Friday 28 July 2017

..... नाहीतर नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) अवैध (बाद) होईल !

.....नाहीतर नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) अवैध (बाद) होईल!

नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) भरताना खालील सर्व कागदपत्रांची व माहितीची पूर्तता केली आहे का ?
नसेल केली तर करावी जेणेकरून आपला अर्ज अवैध (बाद) ठरणार नाही याची काळजी घ्यावी.



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================




रिक्त जांगावर ऑक्टोबरमध्ये पुणे महापालिका पोट निवडणूक 2017

रिक्त जांगावर ऑक्टोबरमध्ये  पुणे महापालिका पोट निवडणूक 2017

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्र २, 21 अ, ३९ अ या रिक्त जांगावर ऑक्टोबर २०१७ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पोट निवडणुकी करिता सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.






Wednesday 26 July 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन भरावा

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन भरावा


कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन भरावा लागणार
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन भरावा लागणार आहे. राज्य शासनाने कर्जमाफी, प्रोत्साहनपर इतर लाभ मिळवण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना प्रसिद्ध केला आहे. हे अर्ज भरताना आधारकार्ड अत्यावश्यक आहे. तसेच अर्जदाराला वैयक्तीक माहितीसह बँक खाती, त्याचा खाते क्रमांक,कर्जाचा प्रकार व कर्जाची रक्कम ही माहिती सादर करावी लागणार आहे.

https://aaplesarkar.maharashtra.gov.in/



अर्ज भरण्यासाठी ‘आधार’ आवश्यक
ही भरावी लागणार माहिती
संपूर्ण नाव, आधार क्रमांक, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक (असल्यास), पेन्शन पीपीओ क्रमांक (असल्यास), पीक / मध्यम मुदत कर्जाचा तपशील, कर्ज खाते क्रमांक- १, २, ३ (बॅँक, विकास संस्थेचे नाव, शाखा, बचत खाते क्रमांक).

-एका कुटुंबातून एक अर्ज भरता येणार

या ठिकाणांहून अर्ज करावेत
जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा उपनिबंधक, उपनिबंधक, साहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय, बॅँका, विकास संस्था, महा-ई सेवा केंद्रे.

बोगसगिरी आढळल्यास फौजदारी!
कर्जमाफीबाबत सरकारने ठरविलेल्या निकषांत मी पात्र ठरत आहे. त्याचबरोबर अर्ज ‘अ’, ‘ब’ व ‘क’मधील सर्व माहिती सत्य असून, खोटी किंवा दिशाभूल करणारी असल्याचे निदर्शनास आल्यास कर्जमाफीची/प्रोत्साहनपर इतर लाभाची रक्कम व्याज व दंडासह परतफेड करण्यास बांधील आहे. याबाबत होणाऱ्या फौजदारी व इतर कायदेशीर कारवाईस मी पात्र राहीन. असे घोषणापत्रही भरून द्यावे लागणार आहे.


आॅनलाईन 
सहकार विभागाने कर्जमाफीची मागणी थेट शेतकऱ्यांकडूनच आॅनलाईन मागविली आहे. शासकीय कार्यालयासह विकास संस्था, बॅँकांमधून अथवा राज्य सरकारच्या संकेतस्थळावर किंवा वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरता येणार आहे. पात्र थकबाकीदार पती-पत्नीची माहिती देणे बंधनकारक राहणार असून अपत्य कर्जदार असेल तरच माहिती द्यावी लागणार आहे. परिपूर्ण माहिती भरताना शेतकऱ्यांना आपल्या अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. ही सगळी माहिती ‘आधार’शी लिंक केल्यावर संबंधित शेतकरी तोच आहे का? याची शहानिशा होणार आहे. त्याचबरोबर कर्जमाफीची रक्कम थेट त्याच्या बॅँकेतील खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील 
कर्जमाफीचा आदेश----




राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी ही कर्जमाफी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ म्हणून ओळखली जाणार आहे. या योजनेचा लाभ पीक कर्जासह मध्यम मुदतीच्या कर्जधारकांनाही होणार आहे.
1 एप्रिल 2012  ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयेपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. दीड लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (One Time Settlement) राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र थकबाकी रकमेच्या 25 टक्के किंवा दीड लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
तसंच 2012 – 2013 ते 2015 – 2016 या चार वर्षांत ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे, परंतु 30 जून 2016 रोजी ते थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्यांनी कर्ज मुदतीत फेडले आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून पीक कर्जाच्या 25 टक्के अथवा 25 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येईल.
राज्यातील विद्यमान आणि माजी मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान आणि माजी संसद सदस्य, विद्यमान आणि माजी विधिमंडळ सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, केंद्र आणि राज्य शासनाचे तसंच निमशासकीय संस्था आणि अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या कर्जमाफीसाठी पात्र असणार नाहीत. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.
अशी आहे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना
-कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची संख्या - ८९ लाख
-  ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकरी
- १.५० लाख रुपये च्या आतील थकबाकीदार शेतकरी - ३६ लाख.
(थकीत कर्जाची रक्कम रुपये १८,१७२ कोटी रुपये)
- १.५० लाख रुपये च्या वरील  थकबाकीदार शेतकरी - ८ लाख.
(थकीत कर्जाची रक्कम रुपये ४,६०० कोटी रुपये)
- नियमित कर्ज परतफेड केलेले शेतकरी - ३५ लाख.
(थकीत कर्जाची रक्कम ८,७५० कोटी)
- कर्जाचे पुनर्गठन झालेले शेतकरी - १० लाख.
 (त्या कर्जाची रक्कम रुपये २,५०० कोटी.)

 -अशा प्रकारे राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४,०२२ कोटी रुपये इतकी  कर्जमाफी

Political Research and Analysis Bureau (PRAB)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 


https://imojo.in/prabindiaEBook
================================================

Sunday 23 July 2017

मतदान झाले अपक्षास; मत गेले भाजपलाच: बुलडाणा जिल्हाधिकारी

मतदान झाले अपक्षास; मत गेले भाजपलाच!


महाराष्ट्र राज्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या एका इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग यंत्रामध्ये (ईव्हीएम) अपक्ष उमेदवाराला मतदान केले जात असतानाही भारतीय जनता पक्षासच (भाजप) मत जात असल्याचे बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालामध्ये मान्य करण्यात आले आहे.

या प्रकरणी आशा अरुण झोरे या अपक्ष उमेदवाराकडून तक्रार नोंदविण्यात आली होती. झोरे यांना मतदान केले तरीही मत "काही वेळा' भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवारासच जात असल्याचे झोरे यांनी तक्रारीत म्हटले होते. झोरे यांच्या या तक्रारीसंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या अधिकारांतर्गत बुलडाणा जिल्हा अधिकाऱ्याकडून माहिती मागविली होती.

बुलडाणा जिल्ह्यातील सुलतानपूर गावामधील एका मतदान केंद्रावर झोरे यांना मतदान केले असताही यंत्रावरील भाजपच्या उमेदवाराच्याच नावासमोरील "एलईडी लाईट' चमकत असल्याचे स्पष्ट झाले होते. बुलडाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगास लिहिलेल्या पत्रामध्ये अशा स्वरुपाचा प्रकार घडल्याची कबुली दिली आहे. अपक्ष उमेदवारास मत दिले असताही भाजपलाच मतदान होत असल्याच्या या प्रकारामागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

"तांत्रिक बिघाडामुळे असे घडले असावे. जिल्हा परिषद निवडणुकीत सरासरी 60 जागांसाठी मतदान होते. ही समस्या एका विशिष्ट मतदारसंघामधील एका केंद्रामधील एका यंत्रासंदर्भातच आढळून आली. या प्रकरणी मतदान यंत्रात छेडछाड करण्यात आली असती; तर इतर केंद्रांवरील यंत्रांसंदर्भातही अशाच स्वरुपाच्या तक्रारी आढळून आल्या असत्या,'' असे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.



Thursday 20 July 2017

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती ; विरोधकांची मते फुटली!

            रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

                   25 जुलैला शपथविधी

                        मिळाली 7 लाख 2 हजार 44 मते


देशाच्या 14 व्या राष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. कोविंद यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्यवा (यूपीए) उमेदार मीरा कुमार यांचा पराभव केला आहे.
राष्ट्रपतिपदासाठी 17 जुलै रोजी झालेल्या मतदान झाले होते. संसदेच्या हॉल क्रमांक 62 मध्ये आज (गुरुवारी) राष्ट्रपतीपदासाठीची मतमोजणी झाली. कोविंद यांना 65.35 ( 7 लाख 2 हजार 44 मते) तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मीरा कुमार यांना एकूण 34.35 (3 लाख 67 हजार 314) टक्के मते मिळाली.
रामनाथ कोविंद यांच्या रुपाने देशाला दुसरा दलित राष्ट्रपती मिळाला आहे. ते येत्या 25 जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतील. दरम्यान, या निवडणुकीसाठी देशातील विविध राज्यांतील 776 खासदार आणि 4120 आमदारांनी मतदान केले होते.
राष्ट्रपतिपदासाठी मतमोजणी पूर्ण झाली आहे. रामनाथ कोविंद यांना 65.35 तर मीरा कुमार यांना 34.35 टक्के मते मिळाली. रामनाथ कोविंद यांच्या रुपाने देशाला दुसरा दलित राष्‍ट्रपती मिळाला आहे. त्याचप्रमाणे आंध्रप्रदेश, अरूणाचल प्रदेश, बिहार, आसाम या राज्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे.देशाचे १४ वे राष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झालेत. त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.१७ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये रामनाथ कोविंद विजयी झालेत. संसद भवनात आज सकाळपासून  मतमोजणी सुरु होती. यामध्ये कोविंद यांना ६५.३४ टक्के मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांना एकूण ३४.३५ टक्के मते मिळाली.या निवडणुकीसाठी विविध राज्यांतील ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यापैकी ९९ टक्के आमदार-खासदारांनी १७ जुलै रोजी मतदानाचा हक्क बजावला होता.


यापूर्वीच्या राष्ट्रपतींना किती मतं मिळाली?

वर्ष 2012 : राष्ट्रपती निवडणुकीत यूपीएच्या प्रणव मुखर्जी यांना 7,13,763 म्हणजे सुमारे 69% मतं मिळाली होती, तर एनडीएचे पीए संगमा यांना 3.15 लाख म्हणजे सुमारे 31% मतं मिळाली होती.

वर्ष 2002 : राष्ट्रपती निवडणुकीत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना 9,22, 884 म्हणजेत सुमारे 89 टक्के मतं मिळाली होती. तर लक्ष्मी सहगल यांना 1,07,366 म्हणजेच 11% टक्के मतं मिळाली होती.

वर्ष 1997 : राष्ट्रपती निवडणुकीत के आर नारायणन यांना 9.56 लाख म्हणजेच सुमारे 95 टक्के मतं मिळाली होती. तर टीएन शेषन यांना सुमारे 50, 631 म्हणजेच केवळ 5% मतं मिळाली होती.

वर्ष 1992 : राष्ट्रपती निवडणुकीत शंकर दयाल शर्मा यांना 6.75 लाख म्हणजेच 66% मतं मिळाली होती. तर जीजी स्वेल यांना 3.46 लाख म्हणजे सुमरे 34% मतं मिळाली होती.

गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना मिळाले सर्वाधिक मतं

राष्ट्रपती निवडणुकीत केवळ १९७७ असं वर्ष होतं, ज्यावर्षी नीलम संजीव रेड्डी यांची सर्वोच्च पदावर बिनविरोध निवड झाली होती. 

गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना सर्वाधिक मतं मिळाली---

- ज्ञानी झैल सिंह (१९८२) - ७२.७३ टक्के

- आर. वेंकटरमण (१९८७) - ७२.२८ टक्के

- शंकर द्याल शर्मा (१९९२) - ६५.८७ टक्के

- के आर नारायणन (१९९७) - ९४.९७ टक्के

- ए पी जे अब्दुल कलाम (२००२) - ८९.५७ टक्के

- प्रतिभा पाटील (२००७) - ६५.८२ टक्के

- प्रणव मुखर्जी (२०१२) ६९.३१ टक्के


नारायणन यांच्याशिवाय केवळ दोन माजी राष्ट्रपतींना म्हणजेच डॉ. राजेंद्र प्रसाद आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना ९० टक्क्यांहून अधिक मतं मिळाली होती. प्रसाद यांना १९५७ मध्ये ९८.९९ टक्के आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना १९६२ मध्ये ९८.२४ टक्के मतं मिळाली होती. 


कोण आहेत रामनाथ कोविंद?
रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी जन्म.
कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतच शिक्षण
1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली.
1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहिलं
भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष
8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत

कोण आहेत मीरा कुमार?
मीरा कुमार 1973 मध्ये भारतीय विदेश सेवेत रुजू
माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या.
1985 मध्ये राजकीय कारकीर्द सुरु, लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा खासदारपदी
1990 मध्ये काँग्रेसच्या कार्यकारणी समिती सदस्य होत्या
1996 आणि 1998 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत विजयी
2004 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सामाजिक न्याय मंत्री पदाची सुत्रे
2009 मध्ये लोकसभा अध्यक्षा. देशाच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांची किमान १० मते फुटली!



क्रॉस व्होटिंग 

निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाली. किमान १० राज्यांत मीरा कुमार यांना त्यांच्या काँग्रेस पक्षाकडून पूर्ण मते मिळाली नाहीत. या क्रॉस व्होटिंगचे अनेक राजकीय पैलू आहेत. विशेषकरून गुजरातमध्ये. कारण, याच वर्षी येथे राज्यसभेच्या तीन जागांसाठी विधानसभेची निवडणूक होणार आहे. कोविंद यांना ११६ आमदारांचे क्रॉस व्होट मिळाले, असा दावा भाजपचे महासचिव भूपेंद्र यादव यांनी केला आहे. सर्वाधिक काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली.

गुजरात, गोवा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा दिल्लीत कोविंद यांना अपेक्षेपेक्षाही अधिक मते पडली. गुजरातमध्ये शंकरसिंह वाघेला यांच्या समर्थक आमदारांनी मीरा कुमार यांच्याऐवजी कोविंद यांना मत दिले. गुजरातमध्ये कोविंद यांना १३२ आणि मीरा कुमार यांना ४९ मते पडली आहेत. राज्यात काँग्रेसचे ५७ आमदार आहेत. दिल्लीत भाजपचे चार आमदार आहेत पण कोविंद यांना सहा मते पडली. हे दोन मत आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांचे आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोविंद यांना ११ आणि मीरा कुमार यांना २७१ मते पडली. येथे भाजप आणि घटक पक्षांचे मत आहेत. त्रिपुरात आघाडी नसतानाही कोविंद यांना मते पडली. ही मते टीएमसीच्या बंडखोर आमदारांचे असावेत, असे मानले जाते. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे १८५ आमदार आहेत. तरीसुद्धा कोविंद यांना २०८ मते पडली. गोव्यातही त्यांना अपेक्षेपेक्षा पाच जास्त मते पडली. गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत, पण मीरा कुमार यांना ११ मतेच पडली. आसाममध्ये भाजपचे ८७ आमदार असूनही कोविंद यांना ९१ मते पडली, तर उत्तर प्रदेशात मीरा कुमार यांना ७४ मते पडायला हवी होती, पण त्यांना ६५ मतेच मिळाली.

राजस्थान: १० भाजप आमदारांनी काँग्रेसच्या मीरा कुमार यांना मत दिले. त्यांना राजस्थान, हिमाचल, सिक्कीम नागालँडमध्ये क्रॉस व्होट मिळाले. राजस्थानात काँग्रेसचे २१, बसप आमदार आहेत, पण कुमार यांना ३४ मते पडली.


शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजपच राहील सत्तेवर; भाजपने खेचली 22 मते


महायुतीकडे १८६ मते असताना महाराष्ट्रातून काेविंद यांना २०८ मते मिळाली.राज्यात भाजपचे संख्याबळ १२२ असून शिवसेना ६३ आमदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस ४२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार आहेत. शिवसेनेने पाठिंबा काढला तरी रासपसह भाजपचे १२३ अाणि या निवडणुकीत विराेधकांची मिळवलेली २२ मतांच्या जाेरावर भाजप बहूमताचा १४५ हा अाकडा गाठू शकते.

भाजपा आणि शिवसेनेचे मिळून १८५ आमदार आहेत. त्यामुळे कोविंद यांना युतीच्या संख्याबळापेक्षा २३ मते अधिक मिळाली, असा तर्क दिला जात असला तरी तो वस्तुस्थितीला धरून नाही. कारण, राज्यातील ७ अपक्ष आमदार हे भाजपासोबत असून त्यांचे नेते आ.रवि राणा यांनी ते कोविंद यांना मतदान करणार हे आधीच जाहीर केले होते. याचा अर्थ भाजपा, शिवसेना आणि अपक्षांचे मिळून १९२ संख्याबळ होते. शिवाय, समाजवादी पार्टीचे मुलायमसिंग यादव यांनी कोविंद यांना पाठिंबा दिला होता हे लक्षात घेता राज्यातील सपाचे एकमेव आमदार अबु आझमी हे कोविंद यांच्या पाठीशी होते. ते आणि बहुजन विकास आघाडीचे दोन सदस्य (एकूण ३, मात्र १ गैरहजर) गृहित धरता एकूण संख्याबळ १९७ होते. कोविंद यांना २०८ मते मिळाली. म्हणजे त्यांना अपेक्षेपेक्षा ११ मते जादा पडली.

दुसरीकडे, काँग्रेस आघाडीचा विचार करता काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१, शेकाप-३, एमआयएम २, माकपा १, आणि भारिप-बहुजन महासंघ १, असे एकूण ९० संख्याबळ होते. मात्र, मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली म्हणजे आघाडीची १३ मते फुटली. कोविंद यांना मिळालेली ११ जादा मते आणि आघाडीची फुटलेली १३ मते यात दोनचा फरक हा बाद मतामुळे आला असावा. दोन मते बाद ठरली आणि एक सदस्य अनुपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून ८३ मते होती. मात्र, मीरा कुमार यांना त्यापेक्षा पाच मते कमी पडली. त्यामुळे या दोन्ही पक्षांची मते फुटली हे स्पष्टच आहे.कोविंद यांना जी २०८ मते मिळाली त्यातून शिवसेनेची ६३ मते वगळली तरी भाजपा आणि मित्र पक्षांची १४५ मते होतात. भाजपाची स्वत:ची १२२ मते आहेत. याचा अर्थ शिवसेना वगळून कोविंद यांना भाजपाच्या बाहेरची २३ मते मिळाली.


विधानसभेतील एकूण जागा – २८८राष्ट्रपतीपदासाठी मतदान – २८७मीराकुमार यांना मिळालेली मते – ७७रामनाथ कोविंद यांना मिळालेली मते – २०८बाद ठरलेली मते – २कोविंद यांना किमान १० मते जास्त मिळाली.


कोविंद यांच्या बाजूने
भाजप, तेदेपा, शिवसेना, जदयू, अण्णाद्रमुक, टीआरएस, वायएसआर काँग्रेस, इंनॅलोकदल व एनडीएचे घटक पक्ष. शिवाय सपाचा मुलायम व शिवपाल यांचा गट. मीरा कुमार यांच्या बाजूने : काँग्रेस, राजद, एनसीपी, डावे पक्ष, तृणमूल, आपसह १८ विरोधी पक्ष.

संसदेतील मतदान
- ७६८ खासदारांनी मतदान केले. (मूल्य : ५,४३,७४४)
- ५२२ मते कोविंद यांना पडली. (मूल्य : ३,६९,५७६)
- २२५ मते मीरा कुमार यांना मिळाली. (मूल्य : १,५९,३००)
- २१ मते अवैध ठरली. (मूल्य : १४,८६८)

राज्यातील मतदान
- एकूण मते : ४,०८३ (मूल्य : ५,४६,५५६)
- कोविंद यांना : २४०८ (३,३२,४६८)
- मीरा कुमारना : १६१९ (२,०८,०१४)
- अवैध ठरली ५६ मते. (६,०७४)


Political Research and Analysis Bureau (PRAB)







Wednesday 19 July 2017

उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे मनपात समावेश

उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे मनपात समावेश

शहरालगतच्या 34 गावांपैकी केवळ दोन गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्यात येणार आहे.


 शहरालगतच्या  34 गावांपैकी केवळ दोन गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने केवळ उरळी आणि फुरसुंगी देवाची या दोन गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.पुण्या भोवतालच्या  34 गावांचा महापालिकेत समावेश करण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर म्हणणं मांडताना राज्य सरकारने केवळ दोन गावांचा समेवश करण्याबद्दल अनुकूलता दर्शवली आहे.तर नऊ गावांचा अंशतः समावेश केला जाईल असं राज्य सरकारने म्हटलं आहे. मात्र अंशतः म्हणजे काय याबाबत कोणतंही स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलेलं नाही.उरलेल्या 23 गावांचा समावेश पाण्याची उपलब्धता, रिंग रोड आणि इतर सुविधांचा विचार करुन पुढील तीन वर्षांमध्ये घेतला जाईल असं राज्य सरकारनी म्हटलं आहे. म्हणजे पुण्याभोवतालच्या 23 गावांना महापालिकेत येण्यासाठी आणखी तीन वर्षे वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे
राज्य सरकारने ही सगळी गावे पालिकेत घेण्यास असमर्थता दाखवली. त्यापैकी केवळ 11 गावांच्या समावेशाला मान्यता दिली. 
त्यापैकी फुरसुंगी आणि उरूळी देवाची दोनच नवीन गावे पहिल्या टप्प्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत. पालिकेत या आधी अंशतः समावेश केलेल्या इतर नऊ गावांचाही पूर्ण समावेश केला जाणार आहे. 
लोहगाव, साडे सतरानळी, केशवनगर, धायरी, आंबेगाव, बावधन, शिवणे, उत्तमनगर, उंड्री ही गावे आता पूर्णपणे पालिकेत जातील. त्यामुळे एकूण 11 गावांचा समावेश पुणे पालिकेत होण्याचा मार्ग खुला झाला. ही सारी प्रक्रिया 31 डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होणार आहे. उरलेल्या 23 गावांचा समावेश तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने होणार आहे. 
पुणे परिसरातील गावांचा पालिकेतील समावेश हा गेल्या पाच वर्षांत रखडलेला विषय आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीरंग चव्हाण यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या 34 गावांत राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद आहे. त्यामुळे पुण्याच्या महापालिका निवडणुकीआधी ही गावे पुण्यात समाविष्ट करण्यास भाजप नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे याबाबतच्या कृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 
ही गावे पुण्यात आली असती पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता येण्यात अडचण झाली असती. त्यामुळे निवडणुकीनंतर तरी ही गावे पालिकेत येतील, असा अंदाज बांधण्यात येत होता. प्रत्यक्षात तसे घडले नाही. समाविष्ट होण्यासाठी प्रतिक्षा यादीत असलेल्या काही गावांचा हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी या शहरातील विधानसभा मतदारसंघात समावेश होतो. त्यामुळे येथील भाजपचे आमदार या गावांच्या समावेशासाठी आग्रही होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास तत्त्वतः मान्यता दिली होती. मात्र आता अनेक गावांना "वेटिंग'वर राहावे लागणार असे दिसते. 
ही गावे पालिकेत समाविष्ट केल्यानंतर पालिकेच्या तिजोरीवर ताण येईल. सर्वच गावे समाविष्ट झाली असती पुणे पालिकेचे क्षेत्रपळ मुंबई पालिकेपेक्षाही मोठे झाले असते. त्यासाठी सुमारे साडे सात हजार कोटी रूपयांची विकासकामे करावी लागली असती. एवढी मोठी आर्थिक ताकद पालिकेकडे नसल्याने गावांचा विकास होऊ शकला नसता. दुसरीकडे पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर जुन्या हद्दीतील कामेही रखडली असती. त्यामुळे आधी शहराचा विकास करू, अशी भूमिका बापट यांनी घेतली होती.
लोकांच्या भाजपकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत गावे समाविष्ट करून ना शहराला न्याय; ना नव्या गावांसाठी पैसा, अशी स्थिती झाली असती. पुणे महानगर प्राधिकरणामार्फत या गावांत विकासकामे आधी करावीत. तेथील रिंग रोड, कचरा प्रकल्प आदी पीएमआरडीएच्या माध्यमातून मार्गी लावावेत, अशी भूमिका बापट यांची होती. त्यानुसार त्यांनी राज्य सरकारला निर्णय घेणे भाग पाडले. दुसरीकडे विभागीय आयुक्तांच्या समितीने सर्वच गावे पालिकेत घेण्याची शिफारस केली होती.
तातडीने समाविष्ट होणाऱ्या फुरसुंगी आणि उरूळी देवाची या दोन गावांत पुण्याचा कचरा जिरवला जातो. येथे पालिकेविरोधात मोठे आंदोलन सातत्याने होते. त्यामुळे या गावांचा समावेश होणार, हे नक्की होते. उच्च न्यायालयात राज्य सरकारने ही भूमिका मांडल्यानंतर न्यायालय सरकारला सर्वच 34 गावे पालिकेत घेण्यास भाग पाडणार की राज्य सरकारची टप्प्याटप्प्याने गावे पालिकेत घेण्याची योजना मान्य करणार का, याची उत्सुकता आहे.  



Saturday 15 July 2017

नगरसेवकांच्या मानधनात दुप्पट ते तिप्पट वाढ; राज्य सरकारचा निर्णय

नगरसेवकांच्या मानधनात दुप्पट ते तिप्पट वाढ; राज्य सरकारचा निर्णय


राज्यातील महापालिकांमधील नगरसेवकांसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. नगरसेवकांच्या मानधनात दुप्पट ते तिप्पट एवढी घसघशीत वाढ केली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील नगरसेवकांना आता 20 हजार रुपये तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांना 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने याबाबतची अधिसूचना आज (शनिवारी) जारी केली.
राज्यातील महापालिकांमधील नगरसेवकांचे मानधन सन 2010 मध्ये निश्चित करण्यात आले होते. परंतु, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचे मानधन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  मुंबई महापालिका अधिनियमातील कलम 37 (अ) 1 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 19 (अ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून राज्यातील सर्वच महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात वाढ केली आहे. दूरध्वनी, लेखनसामुग्री व टपाल बाबींबवरील खर्च लक्षात घेऊन मानधनात वाढ करण्यात आली आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
'अ' प्लस वर्गातील महापालिकेतील नगरसेवकांना 25 हजार रुपये, 'अ' वर्गातील 20 हजार, 'ब' वर्गातील 15 हजार आणि 'क' व 'ड' वर्गातील नगरसेवकांचे मानधन 10 हजार रुपये करण्यात आले आहे.
पुणे महापालिका 'अ' वर्गात मोडत आहे.  पुणे पालिकेत 162 नगरसेवक निवडून आले असून पाच स्वीकृत असे 167 नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या मानधनात आता मोठी वाढ झाली असून 20 हजार रुपये मानधन नगरसेवकांना दरमहा मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका 'ब' वर्गात मोडत आहे. पालिकेत 128 नगरसेवक निवडून आले असून पाच स्वीकृत असे 133 नगरसेवक आहेत. पिंपरी पालिकेतील नगरसेवकांना आता साडेसात हजार रुपये मानधन मिळत होते. त्यामध्ये आता दुप्पट साडेसात हजार रुपयांची वाढ झाली असून 15 हजार रुपये दरमहा मानधन मिळणार आहे.
Political Research and Analysis Bureau (PRAB)



राजगुरुनगर खेड पंचायत समितीच्या ५१-पिंपरी बु. गणासाठी २० ऑगस्टला पोट-निवडणूक

             राजगुरुनगर खेड पंचायत समितीच्या ५१-पिंपरी बु. गणासाठी  २० ऑगस्टला पोट-निवडणूक


पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या ५१ पिंपरी बु. गणासाठी रिक्त जागेवर पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.या बरोबरच अहमदनगर जिल्हा परिषदेतील 20-चांदेकासारे निवडणूक विभागाची निवडणूक व अन्य पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूका  कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जि.प. आणि पं.स.च्या रिक्त पदांसाठी मतदान
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या चांदेकासारे (ता. कोपरगाव) निवडणूक विभाग; तसेच पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या पिंपरी बु. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीच्या मोझरी निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 31 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल
-------------------------------------------------------------
सत्तेपेक्षा रोजीरोटी महत्त्वाची मानून एका महिलेने पंचायत समिती सदस्यत्व सोडल्याची घटना खेड तालुक्‍यात घडली. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या धोंडाबाई साहेबराव खंडागळे यांनी आपली नोकरी वाचविण्यासाठी पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. फेब्रुवारीत झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पिंपरी बुद्रूक गणातून त्या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यामुळे जागा रिक्त झाली होती.
धोंडाबाई खंडागळे यांच्या राजीनाम्यामुळे खेड पंचायत समितीत एक पद रिक्त झाले  त्या जागेसाठी आता निवडणूक होणार आहे. पंचायत समितीत शिवसेना ही कॉंग्रेसच्या एका सदस्याच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे. या निवडणुकीत विजय मिळवून पूर्ण बहुमत मिळविण्याचा शिवसेना प्रयत्न करेल; तर भाजप आपली जागा राखण्याचा प्रयत्न करेल. त्यादृष्टीने भाजपने रामदास मेंगळे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा भाजप प्रवेश करून घेतला आहे. मेंगळे यांच्या पत्नी बायजाबाई यांनीच राष्ट्रवादीच्या तिकिटावर धोंडाबाई खंडागळे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती.
------------------------------
राजीनामा का दिला?
धोंडाबाई खंडागळे या कोये गावाच्या भिसांबा- ठाकरवाडी या वस्तीवर अंगणवाडी सेविका आहेत. पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर नियमानुसार त्यांना अंगणवाडी सेविकापदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. निवडून आल्यानंतर सत्कार समारंभाचे आणि मानपानाचे नव्याचे नऊ दिवस संपले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि नियमित मिळणारे पाच हजार रुपये मानधन दोन महिने न मिळाल्याने, त्यांना चणचण जाणवली. त्यावरून त्यांनी भविष्यातील धोका ओळखला. सत्तेच्या पदापेक्षा रोजीरोटी महत्त्वाची असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता . आपला राजीनामा त्यांनी  सभापती सुभद्रा शिंदे यांच्याकडे दिला होता. त्यावर साक्षीदार म्हणून पंचायत समिती सदस्य भगवान पोखरकर आणि अंकुश राक्षे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. पंचायत समिती सदस्य आणि अंगणवाडी सेविका अशा दोन्ही ठिकाणी कार्यरत राहणे नियमानुसार शक्‍य नसल्याने आपण पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे त्यांनी राजीनामापत्रात म्हटले होते;
---------------------------
 खेड (राजगुरुनगर) पंचायत समितीच्या चौदा गणांपैकी तीन सर्वसाधारण, चार सर्वसाधारण स्त्री, दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग, दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, एक अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती व एक अनुसूचित जमाती स्त्री वर्गासाठी राखीव आहेत.

Political Research and Analysis Bureau (PRAB)




२० ऑगस्टला मिरा भाईदर महानगरपालिकेची निवडणूक ; Mira Bhayander Municipal Corporation Election 20 august

२० ऑगस्टला मिरा भाईदर महानगरपालिकेची निवडणूक


मिरा भाईदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ करिता २० ऑगस्टला मतदान घेण्यात येणार आहे. २६ जुलै ते २ ऑगस्ट पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी 3 ऑगस्ट २०१७ रोजी होणार असून उमेदवारी माघार घेण्याचा अंतिम दिनांक ५ ऑगस्ट २०१७ आहे. २० ऑगस्टला मतदान घेण्यात येणार आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेची मुदत २७ ऑगस्ट २०१७ रोजी संपत आहे. तत्पूर्वी, निवडणूक घेणं बंधनकारक आहे. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं हा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. मीरा-भाईंदरच्या निवडणुकीत २४ प्रभागातील ९५ जागांसाठी मतदान होणार आहे.
मीरा- भाईंदर महानगरपालिकेची मुदत 27 ऑगस्ट 2017 रोजी संपत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. एकूण 24 प्रभागातील 95 जागांसाठी मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 26 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 या कालावधीत दाखल करता येतील. त्यासाठी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. 3 ऑगस्ट 2017 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2017 पर्यंत असेल. निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांना 7 ऑगस्ट 2017 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 21 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यावर आचारसंहिता संपुष्टात येईल.
मीरा भाईंदर एक दृष्टिक्षेप
एकूण लोकसंख्या- 8,09,378
मतदार (सुमारे)- 5,93,345
एकूण प्रभाग- 24
एकूण जागा- 95 (महिला 48)
सर्वसाधारण- 64 (महिला 32)
अनुसूचित जाती- 4 (महिला 2)
अनुसूचित जमाती- 1 (महिला 1)
नागरिकांचा मागास प्रवर्ग- 26 (महिला 13)


मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७
ना हरकत प्रमाणपत्रा साठी संकेतस्थळ

http://noc.mbmcelection.org

सूचना
ना हरकत प्रमाणपत्रासाठी येथे अर्ज करू शकता,अर्ज करण्याची रीत:
नवीन अर्जासाठी New Registration link वर click करून विचारलेली सर्व माहिती भरून submit बटन वर click करा.
(टीप : वापरलेल्या User Name आणि Password ची नोंद करून घ्यावी )
ना हरकत प्रमाणपत्राचा अर्ज भरून,प्रत्येक खात्याच्या संबंधित कागदपत्रे असल्यास ती upload करा.नंतर submit बटन वर click करून भरलेल्या अर्जाचा क्रमांक नोंद करून घ्यावी.
(टीप :अर्ज क्र,अर्जाच्या वरील उजव्या कोपऱ्यात दिसेल)
अर्जाची भरलेली माहिती पाहण्यासाठी show बटन वरती click करा.
Instructions
This site for NOC application for election candidate,Rules are as follow:
For New application,You have to click on New Registration link,after that submit with all required and correct information.
(Note :Please note your username and password.)
For NOC form,fill form with all required informations and documents as per department(if any).After submit NOC form,note your application number.
(Note :Application Number placed on top-right corner)
Click On show button to display filled application data
--------------------------------------

मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७
मतदारांचे मतदारयादीत नाव शोधण्याकरिता निवडणूक आयोगाकडून सुविधा उपलब्ध 
खालील लिंकवर पहा- आपल्या प्रभागातील मतदारांचे नाव नसेल तर मतदार नोंदणी करा.

http://mbmc.truevoters.in


Mr.Chandrakant Bhujbal-9422323533
Political Research and Analysis Bureau (PRAB)
------------------------------------------------------------------------------------------------------------
जि.प. आणि पं.स.च्या रिक्त पदांसाठी मतदान
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या चांदेकासारे (ता. कोपरगाव) निवडणूक विभाग; तसेच पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या पिंपरी बु. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीच्या मोझरी निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 31 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल

चंद्रकांत भुजबळ
Political Research and Analysis Bureau (PRAB)

खालील पालिकेच्या संकेतस्थळावर निवडणूक विषयक अधिक माहिती मिळेल.

http://www.mbmc.gov.in/view/mr/election-2017


निवडणूक वेळापत्रक


मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२

                                        ( नगरसेवक नावे ,पत्ता ,दुरध्वनी क्रमांकाची यादी  )

अ.क्रप्रभाग क्रनिवडून आलेल्या उमेदवाराचे नावपक्षाचे नांवदुरध्वनी क्र
11 असँन्ड्रा जेफ्री रॉड्रीक्सराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9819260886
21 बअशोक तिवारीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9769120555
32 अअन्सेन्ला मेन्डोंसा परेराराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9004045110
42 बऍड. रवि व्यासभारतीय जनता पार्टी9892815054
53 अकोठारी सुमन रमेशभारतीय जनता पार्टी9869742693
63 बकांगणे यशवंत ठकाजीभारतीय जनता पार्टी9322106880 9820429227
74 अमयेकर सरस्वती रजनीकांतभारतीय जनता पार्टी8655891612 9869436162
84 बसिंग मदन उदितनारायणभारतीय जनता पार्टी9322598737 8655555426
95 अपाटील रोहिदास शंकरभारतीय जनता पार्टी9821120220
105 बम्हात्रे कल्पना महेशभारतीय जनता पार्टी9967846809
116 अपिसाळ मनिषा नामदेवभारतीय राष्ट्रीय काँगेस9869711982
126 बपांडे हंसूकुमार कमलकुमारभारतीय राष्ट्रीय काँगेस9324136664
137 अनिलम हरिश्चंद्र ढवण (गटनेता - शिवसेना) (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 3)शिवसेना9869265622
147 बजाधव मोहन महादेवबहुजन विकास आघाडी9322846370
158 अपाटील सुनिता कैलासभारतीय राष्ट्रीय काँगेस9967934010 9320247527
168 बवेतोसकर राजेश शंकरभारतीय राष्ट्रीय काँगेस9323102535
179 अठाकुर अरविंद दत्ताराम (गटनेता - महाराष्ट्र नवनिर्माण सेना)महाराष्ट्र नवनिर्माण सेना9820714840
189 बप्रभात प्रकाश पाटीलभारतीय राष्ट्रीय काँगेस9892409323 9820909323
1910 अपाटील प्रेमनाथ गजाननभारतीय जनता पार्टी9892464945
2010 बशर्मा सुनिला सत्येंद्र (मा. सभापती, प्रभाग समिती क्र.4)भारतीय जनता पार्टी9324088142
2110 कमेहता डिंपल विनोद (मा. सभापती, महिला बालकल्याण समिती)भारतीय जनता पार्टी9867257040
2211 अजयंतीलाल गुरुनाथ पाटीलशिवसेना9892399839
2311 बसंध्या प्रफुल्ल पाटीलशिवसेना9833717374
2412 अपाटील वंदना विकासराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9324499696 9819144088
2512 बप्रविण मोरेश्वर पाटील (मा. उपमहापौर)शिवसेना9867761689
2613 अतारा विनायक घरतशिवसेना9224737097
2713 बहरिश्चंद्र रामचंद्र आमगावकर (मा. सभापती, स्थायी समिती)शिवसेना9029112980 8291931111
2814 अकेळुसकर प्रशांत नारायणभारतीय जनता पार्टी9320346115
2914 बभानुशाली वर्षा गिरीधरभारतीय जनता पार्टी9867610895
3015 अवंदना मंगेश पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9224334445 28143653
3115 बश्रीप्रकाश सिंह (मुन्ना सिंह) (गटनेता - अपक्ष) (मा. सभागृह नेता)अपक्ष9820443510 9322660259
3216 अरावल भगवती जयशंकरभारतीय जनता पार्टी8898427281
3316 बशाह राकेश रतिशचंद्रभारतीय जनता पार्टी9870099447
3417 अशरद केशव पाटील (गटनेता, भारतीय जनता पक्ष)भारतीय जनता पार्टी9821213300
3517 बमेघना दिपक रावलभारतीय जनता पार्टी9769781233 9702353775
3618 अरिक्त प्रभाग
3718 बध्रुवकिशोर मन्साराम पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9820296597
3819 अजैन गिता भरत (मा. महापौर)भारतीय जनता पार्टी9820502299
3919 बजैन रमेश धरमचंद (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 2)भारतीय जनता पार्टी9819740454
4020 अशुभांगी महिन कोटियन (मा. उपसभापती, महिला बालकल्याण समिती)शिवसेना9867253130
4120 बडॉ. राजेंद्र जैनभारतीय जनता पार्टी9920678238
4221 अरॉड्रीक्स बाबरा डॉनल्डराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9967281061 28197399
4321 बमेन्डोंसा स्टिवन जॉनराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9820637541
4422 अप्रतिभा प्रकाश तांगडे-पाटीलभारतीय जनता पार्टी8652623031
4522 बमॉरस जोसेफ रॉड्रीक्सभारतीय जनता पार्टी9867715167
4623 अग्रिटा स्टिफन फॅरोराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9969147537 32961073
4723 बडॉ. आसिफ गुलाब शेख (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 1)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9820720767
4824 अजयमाला किशोर पाटीलशिवसेना8692959316
4924 बसंदिप मोहन पाटीलशिवसेना9892131428
5025 अगोविंद हेलन जॉर्जीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9221726854 9819403348
5125 बडिमेलो बर्नड अल्बर्ट (गटनेता - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9892017764 28450340 9833449489
5226 अबगाजी शर्मिला विल्सनभारतीय राष्ट्रीय काँगेस9167082302
5326 बलियाकत ग. शेख (मा. विरोधी पक्षनेता)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9819585222, 9833394446
5427 अपरमार अनिता भरतशिवसेना9769447565
5527 बपाटील प्रणाली संदिपशिवसेना9930883213
5628 अरकवी सुहास माधवरावभारतीय राष्ट्रीय काँगेस9892719004
5728 बझिनत रऊफ कुरेशीभारतीय राष्ट्रीय काँगेस9869181437
5829 अकॅटलीन एॅन्थोनी परेराराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9892140446
5929 बखण्डेलवाल सुरेशराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9892773388
6030 अनरेश तुकाराम पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9819507494 8384857494
6130 बशबनम लियाकत शेखराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9987173491
6231 असुजाता रविकांत शिंदेभारतीय जनता पार्टी9702513137
6331 बमेहता नरेंद्र लालचंदभारतीय जनता पार्टी9821346115 9321346115
6432 अरिक्त प्रभाग
6532 बपुजारी कांचना शेखरभारतीय राष्ट्रीय काँग्रेस9892774187
6633 अकाझी रशीदा जमीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस9892247228
6733 बइनामदार जुबेर (गटनेता - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस9820318999
6834 अशेख अशरफ मोहम्मद इब्राहिमभारतीय राष्ट्रीय काँग्रेस9819478636
6934 बसय्यद नुरजहाँ नझर हुसेनभारतीय राष्ट्रीय काँग्रेस9323105999
7035 असुर्यकांत खंडोजी म्हात्रेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस9702005000
7135 बडिसा मर्लिन मर्विनभारतीय राष्ट्रीय काँग्रेस9920304134 28103769 9320304134
7236 अश्रीम. सिमा कमलेश शहाभारतीय जनता पार्टी9820828096 9869664922
7336 बकासोदरिया अश्विन श्यामजीभारतीय जनता पार्टी9930482182
7437 अडॉ. नयना मनोज वसानीभारतीय जनता पार्टी9833199995
7537 बजैन दिनेश तेजराजभारतीय जनता पार्टी9821246550
7638 अदिप्ती शेखर भटभारतीय जनता पार्टी9987264875
7738 बदळवी प्रशांत ज्ञानदेवशिवसेना9867708777 28128777
7839 अविराणी रेखा अनिलभारतीय राष्ट्रीय काँगेस9833812522
7939 बसामंत प्रमोद जयराम (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 5)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस9821063162
8040 अअनिता जयवंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9224425973
8140 बम्हात्रे परशुराम पद्माकरराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9833325826 28455661
8241 अभोईर भावना राजूबहुजन विकास आघाडी9167663222
8341 बभोईर राजू यशवंतबहुजन विकास आघाडी9819853505
8442 अवेंचर गिल्बर्ट मेंन्डोंसाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9819192277
8542 बअरोरा दिपीका पंकजभारतीय जनता पार्टी8108544406
8643 अभावसार शिल्पा कमलेशराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9867523791
8743 बवंदना रामदास चक्रेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9867746854
8844 अभोईर कमलेश यशवंतराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9819866789 7738566789
8944 बसुमबंड महरून्नीसा हारूनरशीदराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9867227717
9045 अगावंड मंदाकिनी आत्मारामशिवसेना9224632013
9145 बम्हात्रे प्रभाकर पद्माकरशिवसेना9819027161
9246 अमीरादेवी रामलाल यादवभारतीय जनता पार्टी9224150148 9870689807
9346 बअनिल बाबुराव भोसले (मा. सभापती, प्रभाग समिती क्र. 6)भारतीय जनता पार्टी9820160593 9820260593
9447 अरविंद्र भिमदेव माळीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9821647637 9004696991
9547 बदक्षता राजेंद्र ठाकूरराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी9892205150
96--शर्मा भगवती तुगनचंदस्विकृत सदस्य9869401567
97--नलावडे दिनेश दगडूस्विकृत सदस्य9321199024
98--धनेश परशुराम पाटीलस्विकृत सदस्य9819224545
99--डॉ. सुशिल गोपीकिसन अग्रवालस्विकृत सदस्य9892396201
100--श्री. हेमंत सदानंद म्हात्रेस्विकृत सदस्य9892780340