Thursday 28 February 2019

Narayan Rane खासदार राणे यांच्या पक्षाच्या चिन्हाचा प्रवास बादलीतून फ्रीजमध्ये

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने निवडणूक चिन्ह बदलेले!


व्हायरल झालेली जाहिरात
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाने बदली हे दिलेले निवडणूक चिन्ह चौफेर चविष्ट चर्चेमुळे बदलण्यात आले आहे. कारण रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश नारायण राणे यांच्या व्हायरल जाहिरातीमध्ये निवडणूक चिन्ह बदली नसून फ्रीज(रेफ्रीजरेटर) हे चिन्ह झळकले आहे. बदली अशुभ व योग्य नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्याने चिन्ह बदलेले असल्याचे सांगण्यात येते.

खासदार राजू शेट्टी यांची आता बॅटिंग...

राजू शेट्टी ‘बॅट’ घेऊन उतरणार निवडणुकीच्या मैदानात

खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी 'बॅट' हे चिन्ह दिले आहे.ऊसाला दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने वर्षानुवर्षे लढणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी ‘बॅट’ हे चिन्ह दिले आहे. यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार शेट्टी व त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना बॅट घेऊनच निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. गत निवडणुकीत (२०१४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिट्टी हे चिन्ह मिळाले होते. स्वाभिमानी पक्ष अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वाभिमानी पक्षाला “बॅट” हे चिन्ह अधिकृत केले असून खासदार शेट्टी ‘बॅट’ हे चिन्ह घेऊनच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उतरणार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राहतील, त्या ठिकाणी ‘बॅट’ हे चिन्ह घेऊन स्वाभिमानीचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत. नवीन चिन्ह मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजू शेट्टी कोणत्या प्रकारची बॅटिंग करतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

मतदार “बादली”ला पसंती देणार काय? 


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाकडून “बकेट” हे चिन्ह दिलेले आहे. आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या चिन्हावर लढवावी आहे. वर्षभरापूर्वी खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर राज्यसभेत बिनविरोध निवडणूक लढवून खासदार पदी निवड झाली आहे. आता आगामी निवडणुकांना सामोरे जाताना बकेट घेऊन मतदारांपुढे जावे लागणार आहे. राणे यांच्या राजकीय कारकीर्द मधील हे चौथे निवडणूक चिन्ह असणार आहे. प्रारंभी धन्युष्यबाण नंतर पक्षांतर मग हाताचा पंजा आणि राज्यसभेवर कमळ आता आगामी निवडणुकीत बकेट असा राजकीय प्रवास त्यांचा आहे. धन्युष्यबाण, हाताचा पंजा, कमळ या निवडणूक चिन्हाला यश मिळाले तसे “बकेट”ला कितपत यश मिळेल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.  महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी पक्षाचा सहयोगी मात्र स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाने “बकेट” ही निशाणी दिली आहे. आगामी निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या चिन्हावर लढवणार आहे. वर्षभरापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर पक्षाने मुंबईसह विविध जिल्ह्यांत कार्यकारिणी जाहीर केली आहे. नुकतेच आमदार नितेश राणे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून सोलापूरची कार्यकारिणी जाहीर केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढेल आणि आपले खासदार केंद्रात भाजपला पाठिंबा देतील, अशी घोषणा संस्थापक नारायण राणे यांनी केली आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार निलेश राणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उद्या १ मार्च रोजी कोकणवासीयांचा मेळावा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्गसह राज्यातील इतर मतदारसंघांत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. दरम्यान भाजपच्या मोदींसोबतच आहोत हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. एनडीएमधील घटक पक्ष आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात माजी खासदार नीलेश राणे यांची उमेदवारी महाराष्ट्र स्वाभिमानतर्फे जाहीर केलेली आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग, सातारा-कोल्हापूर येथील एक, सोलापूरमधील एक जागा आणि औरंगाबाद येथील एक अशा एकूण पाच जागांसाठी निवडणुक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोकणातील राजकारणातील प्रभावी नेता-: माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण तातू राणे यांचा राजकीय प्रवास....

जन्म १० एप्रिल १९५२ सुभाष नगर येथील चाळीत राहणारे एक गरीब कुटुंबातील मुलगा ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास त्यांचा आहे. राजकारणात येण्या अगोदर नारायण राणे यांनी मित्रा सोबत सुभाष नगर येथे मित्रा सोबत चिकन शॉप सुरु केले होते.१९६० साली हर्या नार्या टोळीची दहशत होती या टोळी सोबत रानेचे संबंध आले आणि त्याचे नाव सगळीकडे पोहचले. हर्या नार्या जिंदाबाद या नावाने एक चित्रपट सुध्दा त्या काळात येऊन गेला. याच काळात नारायण राणे यांच्या नावाने खुनाचा गुन्हा देखील घटाला पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा देखील नोंद झाला होता. पोलीस रेकॉर्ड नुसार वयाच्या १४ व्या वर्षी या टोळीचे सदस्य होते. माधव ठाकूर व राणे यांचा वाद या काळात बराच गाजला. वयाच्या २० व्या वर्षी राणे यांचे संबध शिवसेने सोबत आले,चेंबूर येथे शाखा प्रमुख पद राणेंना देण्यात आले. कोपरगावचे नगरसेवक ही त्यांची पहिली निवडणूक व ते यशस्वी झाले व त्यांनतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. १९९६ शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले. १९९९ साली मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच राणे यांना काही महिन्या करिता मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळाली. उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदाची चर्चा सुरु झाल्यानंतर राणेचे शिवसेनेत खटके उडायला सुरवात झाली. ३ जुलै २००५ ला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली परंतु शिवसेनेतून जाताना राणे अनेक समर्थक घेऊन कॉंग्रेस मध्ये गेले. कॉंग्रेस मध्ये त्यांना महसूल मंत्री पद देण्यात आले व त्याच कॉंग्रेस मध्ये राणेवर २००८ साली पक्ष विरोधी कार्यवाही केल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला होता. ८ ऑक्टोबर २००८ साली नारायण राणे यांनी प्रहार नावाचे वृत्तपत्र सुरु केले. २००९ साली त्यांनी परत महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला होता. नारायण राणे यांची दोन मुले नितेश व निलेश हे दोघेही त्यांच्यासोबत राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत.
नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास
1968 - वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश
1968 - शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी
1985 ते 1990- या काळात शिवसेनेचे नगरसेवक त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले
1990-95 - नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर
1991 - छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील महत्त्व वाढले
1990-95 - याच काळात विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद
1996-99 - युतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान
1999 - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड
2005 - शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद. मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली
2005 - शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
2005 - शिवसेना सोडल्यावर काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी विजयी
2005 - आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी निवड
2007 - काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड
2008 - पक्षविरोधी टिप्पणीमुळे काँग्रेसमधून निलंबन
2009 - विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण
2014 - लोकसभेला पुत्र निलेश राणे यांच्या पराभावनंतर मंत्रीपदाचा राजीनामा
2014 - मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा
2014 - विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून राणेंचा पराभव
2015 - वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतही राणेंचा पराभव झाला.
2017 - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. एनडीए मध्ये घटक पक्ष म्हणून सामील.
2018 - भाजपच्या उमेदवारीवर राज्यसभेवर निवड 
नितेश नारायण राणे - 
नितेश नारायण राणे यांनी २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली मतदारसंघामधून निवडणूक लढवली व २५,००० हून अधिकच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. इ.स. २०१० मध्ये चिंटू शेख याने नितेश राणेंनी त्याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला होता, याप्रकरणी पोलीस चौकशी होऊन नंतर राणेंना क्लीन चीट देण्यात आली होती. इ.स. २०१३ मध्ये चिंटू शेखने नितेश राणेंविरोधात विक्रोळी मेट्रोपॉलिटन कोर्टात दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घेतली. इ.स. २०१३-१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या गुजरात विकासाच्या मॉडेलवर टीका करत नितेश राणेंनी गुजराती लोकांबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया नोंदवल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मांसाहारी असल्याच्या कारणावरून मराठी माणसाला फ्लॅट न विकणार्‍या गुजराती बांधकाम व्यावसायिकांविरोधात त्यांनी भूमिका घेतली. नितेश राणे यांचा विवाह ऋतुजा शिंदे यांच्याशी २८ नोवेंबर इ.स. २०१० रोजी मुंबई येथे झाला. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या नितेश राणेंना व्यंगचित्रांची आवड असून ते स्वतः व्यंगचित्रकार आहेत. नितेश राणे यांचे भाऊ निलेश नारायण राणे हे माजी लोकसभा सदस्य आहेत.नितेश राणे यांचा जन्म २३ जानेवारी इ.स. १९८२ रोजी जन्म झाला. त्यांचे एमबीए पर्यंतचे शिक्षण लंडन मध्ये झाले असून २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना राजकारणात साथ देण्याच्या उद्देशाने नितेश राणे भारतात आले होते.
डॉ. निलेश नारायण राणे - 
निलेश राणे यांचा जन्म: १७ मार्च १९८१ रोजीचा आहे. सध्या काँग्रेस पक्षामधील नेते व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते पंधराव्या लोकसभेमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये राणे शिवसेनेच्या विनायक राउत यांच्याकडून पराभूत झाले होते. निलेश राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. निलेश राणे यांचेच भाऊ नितेश नारायण राणे विद्यमान महाराष्ट्र विधानसभा सदस्य आहेत.
'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' म्हणून राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे. 'महाराष्ट्र स्वाभिमान या पक्षाचा नोंदणीकृत पत्ता - २०२ संत निवास, १४ वा लिंक रोड, राजकुमार ज्वेलर्सच्यावर, खार (प), ४०००५२ असा आहे. या पत्यावर यापूर्वी प्रवीण प्रताप राणे यांच्या नावे अनेक कंपन्या रजिस्टर आहेत. अनेक कंपन्यामध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेले प्रवीण प्रताप राणे हे PURE FOODS & BEVARAGES PRIVATE LIMITED या कंपनीत नारायण राणे यांचे भागीदार संचालक आहेत.  तर एकूण ५८ कंपन्यामध्ये राणे कुटुंबीय एकमेकांना भागीदार आहेत. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================




EVM vvpat कोणीही मतदार वंचित राहू नये, हे लोकसभा निवडणुकांसाठी आयोगाचे बोधवाक्य! पुणे लोकसभा मतदारसंघात ईव्‍हीएम व व्‍ही.व्‍ही.पॅट यंत्रांबाबत जनजागृती

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने
पुणे लोकसभा मतदारसंघात ईव्‍हीएम व व्‍ही.व्‍ही.पॅट यंत्रांबाबत जनजागृती 


पुणे लोकसभा मतदारसंघात ईव्‍हीएम व व्‍ही.व्‍ही.पॅट यंत्रांबाबत जनजागृती करताना 

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या वतीने पुणे लोकसभा मतदारसंघात ईव्‍हीएम व व्‍ही.व्‍ही.पॅट यंत्रांबाबत निवडणूक आयोगाच्या जनजागृती उपक्रमात सहभाग घेतला. पुणे शहरातील सर्व मतदारसंघात ईव्‍हीएम व व्‍ही.व्‍ही.पॅट यंत्रांबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. कसबा विधानसभा मतदारसंघात मतदारांनी सर्वाधिक प्रतिसाद दर्शवला. आपण केलेल्या मतदानाची पोहोच पावती देणाऱ्या व्ही व्ही पॅट यंत्रणेचं प्रात्यक्षिक सामान्य मतदार, युवक, वृद्ध नागरिकांना दाखवण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्ही व्ही पॅट यंत्रणेबद्दल सर्व मतदार संघात जनजागृती केली जात असून त्या मोहिमेचा एक भाग म्हणूनच या प्रात्यक्षिकाचंचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा  मतदार संघात गेली काही दिवसांपासून अशा प्रकारे या यंत्रणेचे प्रात्यक्षिक सादर केले जात असून मतदारांमध्ये त्याविषयी असणाऱ्या सर्व शंकांचं निरसन देखील केले जात असल्याचे पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचे संचालक चंद्रकांत भुजबळ यांनी म्हंटले आहे.  
================================================

मतदार  जागृती व शिक्षण कार्यक्रम (स्‍वीप)

भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगयांच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्‍ह्यात सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍टोरल पार्टीसिपेशन (स्वीप) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या कालावधीत मतदार वर्गांना जागृत, प्रशिक्षित करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि प्रत्येक नागरिकानेभारतीय लोकशाहीचा मुख्य घटक म्हणून आपला मतदानाचा मुलभूत अधिकार बजावणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्‍यासाठी मतदार जागृती व शिक्षण कार्यक्रम फार महत्‍त्वाचा घटक ठरला आहे. मतदान प्रक्रियेत मुख्यत्वे दोन महत्त्वाचे घटक- १)  मतदान केंद्राची सुसज्ज व्यवस्था व सुलभ मतदान करण्याची व्यवस्था तयार करणे 
२) मतदारांना जागृत करून मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदान करण्यास आवाहन करणे आणि त्यासाठी नावीन्‍यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे. आजपर्यंत जाणीव – जागृती कार्यक्रमात स्वयंसेवी संस्थाद्वारे मुख्यत्वे पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, शपथ समारोह, प्रभात फेरी इत्यादी पारंपरिक पद्धतीचा वापर केला जात आहे. परंतु सध्‍याच्‍या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी स्वीपमध्ये विशेषता नावीन्यपूर्ण कल्पना संकल्पना आणि मतदान मतदार जागृतीची शासन यंत्रणा उभी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नवीन संकल्पना सांगितल्या आहेत.
भारत निवडणूक आयोग नवीन संकल्पना-
१) चुनाव पाठशाळा
2) महाविद्यालय स्तरावर मतदार जागृती मंडळाची स्थापना,  प्रशिक्षण  कामे व जबाबदारी 
३) माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर भविष्यातील मतदारांसाठी मतदान मतदार जागृती मंडळाची स्थापना व प्रशिक्षण
४) मतदार जागृती मंचाची स्थापना
 सर्व शासकीय राज्य शासकीय आणि केंद्र शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालय, सहकारी संस्था कार्यालय, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांची कार्यालये, कारखाने, सर्व खासगी व्यवस्थापनाची कार्यालय आणि स्वयंसेवी संस्थांची कार्यालय याठिकाणी मतदार जागृती मंचाची स्थापना करून जाणीव जागृती उपक्रम, चर्चासत्र, स्पर्धा, दृकश्राव्य साधनांद्वारे जागृती आणि सर्व कर्मचाऱ्यांची मतदान नोंदणी करणे हे या समितीचे मुख्य कार्य आहे. 
५) दिव्यांग मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन- या लोकसभा निवडणुकांचे ब्रीदवाक्यच ‘सुलभ निवडणुका’  हे आहे. यात कोणत्याही प्रकारचा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहता कामा नये.  दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्‍टया दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त करून त्यांच्यासाठी मतदार नोंदणी करण्यास मदत करणे. त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी - येण्यासाठी सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्‍ती करणे  इत्यादी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिव्यांग जनजागृती कार्यक्रमांमध्ये निश्‍चीत करण्‍यात आल्‍या आहेत.
६) महाविद्यालयातील कॅम्पस अँम्बेसिडरचा मतदार जनजागृतीमध्ये  सहभाग- महाविद्यालय स्तरावर सहभाग वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर तरुणांना प्रोत्साहित करून स्थानिक समुदायांमध्ये जसे ग्रामस्थ,  वस्ती- वाड्यांवर जागृतीच्या मोहिमांमध्‍ये महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांचा सहभाग वाढवणे. 
मतदार जाणीव जागृती व शिक्षण यामध्ये स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी काय उपक्रमराबवू शकतात-
 १) सर्व गृहनिर्माण संस्था, सहकारी संस्था, पतसंस्था सहकारी संस्था इत्यादी ठिकाणी जाऊन मतदारांसाठी शपथ समारंभाचे आयोजन, पथनाट्य, चर्चासत्र, दृक-श्राव्य साधनांद्वारे भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या चित्रफिती, क्लिप्स, व्हिडीओ क्लिप्स, संदेश, चित्रसंदेश मतदारापर्यंत पोहोचविणे, स्पर्धांचे आयोजन करणे,विशेषत: महिला मतदार आणि युवक - युवती मतदारांचे  मेळावे, चर्चासत्र आयोजित करणे, सोशल मीडियाचा उपयोग करून आदर्श आचारसंहितेचे पालन करत मतदारापर्यंत मतदान जागृती संदेश पोहोचवणे.
२) शाळा आणि महाविद्यालय, माध्यमिक कनिष्ठ, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय इत्यादी स्तरावर स्थापन झालेला मतदार जागृती क्‍लबने  पथनाट्य बसवून महाविद्यालयात आणि महाविद्यालयाबाहेरील समुदायामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये वाड्या - वस्त्यांमध्ये त्या कार्यक्रमाचे आयोजन करणे.
 ३) ग्रामस्तरावर चुनाव पाठशाळा – ग्रामस्‍तरावर  चुनाव पाठशाळा सदस्यांना सक्रिय करून त्यांना मतदार जागृती प्रशिक्षण देणे आणि संबंधित मतदान केंद्र अधिकारी म्हणजे बीएलओ  यांच्याशी संपर्क करून ग्रामीण जनतेला जागृत करण्याचे कार्य विविध उपक्रमांद्वारे करणे.
 ४) खाजगी संस्था, कंपन्या यांच्या मदतीने त्यांच्या कर्मचाऱ्यांची जागृती होण्यास सहाय्य करणे.
मतदार जागृती मध्ये लक्षात घ्यावयाच्या विशेष बाबी-
 १) आपल्या मतदान केंद्रावरील बीएलओ  त्यांच्याशी सतत संपर्कात राहून त्यांना मतदार जागृती कार्यक्रम व मतदान नोंदणी अभियानात सक्रिय मदत करणे.
२) मतदारांना वेगवेगळ्या माध्यमातून मतदार नोंदणीची, मतदान करण्यासाठीची  जागृती केली पाहिजे, असे पोस्टर, बॅनर, होर्डिंग याशिवायसोशल मीडिया म्हणजेच समाजमाध्यमे, रेडिओ,  कम्युनिटी, रेडिओ इत्यादी माध्यमांद्वारे मतदार जागृतीचे संदेश पोहोचविणे.
३) मतदार ओळखपत्र - प्रत्येक मतदारांना मतदार ओळखपत्र  बीएलओ द्वारा घेण्यासाठी मदत करणे आणि सहाय्य करणे. ४) मतदार सहायक केंद्राद्वारे मतदारांना आपले नाव तपासून पाहण्याची सोय उपलब्ध करून देणे, राज्‍याच्‍या मुख्य निवडणूक अधिकारीयांच्या पोर्टलवरून मतदारांचे नाव यादीत आहे की नाही याविषयी त्यांना माहिती करून देणे. ५) नैतिक मतदानाची माहिती - मतदारांना नैतिक मतदानाची माहिती व जागृती करून देणे, भारतीय लोकशाहीत नागरिकांचे कर्तव्य आणि मतदानाची पावित्र्य राखण्यासाठी विविध माध्यमांद्वारे नैतिक मतदानाचे महत्‍त्वपटवून देणे, विशेषत:  चर्चासत्रे, वक्‍तृत्‍वस्‍पर्धा, रॅली, मानवी साखळी व शपथपत्र इत्यादी माध्‍यमांचा  नैतिक मतदानासाठीचा उपयोग करता येतो.
६) मतदान केंद्राची माहिती सामान्य जनतेला पोहोचणे, मतदान केंद्रासंबंधी सहाय्य करणे.
 ७) आदर्श मतदान केंद्र उभारण्‍यासाठी विशेष मदत व सहाय्य करणे - लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मतदान प्रक्रिया लोकशाही उत्सव म्हणून साजरा करणे आणि प्रत्येक मतदारांना मतदान करण्यासाठी आणि मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्य करणे, 
आदर्श मतदान केंद्रासाठी नावीन्‍यपूर्णखालील बाबींचा उपयोग करता येईल. १) पहिल्या शंभर मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्‍वागत करणे २) मतदान केंद्रावर रांगोळी काढणे आणि मतदान केंद्र सुशोभित करणे ३) मतदान केंद्रावर सनई चौघडे वाजविणे ४) दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर आहे की नाही याची चौकशी करून ते उपलब्ध करून देणे ५) ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी सहाय्य करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे  इत्यादी नावीन्‍यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या परिसरातील मतदान केंद्र आदर्श करण्याचा प्रयत्न करणे, जसे आपण समारंभासाठी जय्यत तयारी करतो तसे मतदान केंद्र साठी आणि मतदानासाठी तयारी करणे. ८) इलेक्‍ट्रॉनिक व्‍होटींग मशीन (इव्हीएम) व्‍होटर व्‍हेरिफीएबल पेपर ऑडीट ट्रेल (व्‍हीव्‍हीपॅट) बाबत जागृती - व्‍हीव्‍हीपॅट ही नवीन प्रणाली असून मतदारांना डेमो देऊन तज्ञ अधिकाऱ्यांना आमंत्रित करून व्‍हीव्‍हीपॅट जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे. या प्रणालीमुळे आपण मतदान कोणाला केले हे दिसते आणि पारदर्शकता निर्माण होते. पुणे जिल्‍ह्यात जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वीपचे सुभाष बोरकर,आशाराणी पाटील, यशवंत मानखेडकर हे विविध स्‍वयंसेवी संस्‍था यांच्‍या सहकार्याने मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवत आहेत.
=================================================

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज

सोशल मीडियावरील पोस्टबाजी यांवर लक्ष देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची तयारी जिल्हा प्रशासनाने केली असून निवडणूक काळात होणाऱ्या पेड न्यूज ,आर्थिक व्यवहारांवर आणि सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करणार आहे. तसेच मोबाईल नेटवर्क पोहचत नाही, अशा ६९ ठिकाणांशी सुसंवाद ठेवण्यासाठी सॅटेलाईट फोन खरेदी केले जाणार आहेत,असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. त्यांनी पुणे जिल्ह्यातील, पुणे, मावळ, बारामती व शिरूर लोकसभा मतदार संघाची सविस्तर माहिती दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आदी होते. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे सप्टेबर २०१८ पासून जानेवारी २०१९ पर्यंत अधिकाधिक मतदारांची नोंदणी करून घेतली. अजूनही मतदारांची नोंदणी करण्याचे काम सुरू असून निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतरही मतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग मतदारांना कोणत्या सुविधा हव्या आहेत,याबाबतची माहिती त्यांनी जिल्हा प्रशासनाला मोबाईल अँपद्वारे कळवता येणार आहे.त्यानुसार दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी आदी तालुक्यात काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क किवा वायरलेस यंत्रणा काम करत नाही. जिल्ह्यात अशी ६९ ठिकाणे आहेत. निवडणूक काळात या ठिकाणांशी संपर्क ठेवता यावा, या उद्देशाने सॅटेलाईट फोन खरेदी केले जात आहेत.त्यासाठीचा आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करून घेण्यात आला आहे. तसेच मागील निवडणूकांचा अनुभव विचारात घेवून जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर योग्य पोलीस बंदोबस्त व इतर यंत्रणा उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे १ कोटी ४ लाख असू शकते. या लोकसंख्येच्या तुलनेत पुण्यात सध्या ७३ लाख ६३ हजार ८१२ मतदारांची नोंदणी झालेली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मतदारांची संख्या ६३ लाख ४८ हजार ७०४ एवढी होती. यंदा १८ ते १९ वर्षे वय असलेल्या मतदारांची संख्या ५४ हजार ११५ आहे. निवडणूक प्रक्रियेत काम करणा-या कर्मचा-यांना मतदान करता यावे,यासाठी सुमारे ५५ हजार कर्मचा-यांची पोस्टल पध्दतीने मतदान करून घेतले जाणार आहे. पुरूष मतदारांच्या गुणोत्तर प्रमाणात महिला मतदारांच्या संख्या वाढली आहे असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक- आकडेवारी
एकूण मतदार  ७३,६३,८१२ (२०१९) , ६३,४८,७०४ (२०१४)
पुरूष मतदार ३८,५१,४४५ (२०१९), ३३,५३,६८८ (२०१४)
महिला मतदार ३५,१२,२२८  (२०१९), २९, ९५, ००४ (२०१४)
ट्रान्सजेंडर -१३९ (२०१९), १ (२०१४)
नवमतदार- ५४,११५ (२०१९),६९,२६१ (२०१४)
दिव्यांग मतदार- १३,७४९  
यादीतून वगळलेले मतदार -५९,९२२
================================================

कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न--विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवारी दि. 2 आणि रविवारी दि. 3 मार्च रोजी पुणे विभागात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत पुनर्निरिक्षण कार्यक्रमात वंचित राहिलेल्या नागरिकांना नावनोंदणी करून लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. पुणे विभागातील कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याच माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा निवडणुक 2019 च्या तयारीचा आढावा आणि विशेष मतदार नोंदणी मोहिम या बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उप आयुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उप आयुक्त (महसूल) प्रताप जाधव उपस्थित होते.डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, एक जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकानुसार ३१ जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली. दि. 23 व दि. 24 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना या विशेष मोहिमेद्वारे नावनोंदणी करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या विशेष मोहिमेमुळे ज्यांना नव्याने मतदार नोंदणी करायची आहे, ज्यांचे मतदार यादीतून नाव वगळले गेले आहे, अथवा मतदार नोंदणी अभियानात ज्यांनी नावनोंदणी केलेली नाही, अशा नागरिकांना मतदार नोंदणीची ही शेवटची संधी आहे. या मोहिमेत नोंदणी करणाऱ्या मतदारांची नावे आगामी निवडणुकपूर्व यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. 
अशी करा नोंदणी 
- प्रत्येक मतदार केंद्रावर मतदार नोंदणीसाठी शिबिराचे आयोजन. 
- या केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारतील. 
- 'बीएलओ'कडे अर्ज क्रमांक '६', '७', '८' व '८ अ' हे अर्ज उपलब्ध असतील. 
- मतदारांना हे अर्ज भरून 'बीएलओ'कडे देता येईल. 
- नोंदणी झाल्यावर मतदारांची नावे निवडणूकपूर्व मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल. 
नव मतदारांच्या नोंदणीवर विशेष भर
- ज्या युवक-युवतीचे वय 18 ते 19 वर्षे आहे त्यांच्या नाव नोंदणीवर विशेष भर
-कोल्हापूर, पुणे, सोलापूरच्या विद्यापीठांच्या कुलगुरूंशी नोंदणी बाबत चर्चा.
-शिकण्यासाठी शहरात आलेल्या नवमतदारांची नोंदणी त्यांच्या गावी करण्याची व्यवस्था.
- नवमतदारांची नोंदणीवर विशेष भर-
 गो-व्हेरीफाय मोहिम- मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांजवळ १ जानेवारी २०१९ च्या अर्हता दिनांकानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी उपलब्ध असेल. या यादीत मतदारांना आपल्या नावाची पडताळणी करता येणार आहे. मतदान ओळखपत्र हे केवळ ओळख पटविण्यासाठीच असून, मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी. 
मतदार यांद्याचे चावडी वाचन- 
ग्रामीण भागातील निरक्षर मतदारांसाठी मतदार याद्यांचे त्यांच्या गावातील चावडीवर वाचन करण्यात येणार आहे. त्यामुळे निरक्षर व्यक्तीलाही आपल्या नावाची खात्री मतदार यादीत करता येवू शकते.
 दिव्यांगांसाठी विशेष सोयी-
मतदान प्रक्रीयेत दिव्यांग व्यक्ती राहू नये, मतदान करताना त्यांना कोणताही त्रास होवू नये यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सोयी-सवलती देण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तीसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याच बरोबर मतदार संघातील मूकबधिर व्यक्तींसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. 
महिलांचा टक्का वाढला-
पुणे विभागात नव्याने करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिलांच्या नावांच्या नोंदीची संख्या वाढली आहे. या मुळे मतदार यादीत महिलांचा टक्का वाढला आहे. युवकांबरोबर महिलांच्या नावनोंदणीला ही विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. नवविवाहीत महिलांच्या नावांची नोंदणीही करण्यात येत आहे. नवविवाहितांना नोंदणीसाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे. 
येथे करा ऑनलाइन नावनोंदणी
- मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या वेबसाइटवर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा. 
-www.ceo.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अधिक माहिती घेता येईल. 
- नोंदणीविषयी अधिक माहितीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध.
================================================

सर्वांच्‍या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल- जिल्‍हाधिकारी राम


आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या दृष्टिने सर्व समन्वय अधिका-यांनी ( नोडल ऑफीसर्स) योग्‍य ती पूर्वतयारी केल्‍याबद्दल जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी समाधान व्‍यक्‍त केले असून सर्वांच्‍या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडली जाईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, बारामती लोकसभा मतदार संघाचे सुभाष डुंबरे, शिरुर लोकसभा मतदार संघाचे रमेश काळे,उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.जिल्‍हाधिकारी श्री. राम यांनी प्रारंभी समन्‍वय अधिका-यांकडून त्‍यांच्‍यावर सोपवण्‍यात आलेल्‍या जबाबदारीची आणि त्‍यांनी केलेल्‍या पूर्वतयारीची माहिती  घेतली. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्‍त्‍वाची असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मतदार जागृतीसाठी (स्‍वीप कार्यक्रम) विविध सामाजिक व स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेण्‍यात येणार असून पथनाट्ये, पोस्‍टर्स, वैयक्तिक भेटी, कलापथक अशा विविध साधनांचा वापर केला जाणार आहे. वृत्‍तपत्रे,  रेडिओ,दूरचित्रवाणी, तसेच सोशल मिडीयाद्वारेही जनजागृती केली जाणार आहे.बैठकीत मतदान केंद्रे, मतदान केंद्रावरील मुलभूत सुविधा,( रॅम्‍प, वीज, पाणी, प्रसाधनगृहे),  दिव्‍यांग मतदार याबाबत माहिती घेण्‍यात आली.
=======================================

‘कोणीही मतदार वंचित राहू नये’ हे लोकसभा निवडणुकांसाठी आयोगाचे बोधवाक्य!


लोकसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘कोणीही मतदार वंचित राहू नये’ हे बोधवाक्य (मोटो) ठरविले असून असून मतदार आपले मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी मतदारांनी पुढाकार घ्यावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. टपाली मतदान पोहोचण्यास होणारा विलंब लक्षात घेता आयोगाने सर्व्हीस वोटर्ससाठी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) तयार करण्यात आली आहे. त्यामुळे मतदान चिठ्ठीचा एका बाजूचा प्रवास वाचणार असून मतदानानंतर स्पीड पोस्टने तात्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे टपाली मतदान पाठविता येणार आहे.

मुक्त, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यास वचनबद्ध - निवडणूक आयुक्त अशोक लवासा



आगामी लोकसभा निवडणुका मुक्त, शांततापूर्ण, निर्भय वातावरणात आणि पारदर्शक तसेच सर्वसमावेशक पद्धतीने पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा यांनी पत्रकार परिषदेत दिली.सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेला भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्यासह राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार, भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण, महासंचालक (व्यय) दिलीप शर्मा यावेळी उपस्थित होते.यावेळी श्री. लवासा यांनी माहिती दिली, कालपासून दोन दिवस आयोगाने राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. सर्व राष्ट्रीय पक्ष, तसेच राज्यातील मान्यताप्राप्त पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर बैठका घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले. याशिवाय मुख्य निवडणूक अधिकारी आणि पोलीस नोडल अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. निवडणुकीतील पैशाचा गैरवापराला आळा घालण्याच्या दृष्टीने आयकर विभाग, पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय), परिवहन विभाग, भारतीय पोस्ट आदी विभागांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. आज राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. याशिवाय राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा निवडणूक प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला.श्री. लवासा म्हणाले, मतदार याद्यांची काटेकोर तपासणी करुन त्या अचूक असतील याची काळजी घेण्यास निवडणूक आयोगाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार याद्या अचूक असल्याबाबत खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही राजकीय पक्षांनी निवडणूक याद्यांविषयी प्रश्न उपस्थित केले होते. त्या अनुषंगाने तपासून कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दुबार मतदार शोधण्यासाठी आयोगाचे स्वत:चे सॉफ्टवेअर असून कोणत्याही एका व्यक्तीची एकापेक्षा अधिक ठिकाणी नावे असल्यास संबंधिताच्या संमतीने एका ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणची नावे वगळण्यात येतील.यावेळच्या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर आणि प्रत्येक ईव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅट यंत्रांचा शंभर टक्के वापर होणार आहे. त्यामुळे मतदार केलेल्या मतदानाची खात्री करु शकेल. याशिवाय व्हीव्हीपॅट यंत्रांमधील चिठ्ठयांच्या मोजणीसाठी त्या मतदार संघांतील कोणताही उमेदवार अर्ज करु शकेल. राज्यभरात व्हीव्हीपॅट जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 92 हजार 428 मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट जागृती मोहीम राबविण्यात आली असून 37 लाखांहून अधिक प्रतिरुप मतदान नोंदविण्यात आले आहे. अनिवासी भारतीयांना कोणत्याही पद्धतीची ऑनलाईन मतदानाची सोय नसून याबाबत चुकीची माहिती व्हॉट्सॲपवर प्रसारित करणारी पोस्ट करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिवासी भारतीय नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊनच मतदान करायचे आहे. निवडणुकीतील सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता मीडिया मॉनिटरिंग ॲण्ड मीडिया सर्टिफिकेशन (एमसीएमसी) समितीमध्ये सोशल मीडिया तज्ज्ञाचा समावेश करण्याबाबत कालच आयोगाने सुधारित सूचना जारी केल्या आहेत. या समितीकडून सर्व पेड न्यूज प्रकरणांची  तपासणीही केली जाईल. आयोगाने ‘कोणीही मतदार वंचित राहू नये’ हे या निवडणुकीसाठीचे बोधवाक्य (मोटो) ठरविले असून मतदार आपले मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी मतदारांनी पुढाकार घ्यावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. टपाली मतदान पोहोचण्यास होणारा विलंब लक्षात घेता आयोगाने सर्व्हीस वोटर्ससाठी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) तयार करण्यात आली आहे. त्यामुळे मतदान चिठ्ठीचा एका बाजूचा प्रवास वाचणार असून मतदानानंतर स्पीड पोस्टने तात्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे टपाली मतदान पाठविता येणार आहे.कोणत्याही नागरिकाला निवडणूक कालावधीत कोठे गैरप्रकार आढळून आल्यास तेथील छायाचित्र, व्हिडिओ चित्रफित मोबाईलवर अपलोड करण्यासाठी cVigil ॲप  तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गैरप्रकारांना निश्चितच आळा बसणार आहे. या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षांना निवडणुकीच्या अनुषंगाने विविध परवानग्यांसाठी SUVIDHA मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून सर्व परवानग्या एक खिडकी पद्धतीने दिल्या जातील. दिव्यांग मतदारांवर यावर्षी विशेष लक्ष देण्यात येत असून PwD वापर करुन दिव्यांग व्यक्ती मतदार नोंदणी, नाव, पत्ता आदी दुरुस्ती तसेच मतदान केंद्रावर व्हीलचेअर आदी सुविधांसाठी नोंदणी करु शकतील. 1950 या मतदार हेल्पलाईनचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत असून मतदार यादीतील नाव तपासणे तसेच अन्य मदतीसाठी या हेल्पलाईनचा वापर करता येणार आहे.

लोकसभा निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील – निवडणूक आयोग


भारत-पाकिस्तानमध्ये तणाव असला तरी लोकसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील असे निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. सर्व राजकीय पक्षांबरोबर चर्चा केली आहे. ईव्हीएम मशीनला लोकांनी फुटबॉल बनवल्याची खंत निवडणूक आयोगाने व्यक्त केली. लखनऊमध्ये दोन दिवस निवडणूक आयोगाची बैठक झाली. सध्या भारत-पाकिस्तामध्ये तणाव आहे. युद्धाची स्थिती असल्यासारखे वातावरण आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता व्यक्त होत होती. पण निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणूका ठरलेल्या वेळीच होतील हे स्पष्ट केले. एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान वेगवेगळया टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================


Sunday 24 February 2019

EVM Is ‘Information’ Under Right To Information Act, Rule ईव्हीएम ‘माहिती’च्या कक्षेत

EVM: ईव्हीएम ‘माहिती’च्या कक्षेत


इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ईव्हीएम माहिती अधिकाराच्या कक्षेत येते आणि त्याबाबत कोणीही माहिती मागवू शकतो, असे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे. दहा रुपये भरून अर्ज केल्यास कोणत्याही अर्जदाराला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबत माहितीची मागणी करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आयोगाच्या या स्पष्टीकरणानंतर निवडणूक आयोगाकडे येणाऱ्या अर्जावर आयोगाला उत्तर द्यावे लागेल किंवा कायद्यानुसार तो अर्ज नाकारावा लागेल. मात्र, त्यालाही माहिती आयोगापुढे आव्हान देता येणार आहे. निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमबाबत माहिती मागवणारा अर्ज आला असून त्याबाबत मुख्य माहिती आयुक्त सुधीर भार्गव यांनी हा निर्णय दिला आहे. ईव्हीएमचा माहिती या संज्ञेखाली समावेश असून त्याविषयी निवडणूक आयोगाकडे माहिती मागवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने रजाक खान हैदर यांचा अर्ज ईव्हीएम माहितीच्या संज्ञेखाली येत नसल्याचे नमूद करत फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रीय महिती आयोगाकडे धाव घेत या निर्णयाला अव्हान दिले होते. माहिती कायद्याच्या कलम २ एफ आणि २ आयनुसार माहिती, दस्ताच्या व्याख्येमध्ये कोणतेही यंत्र किंवा नमुन्यांचा प्रकार येत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्याच कलमानुसार ही माहिती नाकारणे चुकीचे असल्याचेही म्हटले होते. कायद्यानुसार कोणताही अर्ज, दस्त, कागदपत्र, मेमो, ई-मेल, मतमतांतरे, हल्ला, प्रसिद्धीपत्रक, परिपत्रक, आदेश, नोंदणीपुस्तक, करार, अहवाल, नमुने, मॉडेल, संकलित माहिती यांबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार या कायद्यान्वये देण्यात आला आहे. त्यामुळे त्याबाबतची माहिती देण्याचे बंधन आयोगावर आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे ईव्हीएम उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. मात्र, ते विक्रीसाठी नव्हे तर प्रशिक्षणाच्या हेतूसाठी वापरले जात असल्याकडे आयोगाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच माहितीचा अर्ज नाकारल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

Friday 22 February 2019

maval lok sabha election 2019 होर्डिंग्जच्या माध्यमातून आजोबांना नातवाचे आर्जव! साहेब कार्यकर्त्यांची करू नका निराशा!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारंवार स्पष्ट करूनही पार्थ पवार निवडणूक लढविण्यावर ठाम!



"मी नाही तर कोणीच नाही" भाजप पदाधिकारी आमदाराचा हेका! 

वारंवार स्पष्ट करूनही राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हार मानण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आतापर्यंत 4 वेळा स्पष्ट केले आहे की, पार्थ पवार व रोहित पवार लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत. तरीही पार्थ पवार यांना कसा अनुकूल मतदार संघ आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न अनेकदा होत आहे. नातू पार्थ पवार आपले आजोबा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना होर्डिंग्जच्या माध्यमातून आर्जव करीत आहेत की, साहेब कार्यकर्त्यांची करू नका निराशा! 
"मी नाही तर कोणीच नाही" भाजप पदाधिकारी आमदाराचा हेका!
"मी नाही तर कोणीच नाही" असा विचारांची मनाशी गाठ बांधलेले भाजप आमदार पराभवाचे उट्‌टे काढण्याच्या मनस्थितीत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवार नसेल तर येथील दुसरे कोणीही स्थानिक उमेदवार नसावेत, माझ्याशिवाय कोणीही खासदार या भागातील होऊ नये असा विचार पक्का करून विरोधासाठी काय पण करण्याची इर्षा या भाजप पदाधिकारी आमदाराने बाळगली असून शिवसेनेचे विद्यमान खासदार पुन्हा उमेदवार असतील तर बाहेरील उमेदवाराला मदत करून पराभवाचे उट्‌टे काढण्याचा चंग बांधला आहे. बाहेरील उमेदवार दुसरा तिसरा कोणीही नसून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांचे नातू आहेत. कारण पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असतील तर अंतर्गत मदतीचे आश्वासन दिले असल्याचा दावा स्थानिक युवा कार्यकर्ते करीत आहेत. भाजप-सेना युती झाल्यामुळे भाजप इच्छूक उमेदवाराच्या अशा मावळल्या असून मुख्यमंत्री यांना नगरसेवकांच्या माध्यमातून भाजपला मतदारसंघ कसा अनुकूल आहे हे निवेदनाद्वारे सांगूनही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने आता आशा सोडावी लागली आहे. त्यामुळे "मी नाही तर कोणीच नाही" असा विचारांची मनाशी गाठ बांधलेले भाजप आमदार पराभवाचे उट्‌टे काढण्याच्या मनस्थितीत आहेत. या परिस्थितीचा लाभ उठवण्याची तयारी त्यांचे निकटवर्तीय, नातेवाईक यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. वारंवार स्पष्ट करूनही राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हार मानण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आतापर्यंत 4 वेळा स्पष्ट केले आहे की, पार्थ पवार व रोहित पवार लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत. तरीही पार्थ पवार यांना कसा अनुकूल मतदार संघ आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न अनेकदा होत आहे. नातू पार्थ पवार आपले आजोबा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना होर्डिंग्जच्या माध्यमातून आर्जव करीत आहेत की, साहेब कार्यकर्त्यांची करू नका निराशा! 
मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा चंग पार्थ पवार यांनी बांधला आहे. मुंबईतील एका कंपनीला जाहिरात व अनुषंगिक काम करण्यासाठी नियुक्त केलेले आहे. गेली काही दिवस त्यांचे राजकीय प्रमोशन केले जात आहे. नुकत्याच लोणी काळभोर येथील कार्यक्रमात अजित पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यापैकी कुणीही आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे स्पष्ट केले होते. लोणी काळभोर येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वतीने विश्व राजबाग येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी (ता. 19) पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमानंतर एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने लोकसभा निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना पवार यांनी अजित पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यापैकी कोणीही आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे सांगून स्पष्ट केले होते. गेल्या कांही महिन्यापासून पार्थ पवार यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमाना हजेरी लावून लोकसभेसाठी आपणही इच्छुक असल्याचे दाखवून देण्यास सुरुवात केली होती. मात्र खुद्द शरद पवार यांनीच अजितदादा, पार्थ पवार किंवा रोहित पवार निवडणुक लढविणार नसल्याचे स्पष्ट केल्याने या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र हार मानण्याची कदाचित तयारी पार्थ पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची नसावी त्यामुळे पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यक्षेत्रात, साहेब कार्यकर्त्यांची करू नका निराशा! पार्थ दादा आहे आमची उद्याची आशा! जाणीव झाली आता बदल हवा! चेहरा नवा पार्थ पवार हवा! अशा आशयाचे फलक सर्वत्र झळकत आहेत यामुळे आजोबांच्या स्पष्टीकरणाला कार्यकर्ते व पार्थ पवार यांचे समर्थक किमत देत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा केल्याचा परिणाम आगामी काळातच दिसेल हे मात्र नक्की! मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक प्रयोग करूनही राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश मिळत नसल्याने आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ याला येथून लढविण्याची तयारी केली असल्याची चर्चा असून  ‘हल्लीची पिढी स्वत:चे निर्णय स्वत:च घेते’ असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. मावळ लोकसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या कोणत्याही एका पक्षाच्या प्रभावाखाली नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) या प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व असलेला मतदारसंघ आहे. विरोधकांच्या मत विभाजनामुळेच मागील दोन टर्म शिवसेनेला यश मिळाले आहे. 2014 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी शेकाप-मनसेच्या पाठिंब्यावर लोकसभा लढविली होती. आताही त्यांचे समर्थक त्यांनी लोकसभा लढवावी, म्हणून प्रयत्नशील आहेत.

श्रीरंग बारणे यांचे नशीब पुन्हा.....!

नशीब व श्रद्धा यावर विश्वास असलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे नशीब पुन्हा फळफळणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. युती झाल्याने खासदार व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. भाजप -सेना युती झाली नाही तर निवडणूक लढवण्यास अनुत्सुक असलेले श्रीरंग बारणे यांना युती झाली तरीही निवडणूक सुकर होईल असे वाटत असले तरी काही समर्थक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विजयाचा मार्ग कठीण वाटत आहे. भाजपच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकार्यांची साथ मिळणे कठीण आहे. गेल्या वेळी श्रीरंग बारणे यांना साथ दिलेल्या बहुतांश मान्यवरांनी त्यांच्या पासून फारकत घेतलेली आहे. शिवसेनेच्या निष्ठावंतांना अनेक पदावरून दूर करून निष्क्रिय समर्थकांना पदे मिळवून दिली असल्याचा रोष शिवसैनिकांमध्ये आहे. भाजपकडून स्थानिक पातळीचा विरोध, पक्षांतर्गत विरोध, केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराचा रोष यावर केवळ नशिबाने मात होईल असा अंधविश्वास बाळगून आहेत. त्यामुळेच त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे नशीब पुन्हा फळफळणार! 
दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ आहे.
पिंपरी (पुणे) – गौतम चाबुकस्वार, शिवसेना
चिंचवड (पुणे) – लक्ष्मण जगताप, भाजपा
मावळ (पुणे) – संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपा
कर्जत (रायगड) – आ. सुरेश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
उरण (रायगड) – आ. मनोहर भोईर, शिवसेना.
पनवेल (रायगड) – आ. प्रशांत ठाकूर, भाजपा
भाजप तीन, राष्ट्रवादी एक , शिवसेनेचे दोन असे विधानसभा आमदार बलाबल आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE PAY NOW- 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================


Thursday 21 February 2019

#Palghar election 2019 पालघर, सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी 24 मार्चला मतदान

पालघर, सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी 24 मार्चला मतदान

पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा) या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. पालघर, सिंदखेडराजा व लोणार या नगरपरिषदांच्या मुदती एप्रिल 2019 मध्ये संपत आहेत. या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. 3 व 4 मार्च 2019 या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी 8 मार्च 2019 रोजी होईल. मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE PAY NOW- 

https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtratil-rajkaran/?ref=store\
================================================

निवडणूक कार्यक्रम

         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे             : 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019
         नामनिर्देशनपत्रांची छाननी                 : 8 मार्च 2019
         उमेदवारी मागे घेणे                           : 13 मार्च 2019 पर्यंत
        निवडणूक‍ चिन्ह वाटप                      : 13 मार्च 2019
         मतदान                                           : 24 मार्च 2019
         मतमोजणी                                      : 25 मार्च 2019


लोणार नगर परिषद सध्याचे सदस्य

श्री.सुदन पुंजाजी कांबळे
सौ.संगीता गोविंद मापारी
अ.उबेद अ.मुनाफ
तोश्निवाल शैला गोपाल
सौ.रंजना राजेश मापारी
श्री.भूषण विश्वनाथ मापारी
शे.असलम शे.कासम
सौ.लता पंढरी  चाटे
सौ.सीमा नितिन शिंदे
शे.गफार शे.कादर
शांतिलाल मदनलाल गुगलिया
सफियाबी बेगम नुरमहम्मद खान
सौ.योगिता साहेबराव पाटोळे
खान मोमिनखान ताजमीरखान
सौ.वंदना अरुण जावळे
शे.समद शे.अहमद
सौ.सुशीला बाबुसिंग जाधव
गजानन जगदीश खरात
श्री.अंबादास कोंडूजी इंगळे
        


















POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

 मतदारसंघ निहाय प्राथमिक  सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE PAY NOW- 

https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtratil-rajkaran/?ref=store\
================================================