतीला जाणार असल्याचं तिने रात्री मला फोनवर सांगितलं. तेच शेवटचं बोलणं झालं.' तिने याआधी तीन वेळा अजितदादांसोबत विमानात प्रवास केला होता.

उमद्या नेत्याच्या अकाली मृत्यूने राज्याच्या राजकारणात असंख्य प्रश्न निर्माण

अजित अनंतराव पवार हे नाव राज्याच्या राजकारणात जवळपास चार दशकांहून अधिक काळ केंद्रस्थानी राहिले. सहकारी साखर कारखान्यात संचालक म्हणून १९८२ मध्ये त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. राज्यात विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले. मात्र या उमद्या नेत्याच्या, विमान अपघातातील अकाली मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकीकरण, पक्षाचे नेतृत्व असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काम होत असेल तर हो सांगून, तडक कार्यकर्त्याचे काम जागेवर करणार, अन्यथा स्पष्टपणे नमूद करणार हा अजित पवार यांचा कामाचा खाक्या. पहाटे सहा वाजल्यापासून अधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी हे नित्याचे. अनेक वेळा सामान्य नागरिक राजकारण्यांना दूषणे देतो, मात्र या व्यक्ती किती तास काम करतात, समाजासाठी किती वेळ देतात याचा विचार करत नाही. पुणे  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद १९९१ मध्ये त्यांच्याकडे आले. पुढे सोळा वर्षे या पदावर ते होते. लोकसभेवर १९९१ मध्ये बारामती या पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून विजयी झाले. पुढच्याच वर्षी राज्य मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली. बारामतीमधून सात वेळा चढत्या मताधिक्याने ते विधानसभेवर गेले. सभोवती कार्यकर्त्यांची वर्दळ, बोलण्यात हजरजबाबीपणा यामुळे राज्याच्या राजकारणात विशेषत: ग्रामीण भागात त्यांची लोकप्रियता कायम राहिली. मोठे संघटन उभे करूनही मुख्यमंत्रीपद हुकल्याची हुरहूर त्यांच्या समर्थकांत आहे. अजितदादांनी त्यांचे काका शरद पवार यांच्या समवेत राजकीय क्षेत्रात काम केले. मात्र २३ नोव्हेंबर २०१९ ला त्यांनी बंड करत, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र हे अल्पकाळ टिकले. ते पुन्हा स्वगृही परतले. मात्र पुन्हा २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी पक्षातून बाहेर पडत सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते सहभागी झाले. त्यांच्याबरोबर बहुसंख्य आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. अजित पवार भाजपबरोबर गेल्याने त्यांच्यावर टीका झाली. हा वैचारिक संघर्ष होता. मात्र सत्तेबरोबर राहिल्याने मतदार संघातील तसेच कार्यकर्त्यांची कामे होतात. अशी धारणा त्यांच्याबरोबर गेलेल्या अनेकांची होती. विचारांपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन महत्त्वाचा हेच सूत्र यातून पुढे आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना फटका बसला. सुनिल तटकरे यांच्या रूपाने त्यांचा एकमेव खासदार विजयी झाला. दादांच्या पत्नी सुनेत्राताई बारामतीमधून लोकसभेला सुप्रिया पवार यांच्याविरोधात पराभूत झाल्या. पवार कुटुंबातील राजकीय संघर्षात हा त्यांना धक्का होता. विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांनी भरपाई करत राज्यात तिसऱ्या क्रमांकाच्या जागा निवडून आणल्या. भाजपशी संघर्ष करून लाभ नाही हे जाणून, समन्वयाची भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ठेवली. अर्थात वैचारिक तडजोड केली जाणार नाही हे देखील नमूद केले. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर फारसा परिणाम झाला नाही. विधासभेला बारामतीमधून विक्रमी मताधिक्य घेत मतदारसंघावरील पकड सिद्ध केली. विधानसभेला शदर पवार गटाची कामगिरी खराब झाली. महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले. विरोधाची धार कमी झाली. त्यातूनच पुढे नगरपालिकांपाठोपाठ महापालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची अनेक ठिकाणी आघाडी झाली. यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. आता अजितदादांच्या अकाली मृत्यूनंतर विलीनीकरण आणि नेतृत्वाचा मुद्दा पुढे आला आहे. राज्यात अजितदादांच्या पश्चात पक्षाचे नेतृत्व कोणाकडे या प्रश्नांच्या उत्तरासाठी पुढचे काही महिने महत्त्वाचे ठरतील. यात भाजपची भूमिका निर्णायक ठरेल. एका उमद्या नेत्याच्या अकाली मृत्यूने राज्याच्या राजकारणात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. 

======

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 


Thursday, 22 January 2026

Pune ZP Election 2026 ; लोणी काळभोर जिल्हा परिषद गटातून भाजपच्या पूनम गायकवाड यांना उमेदवारी

पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठीच्या  ८५३  तर, तेरा पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठीच्या १४८२ उमेदवारी अर्ज दाखल


पुणे - भारतीय जनता पार्टीने लोणी काळभोर-कदमवाकवस्ती-वडकी जिल्हा परिषद गट आणि लोणी काळभोर व कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. लोणी काळभोर गटातून पूनम गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. लोणी काळभोर पंचायत समिती गणातून श्वेता कमलेश काळभोर तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातून ज्ञानेश्वर नामुगडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

पुणे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१९ जागांसाठी १८०६ जणांनी तब्बल २३३५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत‌. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज इंदापूर तर, सर्वात कमी अर्ज वेल्हे तालुक्यात दाखल झाले आहेत.  पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समित्यांच्या १४६ मिळून २१९ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दि. १६ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. काल (बुधवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जांमध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठीच्या  ८५३  तर, जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठीच्या १४८२ अर्जांचा   समावेश आहे. जिल्हा परिषद गटांसाठी ६४१ जणांनी ८५३ तर पंचायत समित्यांच्या गणांसाठी ११६५ जणांनी १४८२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत‌. जिल्हा परिषद गटांसाठी ३७४ पुरुष तर, २६७ महिलांनी तर, पंचायत समित्यांसाठी ६४४ पुरूष आणि ५२१ महिलांनी उमेदवारी अर्ज केले असल्याचे जिल्हा परिषद निवडणूक जिल्हा समन्वयक व रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीने लोणी काळभोर-कदमवाकवस्ती-वडकी जिल्हा परिषद गट आणि लोणी काळभोर व कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवार जाहीर केली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसने या अगोदरच लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी शीतल कांबळे, लोणी काळभोर पंचायत समिती गणातून रेश्मा काळभोर, तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातून अमोल टेकाळे यांना उमेदवारी दिली आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने या गटातील अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे. त्यामुळे या गटात खरी लढत या दोन्ही पक्षांमध्ये होणार आहे.
 
राष्ट्रवादीने उमेदवारी नकारल्यानंतर नाराज झालेल्या उमेदवार अनीता गवळी, भिसे व हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर यांच्या वतीने एक उमेदवार असे मिळून आघाडी करणार आहेत. अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. परंतु, लोणी काळभोर जिल्हा परिषद गटाची निवडणूक दुरंगी, तिरंगी की बहुरंगी होईल? याचे अंतिम चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

लोणी काळभोर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच पूर्व हवेलीतील ग्रामीण राजकारणाला चांगलेच उधाण आले आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच इच्छुकांनी गावोगावी प्रचार सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. चारपैकी दोन जिल्हा परिषद गट सर्वसाधारण व इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी राखीव असल्याने अनेक प्रस्थापित नेत्यांनी या गटांकडे लक्ष केंद्रीत केले असून, यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. पूर्व हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेचे लोणी काळभोर, थेऊर, कोरेगाव मूळ व उरुळी कांचन असे चार गट आहेत. तर पंचायत समितीचे लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, आव्हाळवाडी, कोरेगाव मूळ, केसनंद, उरुळी कांचन व सोरतापवाडी असे आठ गण आहेत. निवडणूक प्रक्रियेला गती मिळताच चारही गटांत उमेदवारीसाठीची चुरस वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे अनेक गट व गणांत प्रभावी उमेदवार असल्याने महायुतीत या पक्षाला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. मजबूत बुथ स्तरीय संघटन आणि शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांचा मतदारसंघ असल्याने भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तर माजी आमदार अशोक पवार यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची मानली जात आहे. एकूणच, निवडणूक जाहीर होताच तालुक्यातील ग्रामीण राजकारण तापले असून, लढत तुल्यबळ होण्याची शक्यता आहे.

थेऊर गट ओबीसीसाठी राखीव तर कोरेगाव मूळ गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला असल्याने या दोन्ही ठिकाणी प्रस्थापित नेते थेट मैदानात उतरले आहेत. पूर्व हवेली भागात राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे वर्चस्व असले तरी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. शिंदेसेना व उद्धवसेनेचीही काही भागांत ताकद आहे, तर काँग्रेस अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेप्रमाणेच राष्ट्रवादी (अजित पवार गट) व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यातील युतीचा पॅटर्न ग्रामीण निवडणुकीतही राबविला जाण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेसाठी थेऊर गटातून आरोग्यदूत युवराज काकडे यांच्या पत्नी पल्लवी काकडे, उद्योजक संदेश आव्हाळे यांच्या पत्नी कोमल आव्हाळे, तर कोरेगाव मूळ गटातून सुरेखा हरगुडे इच्छुक असून अर्ज दखल केलेले आहेत. लोणी काळभोर गटातून शीतल कांबळे, अनिता गवळी, तर उरुळी कांचन गटातून जितेंद्र बडेकर, जीवन शिंदे, शंकर बडेकर आदींनी अर्ज दखल केलेले आहेत. पंचायत समितीच्या थेऊर व कोरेगाव मूळ गणांतही मोठी चुरस असून, इच्छुकांनी प्रचार सुरू केला आहे. थेऊर गणातून सिद्धांत सचिन तुपे, संग्राम मच्छिंद्र कोतवाल, योगेश दत्तात्रय काकडे, तर कोरेगाव मूळ गणातून उद्योजक कृषिराज ऊर्फ मनोज दत्तात्रय चौधरी, पेठचे माजी सरपंच सूरज चौधरी आणि माजी सरपंच मंगेश कानकाटे आदींनी अर्ज दखल केलेले आहेत. उरुळी कांचन गणातून सारिका लोणारी, सुषमा चव्हाण, कोमल कांबळे, तर सोरतापवाडी गणातून भाजपचे नेते सुदर्शन चौधरी, राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे जिल्हा युवकाध्यक्ष व शिंदवणेचे माजी सरपंच अण्णा महाडिक, भाजपच्या पूजा सणस, काका कुंजीर आदींनी अर्ज दखल केलेले आहेत. वाडेबोल्हाई गणातून वंचित बहुजन आघाडीकडून दिपाली केतन निकाळजे  यांनी अर्ज दखल केलेले आहेत.

पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिति निवडणुकीत नाराजांकडून पक्षांतराची लाट!

पुणे - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.  उमेदवारी नाकारल्याने निर्माण झालेल्या नाराजीचे रूपांतर थेट पक्षांतरामध्ये होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वच पक्षांतून दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश झाले आहेत. आता उमेदवारी अर्ज माघारीनंतर खरी लढत स्पष्ट होणार आहे. वेळू पंचायत समिती गणात भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अशोक वाडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत थेट उमेदवारी अर्ज दाखल केला.

कामथडी- भोंगवली जिल्हा परिषद गटात भाजपकडे मुलासाठी उमेदवारी मागूनही नकार मिळाल्याने के. डी. सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांचा मुलगा महादेव सोनवणे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. मनसेचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष दसवडकर यांचे बंधू अंकुश दसवडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर व त्यांचे पुत्र व माजी उपसभापती अनंता दारवटकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीच्या माजी सभापती संगीता प्रकाश जेधे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रामदास गोळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात, तर राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष प्रशांत रानवडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यांच्या पत्नी पायल रानवडे यांना माण गणातून उमेदवारी मिळाली.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे यांचा भाजपमध्ये प्रवेश; वीर-भिवडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांना काँग्रेसची उमेदवारी बेलसर-माळशिरस गटातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कैलास इंगळे यांचा भाजपमध्ये प्रवेश. त्यांचा मुलगा अजय इंगळे यांना भाजपकडून उमेदवारी. 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील-ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश लुमेवाडी गणात हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते शिवाजी मोहिते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज निमगाव केतकी येथील गोरख आदलिंग यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून भाजपमध्ये प्रवेश, ॲड. सचिन राऊत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश; खडकी-देऊळगाव गटातून उमेदवारी पाटस गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापती आशा शितोळे यांचे पती नितीन शितोळे यांचा भाजपमध्ये प्रवेश केला. 

टाकळी हाजी गटातील राजेंद्र गावडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश, रांजणगाव सांडस गटाच्या माजी सदस्या रेखा मंगलदास बांदल यांचा लोकशाही क्रांती आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, निमगाव म्हाळुंगी येथील माजी सरपंच हनुमंत काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष सोडून ऐनवेळी भाजपची रांजणगाव सांडस, पंचायत समिती गणातून उमेदवारी स्वीकारली. राहुल रणदिवे यांना रांजणगाव सांडस पंचायत समिती गणातून शिवसेनेची उमेदवारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सारिका करपे यांना तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस गटातून शिवसेनेची उमेदवारी, भाजपचे विजय रणसिंग यांना रांजणगाव सांडस पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील सुजाता पवार यांना मांडवगण फराटा-वडगाव रासाई गटातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी, पेरणे- लोणीकंद गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले प्रदीप भाऊ कंद यांनी उमेदवारी अर्ज भरला.

सोरतापवाडी गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार संजय उर्फ काका महादेव कुंजीर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली. कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगावचे माजी सरपंच सुरज भालचंद्र चौधरी यांना भाजपची उमेदवारी जाहीर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख मंगेश काकडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून आळे- पिंपळवंडी जिल्हा परिषद गटाकडून उमेदवारी मिळवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख माउली खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. खंडागळे यांच्या पत्नीला बोरी गटातून, तर काकडे यांना पिंपळवंडी गटातून उमेदवारी मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका युवती अध्यक्ष अक्षदा मांडे-पानसरे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना ओतूर- धालेवाडी गटातून जिल्हा परिषदेची शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच अजिंक्य घोलप यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पत्नी नीलम घोलप यांना शिवसेनेची पंचायत समिती तांबे गणातून उमेदवारी दिली आहे. भाजपचे मंडल अध्यक्ष महेंद्र सदाकाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पत्नी रेश्‍मा यांनी शिवसेनेकडून डिंगोरे गणातून उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बुधाजी शिंगाडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पत्नी अनिता शिंगाडे यांना शिवसेनेची उदापूर गणातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश, शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण थोरात पाटील यांच्या पत्नीचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह मोहिते यांचा शिवसेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश, 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीलिमा गणेश थिगळे यांनी रेटवडी- वाफगाव गटात उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसेने प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे यांच्या सुनबाई दीप्ती जयसिंग भोगाडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करून रेटवडी- वाफगाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांचा शिवसेनेत प्रवेश केला. काळूस- मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-