Tuesday 28 February 2017

भाजपला दीड कोटींपेक्षा जास्त मते 
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र कोटींचा आकडा गाठता आलेला नाही

विधानसभेची मिनी निवडणूक म्हणून समजल्या जाणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला सर्वाधिक दीड कोटींपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. सत्तेतील भागीदार  शिवसेनेला एक कोटींपेक्षा जास्त मते असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र कोटींचा आकडा गाठता आलेला नाही.
गेल्या आठवडय़ात झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना मिळालेली एकूण मते आणि मतांच्या टक्केवारीची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली. यात भाजप पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि सर्वात कमी मते ही काँग्रेसला मिळाली आहेत.
भाजपला मुंबई महानगरपालिकेत १४ लाख ५०० मते मिळाली. ८२ जागाजिंकलेल्या भाजपच्या मतांची टक्केवारी ही २७.९२ टक्के आहे. अन्य नऊ महानगरपालिकांमध्ये भाजपला ८१ लाख १७ हजार, २८९ मते पडली आहेत. या मतांची टक्केवारी (३५.३६ टक्के ) होते. जिल्हा परिषदांमध्ये भाजपला ६३ लाख ७६ हजार मते मिळाली. म्हणजेच भाजपला एकूण दीड कोटींपेक्षा जास्त मते पडली आहेत.  मुंबईत ८४ जागाजिंकणाऱ्या शिवसेनेला १४ लाख ४६ हजार मते पडली आहेत. अन्य नऊ महापालिकांमध्ये ४१ लाख ६१ हजार तर जिल्हा परिषदेत ४७ लाख मते मिळाली आहेत.
एमआयएमला अडीच टक्के मते
राष्ट्रवादीला मुंबईत (२ लाख ८४ हजार), अन्य नऊ महापालिकांमध्ये (३४ लाख, १७ हजार) तर जिल्हा परिषदांमध्ये (५६ लाख ९३ हजार) मते मिळाली. राष्ट्रवादीच्या एकूण मतांची संख्या ही ९२ लाखांच्या आसपास आहे.
काँग्रेसला मुंबईत (८ लाख २९ हजार), अन्य नऊ महापालिका (३० लाख) तर जिल्हा परिषदा (४९ लाख ७२ हजार) मते मिळाली. काँग्रेसच्या एकूण मतांची संख्या ही ८९ लाख आहे. मनसेला मुंबईत चार लाख अन्य अन्य महापालिकांमध्ये नऊ लाख मते मिळाली आहेत. एमआयएमला मुंबई २.५५ टक्के मते मिळाली आहेत.
मतांची टक्केवारी – मुंबई वगळता नऊ महानगरपालिका
भाजप (३५.३६ टक्के)
शिवसेना ( १८.१३ टक्के)
राष्ट्रवादी काँग्रेस ( १४.८८ टक्के)
काँग्रेस (१३.१४ टक्के)
एमआयएम (१.९६ टक्के)
जिल्हा परिषद मते
भाजप (२४.९१ टक्के)
राष्ट्रवादी काँग्रेस (२२.२५ टक्के)
काँग्रेस (१९.४३ टक्के)
शिवसेना (१८.५२ टक्के)



Puneites are inclined to BJP: PRAB survey

 Tuesday, 3 January 2017 


Pune: An extensive survey conducted by Political Research and Analysis Bureau (PRAB) for Sakal has revealed the inclination of voters ahead of the upcoming Municipal Corporation elections. The findings have shown how the political scenario in the city is likely to change and how the ruling parties need to work hard if they wish to retain power in the Pune Municipal Corporation (PMC). 

The survey was conducted in all the new 41 wards of the PMC through open and confidential questionnaires. Around five per cent of the voters in every ward answered the open questionnaires. Thus, out of the 24,88,570 eligible voters, around 1,31,400 expressed their opinion in the survey. The voters answered questions on topics like local issues, the perspective of the candidates in their area, internal issues in the political parties, effects of social issues like Maratha Kranti Mook Morcha on the election results, effects of the decisions by the Central and State government, party switching, actions and decisions by different party representatives over various issues and so on. Voters were made to answer questions on all topics following which they had to answer their choice of political party and candidates in the upcoming elections. 
However, on a surprising note, most voters have mentioned that their favourite choice of political party is the Bharatiya Janata Party (BJP), followed by the Nationalist Congress Party (NCP). Congress, Shiv Sena, Maharashtra Navnirman Sena (MNS) and 
Republican Party are among the remaining choices of the voters respectively. 
“Discovering people’s preference through such surveys helps run a political policy-based campaign. Questions related to local issues and events show the inclination of the voters. People also seemed curious about the newly introduced freedom that allows the voter to vote for four candidates at a time,” said Chandrakant Bhujbal, Director of PRAB. 
He said, “The survey has been conducted using correct scientific methods and the results are close to accurate. Another important aspect of the survey is that along with the common man, we have also taken the opinions of some of the influential people in the city in a confidential poll.” Youth make up for a significant proportion of the voters this time, thus the inclination of the young voters are very important as far as the results of PMC Elections 2017 are concerned. 




Monday 27 February 2017

पिंपरीत भाजप, शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ तर, राष्ट्रवादीच्या मतांची 11 टक्यांनी घट PRAB

पिंपरीत भाजपच्या मतांमध्ये 30 टक्के वाढ तर,राष्ट्रवादीच्या मतांची 11 टक्यांनी घट

शिवसेनेच्या टक्केवारीत वाढ; संख्याबळ मात्र घटले

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये यंदा तब्बल 30. 33 टक्यांची वाढ झाली आहे. तर, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमध्ये 10.9 टक्क्यांनी घट झाली आहे. शिवसेनेच्या मतांमध्येही 4.76 टक्यांनी वाढ झाली आहे. मात्र, शिवसेनेचे संख्याबळ घटले आहे. काँग्रेसच्या मतांमध्ये 8.63 टक्के आणि मनसेच्या 5.22 टक्के मतांमध्ये घट झाली आहे. 
2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 39.46 टक्के मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे 83 नगरसेवक निवडून आले होते.  2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतांमध्ये तब्बल 10.9 टक्यांनी घट झाली असून राष्ट्रवादीच्या सुफडा साफ झाला आहे. राष्ट्रवादीला यावेळी 28. 56 टक्के मते मिळाली आहेत. त्यांचे 36 नगरसेवक निवडून आले आहेत. 2012 मध्ये 6.73 टक्के मते मिळवून 3 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपने यावेळी जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपच्या मतांमध्ये तब्बल  30. 33 टक्यांनी वाढ झाली आहे. भाजपने सर्वाधिक 37.06 टक्के मते घेऊन 77 जागा जिंकत पिंपरी महापालिका ताब्यात घेतली आहे.
भाजप आणि शिवसेना 2012 मध्ये युती करून महापालिका निवडणूक लढले होते. त्यावेळी शिवसेनेने 11.85 टक्के मते मिळवत 14 नगरसेवक निवडून आणले होते. यावेळी स्वबळावर लढलेल्या शिवसेनेच्या मतांमध्ये तब्बल 4.76 टक्यांनी वाढ झाली असून 16.61 मते मिळाली आहेत. परंतु, शिवसेनेचे संख्याबळ घटले असून 14 वरून 9 वर आले आहे.
काँग्रेसच्या मतांमध्ये तब्बल 8.63 टक्यांनी घट झाली आहे. 2012 मध्ये काँग्रेसला 11.75 टक्के मते मिळाली होती. काँग्रेसचे 14 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी काँग्रेसला केवळ 3.12 टक्के मते मिळाली असून त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मनसेच्या मतांच्या टक्केवारीमध्येही 5.22 टक्यांनी घट झाली आहे. 2012 मध्ये मनसेला 6.60 टक्के मते मिळाली होती. मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते. यावेळी मनसेला 1.38 टक्के मते मिळाली असून त्यांचा एकच नगरसेवक निवडून आला आहे. महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच नोटाचा वापर करण्यात आला होता. मतदारांनी तब्बल 87 हजार 773 मते 'नोटा'ला दिली आहेत. त्याची टक्केवारी 2.82 होत आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या मतांमध्ये यंदा चांगलीच वाढ झाली आहे. भाजप सर्वाधिक 37.06 टक्के मते घेऊन 77 जागा जिंकत पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सत्तारुढ झाला आहे. तर, पिंपरी महापालिकेत गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या मतांमध्ये चांगलीच घट झाली आहे. गेल्यावेळी दुस-या क्रमांकावर असलेली शिवसेना यावेळी तिस-या क्रमांकावर फेकली गेली आहे. स्वबळावर लढणा-या शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे, मात्र संख्याबळ घटले आहे. काँग्रेसचा तर महापालिकेत एकही प्रतिनिधी नसणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस या पक्षांना आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.


पिंपरीत भाजपला 37 टक्के तर राष्ट्रवादीला 28 टक्के मतदान

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 37. 06 टक्के मतदान झाले आहे. तर, सत्ताधारी राष्ट्रवादीला 28. 56 टक्के मतदान झाले आहे. 37.06 टक्के मते घेऊन भाजपने 77 जागा जिंकत महापालिका ताब्यात घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 11 लाख 92 हजार 89 मतदार आहेत. त्यापैकी 7 लाख 79 हजार 060 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी प्रभाग पद्धतीने निवडणूक झाल्यामुळे एका मतदाराला चार मते करण्याचा अधिकार होता. भाजपला 11 लाख 53 हजार 060 मते मिळाली आहेत. त्यांची टक्केवारी 37.06 टक्के होत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला 8 लाख 88 हजार 659 मते मिळाली आहेत. त्यांची मतांची टक्केवारी 28. 56 टक्के होत आहे. शिवसेनाला 5 लाख 16 हजार 721 मते मिळाली असून त्याची टक्केवारी 16.61 होत आहे.
मतदारांची पसंती कमळाला होती. 37. 06 टक्के मते भाजपला मिळाली असून त्यांचे 77 नगरसेवक निवडून आले आहेत. दोन नंबरची मते सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहेत. 36 नगरसेवक त्यांचे निवडून आले आहेत. शिवसेना तिस-या क्रमांकावर असून त्यांना 16.61 टक्के एवढी मते मिळाली आहेत. एवढी मते मिळूनही शिवसेनेचे नऊच उमेदवार निवडून आले आहेत. अपक्षांना 2 लाख 67 हजार 229 मते मिळाली आहेत. त्यांच्या मतांची टक्केवारी 8.59 टक्के होत आहे. पाच अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसला 97 हजार 063 मते मिळाली असून 3.12 टक्के मते होत आहेत. तीन टक्के मते मिळाली असतानाही काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. यावेळी मतदारांनी तब्बल 87 हजार 773 मते 'नोटा'ला दिली आहेत. त्याची टक्केवारी 2.82 होत आहे.
पिपंरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 2007 ला 56.66 टक्के, 2012 मध्ये 54.84 टक्के मतदान झाले होते. यंदा प्रथमच महापालिकेच्या मताची टक्केवारी वाढली असून 65.47 टक्के मतदान झाले आहे. मतांची वाढती टक्केवारी आणि नव मतदारांची नोंदणी राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरली आहे. तर, मतांची वाढती टक्केवारी आणि नव मतदारांचा भाजपला फायदा झाल्याचे दिसून येत आहे.




पिंपरी-चिंचवडमध्ये 'नोटा'वर तब्बल 87 हजार मते

पिंपळे-गुरव, सांगवी मध्ये सर्वाधिक 'नोटा'
राजकीय पक्षांनी घेतली 'नोटा'ची धास्ती
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मतदारराजाने उमेदवारांना अयोग्य ठरवत तब्बल 87 हजार 773 मते 'नोटा'ला दिली आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांची 'नोटा'ची चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे. यापुढे राजकीय पक्षांना उमेदवार ठरविताना काळजी घ्यावी लागेल, असे संकेत यातून मिळत आहेत.
निवडणूक रिंगणातील उमेदवारांपैकी एकही उमेदवार योग्य नसण्याचा पर्याय म्हणजे 'नोटा' अर्थात 'यांपैकी एकही नाही' असा आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 87 हजार 773  मतदारांनी आपल्या प्रभागातील उमेदवार योग्य नसल्याचे म्हटले आहे. निवडणूक हा पैशांचा खेळ असल्याचे स्पष्ट झाले असून महापालिका निवडणूकदेखील याला अपवाद ठरलेली नाही. अशावेळी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार आपल्या पसंतीचा नसल्यास मतदारांना 'नोटा' बटन दाबता येते. या नोटाचे बटन दाबून पिंपरी-चिंचवडकरांनी नापसंत उमेदवार असल्याचे म्हटले आहे.
पिंपळेगुरव, जुनी सांगवीमध्ये सर्वाधिक 'नोटा'!
पिंपळेगुरव-नवी सांगवी या परिसरात सर्वाधिक मते 'नोटा'ला मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक 31 मध्ये सर्वाधिक 4332 'नोटा' मते पडली आहेत. येथून भाजपचे तीन उमेदवार आणि अपक्ष नवनाथ जगताप निवडून आले आहेत. त्याखालोखाल सांगवी गावठाण-ढोरेनगर प्रभाग क्रमांक 32 मध्ये 4062'नोटा' मते पडली आहेत. येथेही भाजपचेच पॅनेल निवडून आले आहे. याव्यतिरिक्त निगडी-प्राधिकरणात 3889 नोट मते पडली आहेत. येथून भाजपचे दोन, राष्ट्रवादी एक आणि शिवसेनेचे एक उमेदवार निवडून आले आहेत. निगडी गावठाण-यमुनानगरमध्ये 3755,  नढेनगर-विजयनगरमध्ये 3649, पिंपळेगुरव-क्रांतीनगर-जवळकरनगरमध्ये 3654, नढेनगर-विजयनगरमध्ये 3649, तर पिंपरीगाव-मिलिंदनगरमध्ये 3646 आणि प्रभाग क्रमांक 30 दापोडी मध्ये 3586 'नोटा' मते पडली आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी 'नोटा'चा अवंलब करण्यात आला होता. महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच 'नोटा'चा अवलंब करण्यात आला आहे. मतदारांनी तब्बल 87 हजार 773 मते 'नोटा'ला दिली आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक लढविणा-यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. यापुढे उमेदवार देतानाही राजकीय पक्षांना  काळजी घ्यावी लागेल, असे संकेत यातून मिळत आहेत.


पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 42 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त
774 उमेदवारांपैकी 419 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूकांचा नुकताच निकाल लागला. यामध्ये  अनेक राजकीय पक्षांची गणिते चुकली ज्यामुळे मी-मी म्हणणारे उमेदवारही तोंडघशी पडेल. या हार-जितनंतर सर्वांचे लक्ष लागते ते कोणत्या उमेदवाराची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझीट जप्त होते याच्याकडे. यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेच्या 115 उमेदवारांपैकी 42 उमेदवारांचे  डिपॉझीट जप्त झाले आहे.
यावेळी पिंपरी महापालिकेसाठी एकूण 774 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभारले होते. त्यापैकी 419 उमेदवारांचे  डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये शिवसेनेचा जो पिंपरी-चिंचवड मधील प्रबळ पक्ष म्हणून ओळखला जातो, त्याच पक्षाचे केवळ 9 उमेदवार विजयी झाले आहेत तर त्यांच्या 42 उमेदवारांचे डिपॉझीट  जप्त झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका प्रबऴ उमेदवार शारदा बाबर यांचेही डिपॉझीट जप्त केले आहे. तर प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवसेनेच्या पॅनलचेच डिपॉझीट जप्त झाले आहे.
मनसे उमेदवार अव्वल तर काँग्रेसचा दुसरा नंबर
यामध्ये मनसेचे एकूण 43 उमेदवार रिंगणात होते त्यापैकी 25 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. तर काँग्रेसचे 80 उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी उभारले होते त्यापैकी 42 उमेदवरांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. काँग्रेसनंतर  यामध्ये राष्ट्ररवादीचाही समावेश असून राष्ट्रवादीच्या 124 उमेदवरांपैकी 4 उमेदवरांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे. तर महापालिकेमध्ये घवघवीत यश मिळवणा-या भाजपच्या एकाही उमेदवराचे डिपॉझीट यावेळी जप्त झालेले नाही.
डिपॉझीट जप्त झालेल्यांमध्ये शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका शारदा बाबर, सुजाता टेकवडे यांचा समावेश आहे तर माजी नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या विजया जाधव, राष्ट्रवादीचे सतिश दरेकर, माजी विधी समिती सभापती विजय कापसे,  राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या शहराध्यक्षांच्या पत्नी सुप्रीया गव्हाणे,  महापालिकेचे निवृत्त अधिकारी  सुभाष माछरे, तसेच राष्ट्रवादीचे निलेश गांगार्डे यांचा समावेश आहे.

वरील आकडेवारीचा विचार केला असता  प्रभाग क्रमांक 19 मधून सर्वाधीक म्हणजे 31 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे.त्याबरोबर प्रभाग 13 म्धून 30 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे. वरील आकडेवारीचा विचार केला असता  प्रभाग क्रमांक 19 मधून सर्वाधीक म्हणजे 31 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे.त्याबरोबर प्रभाग 13 मधून 30 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे.  तीन नगरसेवकांच्या संख्याबळावरुन 77 पर्यंत पोहचलेल्या भाजपच्या एकाही उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले नाही. राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस या पक्षांना यातून आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे दिसत आहे.




भारतीय जनता पक्षाचे ७७ नगरसेवक पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक १- कुंदन गायकवाड, स्वीनल म्हेत्रे, प्रभाग क्रमांक २ - अश्विनी जाधव, सारिका बोऱ्हाडे, राहुल जाधव, वसंत बोराटे, प्रभाग क्रमांक ३ - नितीन काळजे, सुवर्णा बुर्डे, लक्ष्मण सस्ते, प्रभाग क्रमांक ४ - विकास डोळस, लक्ष्मण उंडे, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, प्रभाग क्रमांक ५ - सागर गवळी, प्रियांका बोरसे, प्रभाग क्रमांक ६ - यशोदा बोइनवाड, सारिका लांडगे, रवि लांडगे, राजेंद्र लांडगे, प्रभाग क्रमांक ७ - संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, नितीन लांडगे, प्रभाग क्रमांक ८ - सीमा सावळे, विलास मडिगेरी, नम्रता लोंढे, प्रभाग क्रमांक १० - अनुराधा गोरखे, केशव घोळवे, तुषार हिंगे, प्रभाग क्रमांक ११ - अश्विनी बोबडे, योगिता नागरगोजे, संजय नेवाळे, एकनाथ पवार, प्रभाग क्रमांक १३ - कमल घोलप, उत्तम केंदळे, प्रभाग क्रमांक १५ – शैलजा मोरे, शर्मिला बाबर, प्रभाग क्रमांक १६ – बाळासाहेब ओव्हाळ, संगीता भोंडवे, प्रभाग क्रमांक १७ – नामदेव ढाके, माधुरी कुलकर्णी, करूणा चिंचवडे, सचिन चिंचवडे, प्रभाग क्रमांक १८ – सुरेश भोईर, राजेंद्र चिंचवडे, प्रभाग क्रमांक १९ – शैलेंद्र मोरे, जयश्री गावडे, कोमल मेवानी, शीतल शिंदे, प्रभाग क्रमांक २० – सुजाता पालांडे, प्रभाग क्रमांक २१ – संदिप वाघेरे, प्रभाग क्रमांक २३ – मनीषा पवार, अर्चना बारणे, अभिषेक बारणे, प्रभाग क्रमांक २४ – माया बारणे, प्रभाग क्रमांक २६ – ममता गायकवाड, तुषार कामठे, आरती चोंधे, संदिप कस्पटे, प्रभाग क्रमांक २७ – बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे, सुनीता तापकीर, चंद्रकांत नखाते, प्रभाग क्रमांक २८ – शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे, प्रभाग क्रमांक २९ – सागर आंगोळकर, उषा मुंढे, शशिकांत कदम, चंदा लोखंडे, प्रभाग क्रमांक ३० – आशा शेंडगे, प्रभाग क्रमांक ३१ – अंबरनाथ कांबळे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, प्रभाग क्रमांक ३२ – संतोष कांबळे, शारदा सोनवणे, उषा ढोरे, हर्षल ढोरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ नगरसेवक पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक १ – दत्तात्रय साने, प्रभाग क्रमांक ३ – विनया तापकीर, प्रभाग क्रमांक ५ – अनुराधा गोफणे, अजित गव्हाणे, प्रभाग क्रमांक ८ – विक्रांत लांडे, प्रभाग क्रमांक ९ – गीता मंचरकर, राहुल भोसले, वैशाली घोडेकर, समीर मासुळकर, प्रभाग क्रमांक १० – मंगला कदम, प्रभाग क्रमांक १२ – प्रवीण भालेकर, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, पंकज भालेकर, प्रभाग क्रमांक १३ – सुमन पवळे, प्रभाग क्रमांक १४ – जावेद शेख, वैशाली काळभोर, प्रभाग क्रमांक १५ – शरद मिसाळ, प्रभाग क्रमांक १६ – प्रज्ञा खानोलकर, मोरेश्वर भोंडवे, प्रभाग क्रमांक १८ – अपर्णा डोके, प्रभाग क्रमांक २० – सुलक्षणा शिलवंत, श्याम लांडे, योगेश बहल, प्रभाग क्रमांक २१ – निकिता कदम, उषा वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रभाग क्रमांक २२ – विनोद नढे, उषा काळे, संतोष कोकणे, प्रभाग क्रमांक २५ – मयूर कलाटे, प्रभाग क्रमांक २८ – शीतल काटे, नाना काटे, प्रभाग क्रमांक ३० – राजू बनसोडे, स्वाती काटे, रोहित काटे.
शिवसेनेचे ९ नगरसेवक पुढीलप्रमाणे 
प्रभाग क्रमांक १४ – मिनल यादव, प्रमोद कुटे, प्रभाग क्रमांक १५ – अमित गावडे, प्रभाग क्रमांक १८ – अश्विनी चिंचवडे, प्रभाग क्रमांक २४ – सचिन भोसले, निलेश बारणे, प्रभाग क्रमांक २५ – अश्विनी वाघमारे, रेखा दर्शिले, राहुल कलाटे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक प्रभाग क्रमांक १३ – सचिन चिखले.
अपक्ष ५ नगरसेवक पुढीलप्रमाणे 
प्रभाग क्रमांक १ – साधना मळेकर, प्रभाग क्रमांक २२ – नीता पाडाळे, प्रभाग क्रमांक २३ – कैलास बारणे, प्रभाग क्रमांक २४ – झामाबाई बारणे, प्रभाग क्रमांक ३१ – नवनाथ जगताप.


BJP ready for fresh innings with team of young corporators

BJP ready for fresh innings with team of young corporators


Shiv Sena, Maharashtra Navnirman Sena (MNS) and AIMIM won 10,2 and 1 seat respectively


Analysis of data shows that 42 per cent of the BJP corporators are in the age group of 31-40 years of age while 11 per cent of them are actually below 30 years of age. (Representational)
In the newly-elected house of the Pune Municipal Corporation(PMC), the BJP other than having a brute majority also has the youngest lot of corporators. Around 42 per cent of the newly-elected corporators from the party are in the age group of 31-40 years and in some of the panels the party has all four corporators well below the 40-years mark. On Thursday, the BJP emerged victorious in the PMC ending a 10-year run of the NCP and Congress. Winning 98 out of the 162 seats in the house, the BJP almost decimated the NCP and Congress that managed to win just 38 and 9 seats respectively.
Shiv Sena, Maharashtra Navnirman Sena (MNS) and AIMIM won 10,2 and 1 seat respectively. This house also saw the election of four independent candidates. Analysis of data shows that 42 per cent of the BJP corporators are in the age group of 31-40 years of age while 11 per cent of them are actually below 30 years of age. In the present house, only BJP has five corporators who are senior citizens. Around 46 per cent of the NCP corporators are between the age group of 41 and 50 years. Both the Congress and MNS do not have any elected leader who are below the age of 30 years and most of their corporators are above the age bracket of 40 years. 
As many as 50 per cent of the MNS corporators are above the 50 years bracket. Prachi Alhat (21) of Shiv Sena and Sayali Wanjale (22) would be the two youngest corporators in the present house. Corporators who are from areas like Kothrud and Shivajinagar assembly areas are significantly younger than the corporators who have been elected from the periphery areas like Hadapsar, Khadakwasla etc. Panel 5 (Vadgaonsheti Kalyaninagar) has all four corporators below 40 years of age and Panel 9 (Baner Balewadi Pashan) has three out of four corporators in the same age bracket.
Majority of the panels in the peths have corporators above the age bracket of 40 years. The decision to distribute tickets to younger and fresher faces rather than old established leaders, according to political analyst Chandrakant Bhujbal, was one of the reasons for the party’s better performance in the polls. “NCP decided to give tickets to older established leaders than trying out rookies,” he said. Bhujbal also pointed out that the BJP’s ticket distribution had taken in consideration all castes, which went well with the voters.



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

Sunday 26 February 2017

पुणे महापालिका निवडणूक २०१७ ...राजकीय पक्षांना मिळालेली मते व त्यांचे प्रमाण

पुणे महापालिका निवडणूक २०१७

राजकीय पक्षांना मिळालेली मते व त्यांचे प्रमाण 


भाजपला यश मिळाल्याची कारणे
१.     केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयांचा सकारात्मक परिणाम
२.     भाजप सरकार बाबत मतदारांमध्ये निर्माण झालेली विश्वासाहर्तता
३.     केंद्र व राज्य सरकारशी निगडीत पुणे शहरातील प्रलंबित व अपेक्षित प्रश्न मार्गी लागवेत या आशेने मतदारांची भाजपला पसंती.
४.     केंद्र व राज्य सरकारशी निगडीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिंग रोड, विकास आराखडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, नियोजितपणे पुलांची रचना व निर्मिती, सुरळीत व समान पाणीपुरवठा या विकसनशील कामांना प्रोत्साहन देण्यासाठी मतदारांचा भाजपकडे कल.
५.     कॉंग्रेस व राष्ट्रवादी कडून वारंवार निवडून येणा-या स्थानिक नगरसेवकांची मक्तेदारी व हस्तक्षेप, भ्रष्टाचार प्रकरणे.
६.     मुलभूत सोर्इ सुविधांमध्ये केला जात असलेला दुजाभाव यामुळे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांबाबत नकारात्मक वातावरण.
७.     निवडणूक प्रचाराचे योग्य नियोजन व सर्व सामाजिक समतोल राखून केलेली उमेदवारांची निवड आणि बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा पक्षिय लाभ.
चंद्रकांत भुजबळ
“पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (prab)



Political Research and Analysis Bureau (PRAB)

https://pmc.gov.in/sites/default/files/winning_candidates.pdf

https://pmc.gov.in/sites/default/files/Candidate_wise_votes.pdf

election NOTA 2017 पुणे महापालिकेत तब्बल १ लाख ७२ हजार ६३२ मतदारांनी नोटाचा वापर

‘नोटा’चा (वरीलपैकी कोणीही नाही) पर्याय आणून मतदारांना पर्याय दिला गेला असला, तरी ही सकारात्मकता वंचितांसाठी मात्र नकारात्मक ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. पुणे महापालिकेत तब्बल १ लाख ७२ हजार ६३२ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================




Saturday 25 February 2017

How four-ward panel system helped BJP win municipal corporation elections

How four-ward panel system helped BJP win municipal corporation elections

With its continuing popularity in the state as displayed in the general and assembly polls, the BJP gained from the panel formations.

THE state government’s decision to go with a four-ward panel seems to have played a major role in the BJP’s unprecedented win in the municipal corporation elections. A little number crunching makes it amply clear that the panel system with an average voters count of 70,000-80,000 prompted voters to think in terms of parties instead of candidates while voting. With its continuing popularity in the state as displayed in the general and assembly polls, the BJP gained from the panel formations.

A closer look at the voting pattern among all nine municipal corporations out of ten (as BMC continued with ward system), shows that voters often chose to vote for a single party while choosing for all four members in a panel.
For example, in Nagpur out of total 38 panels with each having four wards, in 21 panels voters gave all four votes to a single party. In 19 of these 21 panels, winners were BJP candidates. This essentially means almost 70 per cent (78 candidates) winners of the total 108.
In Pune too, single party voting happened in 17 out of 41 panels, with the BJP winning 14 of them. In PCMC, voters in 14 out of 32 panels voted in this manner, out of which the BJP managed to win 12.
When the announcement about the four-ward panel was made by the state government last year, party leaders from the Congress, the NCP, the Shiv Sena and the MNS had expresed their reservations saying the decision by the Fadnavis government would affect them badly and give an edge to the BJP. They also alleged that the panel structuring was done as per the convenience of BJP candidates. All allegations of favour to the BJP were denied by the party as well as by election officials who played a part in delimitation.
However, political analysts like Chandrakant Bhujbal believe the new panel system played a considerable role in the BJP’s win. “I would give a 20-30 per cent credit to the four-ward panel system. The new panel system helped them encash the party’s popularity in addition to local factors. The larger panel and four votes per voter means that party assumes more importance than the candidates,” said Bhujbal.
As per Manasi Phadke of Ghokale Institute of Politics and Economics, the BJP party workers used the four-ward panel to mislead voters into casting votes to their party.
“We received several complaints from the voters that party workers were telling them that they have to vote for all four candidates from a single party, failing which their vote will be adjudged invalid,” she said.




Election 2017 BJP gains from losses suffered by parties

BJP gains from losses suffered by parties


Pune =No Drastic Dip For NCP; Cong And MNS Worst Hit Parties
The Bharatiya Janata Party, which got a two-thirds majority in the Pune Municipal Corporation by winning 98 seats, has secured a vote share of 36.88% -an impressive improvement over the 12.48% votes it polled in the 2012 civic polls.On Tuesday, the city recording a voter turnout of 55.5%, with about 14 lakh voters casting their votes.
The massive gain has been attributed to the huge losses suffered by the Congress and the Maharashtra Navnirman Sena. Congress polled just 8.42% votes while MNS received only 6.24%, a massive fall of 13% and 14% respectively.
In this election, the BJP also has the distinction of contesting from the highest number of seats (155) as it emerged the single biggest party. This is also the first victory for BJP since the PMC was established way back in 1950.
According to the data released by the PMC, the Nationalist Congress Party (NCP) stood second in vote share, followed by Congress, Shiv Sena and MNS. While the party managed to win just 38 seats, it mostly retained its vote share by recording 22.39%, compared to the 25.12% in 2012.
“We might have lost the elections but we have managed to retain our vote share from the last elections,“ said NCP leader Vandana Chavan, who resigned as the city unit chief. “It is not that our party members have not per formed; the other parties such as Congress and MNS have fared badly. Their votes have gone to BJP,“ she added.
However, MP Anil Shirole refuted that theory, claiming that there was a definite pro-BJP sentiment among the voters. “The city's development was our agenda, and people voted for all the projects we announced,“ Shirole said.
MNS cadre laid the blame squarely at the feet of their party chief, Raj Thackeray.“Our party president hardly paid any attention to our campaign and left the candidates to their own fate. Even during the last five years, Raj Thackeray did not show much interest in increasing the party's base,“ said an MNS leader, requesting anonymity.
The Congress party managed to win a dismal nine seats, 19 seats in the deficit from the 28 they had won in 2012. The party has gone into a huddle to assess the situa tion. City Congress leader Vishwajit Kadam has proposed to go back to the basics, and reach out to the party workers at the grass roots' level to understand where they went wrong. “The situation is serious and we have to take all steps to rebuild the party. We are also talking to all our candidates who contested the elections. Congress is a grand old party and we will come out of the crisis,“ said Kadam.
On the other hand, the Shiv Sena managed to improve its tally in the elections by gaining 4% in vote share, but that barely benefited the party, which finished fourth in the final tally.
The party's city unit president Vinayak Nimhan admitted the party needs to put in more effort to regain lost ground. “We are working hard to ensure that we emerge strong. Our party has a wide network, across the city, and we are going to streng then the same for the assembly elections in 2019,“ he said.
Political Research and Analysis Bureau head Chandrakant Bhujbal said that BJPs slogan of “Parliament to Corporation“ helped connect with voters.“The anti-incumbency wave and the hope for something better, and a slew of projects such as the ring road, DP, slum rehabilitation, airport and metro were some of the factors on which the voters identified with the BJP,“ said Bhujbal.
The BJP's campaign with chief minister Devendra Fadnavis as its face also seems to have resonated with the voters, he added.
While these elections did not leave much scope for the independent candidates, the total votes polled by independent candidates were about 5 lakh, which comprised about 8.8% of the vote share in these elections.





Friday 24 February 2017

Election 2017 मतदारांचा कल जाणण्यास यश... पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) च्या सर्वेक्षणावर शिक्कामोर्तब

मतदारांचा कल जाणण्यास यश
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) च्या सर्वेक्षणावर शिक्कामोर्तब



====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================



=====================================================================

पुणे महानगरपालिका निवडणुक २०१७ करीता पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेने सकाळने  सर्व प्रथम पुणे शहरात सर्वेक्षण करून मतदारांचा कल जाणून घेण्यात आला. यामध्ये भाजपलाच सर्वाधिक पसंती असल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न झाले होतेसर्वेक्षणाचे निष्कर्ष जानेवारी २०१७ रोजीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. सदरील सर्वेक्षणावर शिक्कामोर्तब झाल्याचे अंतीम निकालावरून स्पष्ट झाले.
पुणे महापालिका निवडणूक उमेदवारांची निवड करताना सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवरील मतदारांचा कल स्थिती पाहून उमेदवारी देण्यात आली होती. सर्वेक्षणाच्या आधारावर उमेदवारांची निवड भाजपने केली होती तर सर्वेक्षणाच्या विश्लेषणाच्या आधारावर राष्ट्रवादीने कॉंग्रेसबरोबर आघाडीकरून उमेदवारांची निवड केली होती. उमेदवार निवडीच्या पार्श्वभूमीवर तसेच मित्र पक्षांच्या राजकीय भूमिकांवरून दुस-यांदा सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये भाजपच्या काही जागा कमी होत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र सर्वेक्षणातील निष्कर्ष पाहून सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या कमकूवत जागांवर लक्ष केंद्रीत केले. तेथील उमेदवारांना यश मिळेल याबाबत सर्व राजकीय ताकद धोरणात्मक रणनीती राबविण्यात आली. याचा सकारात्मक परिणाम निकालामध्ये दिसून आला.
पुणे शहरातील मतदारांनी विकासाला महत्व देवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिंग रोड, मेट्रो, विकास आराखडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, नियोजितपणे पुलांची रचना निर्मिती, सुरळीत पाणीपुरवठा या विकसनशील कामांना प्रोत्साहन मिळावे या प्रमुख कामांच्या अपेक्षेने पुणेकरांनी भाजपला साथ दिली आहे. पुणे महापालिकेतील भ्रष्टाचार, वारंवार निवडून येणा-या स्थानिक नगरसेवकांची मक्तेदारी, मुलभूत सोर्इ सुविधांमध्ये दुजाभाव या प्रमुख कारणांमुळे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांच्या बाबत नकारात्मक वातावरण मतदारांमध्ये जाणवले. याचा परिणाम त्यांच्या पराभवात झाल्याचे दिसून आले.
केंद्र  राज्य सरकारच्या माध्यमातून पुणे शहराला विकासात्मक कामांसाठी निधीची उपलब्धता होर्इल ही आशा देखील मतदारांमध्ये असल्याचे जाणवले. बहूसदस्यीय प्रभाग पद्धतीचा देखील सत्ताधारी भाजपला लाभ मिळाल्याचे दिसून येते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने काही जागांवर केलेली आघाडी त्यांना फायदेशीर ठरली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी   शिवसेनेला इतर राजकीय पक्षाच्या उमेदवारीमुळे त्यांच्या मतात घट झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. इतर पक्षांमध्ये विशेषत: एमआयएम, बसप, रिपब्लिकन पक्ष इतर गट या प्रमुख पक्षांच्या  विरोधात उमेदवारीमुळे निश्चितच परिणाम झाल्याचे दिसून येते. मनसेच्या पक्ष नेतृत्वाकडून वारंवार होणा-या भूमिकांमधील बदल आणि स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेतील पदाधिका-यांवर अविश्वास दर्शविण्याच्या भूमिकेचा विपरीत परिणाम या निवडणूकीत झाल्याचे दिसून आले.
महापालिका निवडणुकीमध्ये ११८ विद्यमान नगरसेवक होते त्यातील काही नगरसेवक एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे लढतीमध्ये रंगत आल्याचे दिसून आले. या निवडणुकीमध्ये सर्वपक्षिय मिळून ३४ नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. तर विविध पक्षांचे ११८ विद्यमान नगरसेवक, नगरसेविका निवडणुक रिंगणात होते.  निवडणूक निकालांचे अचूक अंदाज वर्तवणारी विश्वनीय संस्था म्हणून पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)ची नावलौकिकता आहे. अनेक निवडणुकांमध्ये सर्वेक्षण विश्लेषण यापूर्वी केले असून अचूकतेचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे.
चंद्रकांत भुजबळ
9422323533




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================