Wednesday 30 May 2018

पालघर लोकसभा मतदारसंघ पोट निवडणुकीत शिवसेनेचा पराभव अटळ! मतदानोत्तर चाचणीतून स्पष्ट

पालघर लोकसभा मतदारसंघ पोट निवडणुकीत शिवसेनेचा पराभव अटळ!

मतदारांची भाजपलाच सर्वाधिक पसंती; मतदानोत्तर चाचणीतून स्पष्ट


पालघर लोकसभा मतदारसंघात पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने या मतदारसंघात मतदानोत्तर चाचणी घेतली. यामध्ये मतदारांनी भाजपलाच सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले. तर त्याखालोखाल बहुजन विकास आघाडी व शिवसेनेला पसंती दिल्याचे दिसून आले. पालघर पोट निवडणुक मतदानाची टक्केवारी एकूण मतदानाच्या ५३.२२% झाले आहे. विधानसभा निहाय झालेले मतदान  पुढीलप्रमाणे- विक्रमगड - 1,58,030 , डहाणू - 1,49,366 , भोईसर - 1,51,833 , पालघर - 1,44,905 , वसई - 1,32,966 ,  नालासोपारा - 1,50,687 या मतदारसंघात एकूण मतदान १६ लाख ६८ हजार १४५ असून त्यापैकी ८ लाख ८७ हजार ७८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे अशी माहिती उपलब्ध आहे. पालघर लोकसभा क्षेत्रात २०८७ मतदान केंद्र असून यामध्ये डहाणू विधानसभा क्षेत्रात 327, विक्रमगडमध्ये 328, पालघरमध्ये 318, बोईसरमध्ये 338, नालासोपारामध्ये 449, तर वसई विधानसभा क्षेत्रात 327 मतदान केंद्र आहेत. यापैकी १२५३ मतदान  मतदान केंद्रावर कल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.






* नियोजनाचा अभाव; काही बेजाबदार निवडणूक कर्मचारयामुळे मतदारांच्या विश्वासाला तडा
* निवडणूक आयोगाकडून नियोजनाचा ढिसाळपणा!
* काही निवडणूक कर्मचारी यांची बेजाबदारपणे कृत्ये! 
* व्हीव्हीपीएटी Voter Verifiable Paper Audit Trail (VVPAT) प्रिंटींग मशीन कनेक्शन सुविधा मधील नियोजनाच्या अभावामुळे काही ठिकाणी गोंधळ व संभ्रम
* प्रशासनातील काही बेजाबदार अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्याची गरज

==========
पालघर लोकसभा पोट निवडणुकीसाठी आयोगाकडून निरीक्षक नियुक्त केले आहेत यामध्ये निवडणुक खर्च देखरेख निरीक्षक म्हणून रितू राज गुप्ता यांची नियुक्ती केली होती. गुप्ता हे  मुळचे उत्तर प्रदेशातील असून पंजाब राज्यात सेवेत आहेत त्यांचा संपर्क क्र. 8004931446 असा आहे. 
तर निवडणुक निरीक्षक म्हणून Dr. Pritam B.Yashvant (IAS) व Mr. Gorakh Nath (IAS) यांची नियुक्ती केली होती. Dr. Pritam B.Yashvant (IAS) (संपर्क क्र. 09636991122) यांच्याकडे लोकसभा मतदारसंघातील ३ (डहाणू, विक्रमगड, पालघर) विधानसभांची जबाबदारी होती तर Mr. Gorakh Nath (IAS) (संपर्क क्र.09431431837) यांच्याकडे लोकसभा मतदारसंघातील ३ (बोईसर, नालासोपारा व वसई) विधानसभांची जबाबदारी होती. 
तसेच कायदा व सुव्यवस्था, सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाच्या निवडणुक निरीक्षक म्हणून Mr. Tejraj Singh Kharodia (IAS) (संपर्क क्र.09414055899) यांची नियुक्ती केली होती.  Mr. Tejraj Singh Kharodia यांच्याकडे संपुर्ण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती.
==========




डहाणु लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २८ मे 2018 रोजी पोट निवडणुक घेण्यात आली. या मतदारसंघात सद्यस्थितीत बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने या मतदारसंघात मतदानोत्तर चाचणी घेण्यात आली यामध्ये घेतलेल्या चाचणीत संभाव्य निकाल काय असेल याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. डहाणु लोकसभेतून नव्याने निर्माण झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात शहरी व ग्रामीण अशी मत विभागणी झाली आहे. खरी लढत भाजपा व बहुजन विकास आघाडी या पक्षांमध्ये झाल्याचे दिसून आले. भाजपा व बहुजन विकास आघाडीच्या तुलनेत प्रचारात आघाडीवर असलेली शिवसेना मात्र मतदानात पिछाडीवर गेल्याचे मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट होत आहे. शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, भाजपाकडून राजेंद्र गावित, काँग्रेसकडुन दामु शिंगडा, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव, तर माकपाकडून किरण गहला या सर्वच उमेदवारांनी मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला मात्र मतांची विभागणी व स्थानिक राजकारण यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या वसई, नालासोपारा व बोईसर या तिन विधानसभा मतदारसंघात भाजपा व बहुजन विकास आघाडीला मतदारांनी पसंती दिली असल्याचे दिसून आले. या संपुर्ण मतदारसंघात कॉगे्रसची हवी तशी बांधणी नसल्याने काँग्रेससाठी ही निवडणुक आत्मपरीक्षण करणारी ठरेल. भाजपाने संपूर्ण ताकद एकवटली असल्याचे दिसून आले, दिवंगत खासदार चिंतामण वनगाच्या पुत्राने सेना प्रवेश केल्याने सहानुभूतीचा लाभ घेण्यात सेनेला अपयश आल्याचे मतदारांच्या भूमिकेवरून दिसून आले. बुलेट ट्रेन, वाढवन बंदर, सुपर हायवे या मुद्यांना सामोरे जाणारया भाजपाकडे सध्या कोणतीही लाट नसली तरी जिल्ह्याच्या ग्रामिण भागामध्ये संघ परिवार व अंगीभूत संघटनांची बांधणी पक्की असल्याचा भाजपला निश्चितच लाभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच शिवसेनेचे ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शिवसेनेच्या तुलनेत सर्वाधिक अंतर्गत प्रचार व मतदारांशी संवाद करण्यात भाजपने आघाडी मिळविली असल्याचे मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट होत आहे. काँग्रेसपेक्षा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मतदारांचा प्रतिसाद या मतदारसंघात जास्त असल्याचे जाणवले. लोकसभा पोट निवडणुकीतील विजयी उमेदवाराला जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळणार असल्याने कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास आपल्या समस्या सुटू शकतील याबाबतीत मतदारांमध्ये प्रारंभी संभ्रम होता. मात्र भाजपने मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, तारापूर औद्ययोगिक मंडळातील सीईटीपी, घनकचरा प्रश्न, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, रेल्वे प्रश्न, विना अनुदानित शाळांचा प्रश्न, किनारपट्टीवरील तुटलेले धूप प्रतिबंधक बंधारे, डिझेलचा परतावा, वसई-उत्तन व पालघर-डहाणू दरम्यान मच्छिमारांचा हद्दीचा वाद, दलालांकडून मच्छिमारांची होणारी लूट, अद्यायावत रुग्णालयाची कमतरता आदी प्रश्न महत्वाचे असल्याने अनुभवी आणि सत्ता पक्षात असणारा व्यक्ती या प्रश्नांना न्याय देईल की नवखा व्यक्ती या प्रश्नावर मतदारांमध्ये चर्चेतून सकारात्मकता भाजपने निर्माण केली याचा लाभ मतदानात झाल्याचे चाचणीत दिसून आले. बविआचे उमेदवार बळीराम जाधव याना देखील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना कामकाजाचा काहीच अनुभव नसल्याची नकारात्मक चर्चा आणि राजकारणातील उथळपणा, ऐनवेळी पक्षांतर यामुळे वडिलांची सहानभूती गमावल्याचे मतदारांच्या प्रतिसादावरून दिसून आले. गावितांची काम करण्याची क्षमता तसेच त्यांनी जिल्ह्यात केलेली विकासकामे व  समाजाशी त्यांची जोडलेली नाळ ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांच्या पक्षांतारचा मुद्दा मतदारांमध्ये चर्चिला गेला नाही, शिवसेनेने देखील या मुद्द्यावर भर दिला नाही. याचा मतदानावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे या पोट निवडणुकीत भाजप व बहुजन विकास आघाडीत खरी लढत असून शिवसेना तुलनेने तिसऱ्या क्रमांकावर असेल असा अंदाज मतदारांनी दिलेल्या पसंती वरून दिसून येतो.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


Tuesday 29 May 2018

ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व ; विराट आकर्षणामुळे विठ्ठल सरपंच!

ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व 

जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायती व २५८ ग्रामपंचायतींमधील ४५६ रिक्त पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. थेट जनतेतून सरंपच निवडीसाठी ही तिसरी निवडणूक होत असून, यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात बाजी मारली. जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ९० पैकी सर्वाधिक ६० ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळविण्यात राष्ट्रवादीला यश आले. बारामती आणि आंबेगाव तालुक्‍यातील निवडणूक झालेल्या सर्वच्या सर्व ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. या दोन्ही तालुक्‍यात काँग्रेस, भाजप, शिवसेनेला एकही ग्रामपंचायत मिळू शकलेली नाही.  जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी (ता. २८) मतमोजणी झाली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला शिरूर तालुक्‍यातील चार, मावळ तालुक्‍यातील चार, खेडमधील दोन अशा दहा ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपने दौंड तालुक्‍यातील दहापैकी सात ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापित केले आहे. काँग्रेसला पुरंदर तालुक्‍यातील पाच, इंदापूर तालुक्‍यातील दोन अशा सात ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. शिवसेनेला पुरंदर तालुक्‍यातील तीन, जुन्नर तालुक्‍यातील एक अशा चार ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. अन्य दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे.
निवडणूक झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती- बारामती- १५, शिरूर व भोर-  प्रत्येकी ६, पुरंदर व खेड- प्रत्येकी १३, दौंड व आंबेगाव-  प्रत्येकी १०, मावळ- ७, इंदापूर- ५, जुन्नर- ३, वेल्हे व मुळशी- प्रत्येकी १.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


================================

वाल्हे व सुकलवाडीवर राष्ट्रवादी तर वागदरवाडी व आडाचीवाडी या दोन ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता 

राष्ट्रवादी व कॉंग्रेसची आघाडी होऊनही राष्ट्रवादीला वर्चस्व राखण्यात अपयश

वाल्हे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन चार ग्रामपंचायती निर्माण झाल्याने त्या चारही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालेली होती. वाल्हे गावातील मतदान केंद्रावरील दोन गटात काहीकाळ झालेला तणावाचा प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. नव्याने स्थापन झालेल्या सुकलवाडी गावावर राष्ट्रवादी; तर वागदरवाडी व आडाचीवाडी या दोन ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आली. वाल्हे येथील ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सरपंचपदासह तब्बल सात जागा जिंकून शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या सरपंचपदाचे उमेदवार माजी सभापती गिरीश पवार यांचा राष्ट्रवादीचे अमोल खवले यांनी पराभव केला. शिवसेनेचे चार सदस्य निवडून आले. डॉ. दुर्गाडे यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याशी केलेल्या आघाडीमुळे राष्ट्रवादीला वाल्ह्यात सत्ता कायम राखण्यात यश मिळाले. खवले यांनी गिरीश पवार यांचा 823 एवढ्या उच्चांकी मतांनी दारुण पराभव केला.
श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : चंद्रशेखर दुर्गाडे, सुरेखा तानाजी भुजबळ, दीपाली शांताराम भोसले, अंजली दीपक कुमठेकर, चित्रा साधू जाधव, सूर्यकांत ज्ञानेश्वर भुजबळ
श्री भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : सुनीता मोहन ढोबळे, प्रकाश विठ्ठल पवार, इक्‍बाल सुलेमान आतार, हनुमंत पवार. अपक्ष: वैशाली दादासाहेब पवार. 

================================
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या ३७ सदस्य जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात होते.
दौंड तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीसाठी ८२.५१ टक्के मतदान झाले होते. वाखारी, पारगाव, नायगाव, पांढरेवाडी, कुरकुंभ, खोपोडी, वाटलूज, वडगावबांडे, पानवली, केडगाव या दहा ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी निवडणूक झाली. खोपोडी ग्रामपंचातीच्या सरपंचपदासाठी बिनविरोध निवडणूक झाल्याने या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक झाली नाही. 
राहुल कुल समर्थकांची राष्ट्रवादीवर मात!
ग्रामपंचायतीची निवडणूक पुणे जिल्हा परिषेदच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके व दौंड पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड यांनी प्रतिष्ठेची करूनही यश न मिळाल्याने त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीवर आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी वर्चस्व कायम राखले आहे. दौंड तालुक्यातील 32 गावांचा नाका म्हणून केडगाव ओळखले जाते. शेळके यांच्या कुटुंबियांनी स्वतःच्या वाखारी गावापेक्षा शेजारीच असणा-या केडगावच्या निवडणुकीला जास्त महत्व दिले. वाखारी गावच्या निवडणुकीत शेळके यांना सत्ता मिळविता आली नाही. राणी शेळके यांच्या जिल्हा परिषद गटात वाखारी, केडगाव, पारगाव, खोपोडी या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. यातील एकाही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळविता आलेले नाही. शेळके यांची जिल्हा परिषदेची ही दुसरी टर्म चालू आहे.  मात्र त्यांना स्वतःच्या गावावर सत्ता स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न यंदाही अधुरे राहिले आहे.
भोर तालुक्यातील ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन निवडणुक ३ ग्रामपंचायतीसाठी आज सरासरी ८५ टक्के मतदान झाले होते. भोर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन करंजे व अशिंपी ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. तर ३ पैकी २ ग्रामपंचायतींच्या सदस्य बिनविरोध झाले असुन एका नाटंबी ग्रामपंचायतीचे सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यांची निवडणुक झाली. यात एकुण ८५ टक्के मतदान झाले होते..सर्वाधीक मतदान वारंवड ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३ मध्ये ९४ टक्के मतदान झाले. तालुक्यातील रायरी व करंजे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन करंजे व अशिंपी ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिले आहेत. तर अशिंपीचे ७ पैकी २ जागा भरल्या असुन ५ ग्रामपंचायत सदस्यपदे रिक्त राहिले आहेत. तर नाटंबी ग्रामपंचायतीत सरपंचप महिलेसाठी राखीव असुन दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर ग्रामपंचायत सदस्याच्या ७ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. वरवंडला ५ सदस्य बिनविरोध झाले आहेत.
शिरूर तालुक्यातील अण्णापूर, शिरुर ग्रामीण, सरदवाडी, कर्डेलवाडी व वाजेवाडी या पाच ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली. 
वाजेवाडी गावात राष्ट्रवादीचा पराभव
वाजेवाडी (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत पद्मावती परिवर्तन पॅनलने परिवर्तन करीत गेल्या वीस वर्षांपासून एकहाती सत्तेत असलेल्या माजी सरपंच धर्मराज वाजे यांच्या पद्मावती ग्रामविकास पॅनलचा धुव्वा केला. यात धर्मराज वाजे यांचा 16 मतांनी पराभव करीत सरपंचपदासाठी मोहन वाजे विजयी झाले. वाजेवाडी हे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दत्तक घेतले असल्याने या निवडणुकीवर पालकमंत्री गिरीश बापट व आमदार बाबुराव पाचर्णे हेही विशेष लक्ष ठेवून होते. वाजेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह एकुण दहा जागांसाठी काल (दि.27) झालेल्या निवडणूकीत पद्मावती परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांनी मिळविलेले मतदान पुढील प्रमाणे. मोहन शिवाजी वाजे (सरपंचपदासाठी मिळविलेले मतदान 632), इतर सदस्य : गोपीचंद काळूराम भोंडवे (230), भारती शंकर लोहोट (260), अनिता सतिश शिंदे (248), अमित तानाजी सोनवणे (233), देविदास बबुशा भोर (254), अस्मिता जगदीश तिखे (283). पद्मावती ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार : आण्णा बबन शिंदे (241), माधुरी नानासाहेब वाजे (217), शारदा राजेंद्र मांजरे (216). वाजेवाडी ग्रामपंचायतीवर गेल्या वीस वर्षांपासून माजी सरपंच व राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक धर्मराज वाजे यांची एकहाती सत्ता होती. या निवडणुकीत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या काही प्रमुख पदाधिका-यांसह भाजपा, शिवसेना व इतर सर्वच विचारांचे पदाधिकारी एकत्र आले होते. यात सरपंचपदासाठीच्या निवडणूकीत धर्मराज वाजे यांचा 16 मतांनी पराभव झाला.
पुरंदर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. या ग्रामपंचायतींचा कारभार पाहण्यासाठी ४२ सरपंचपदाचे उमेदवार आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या २२४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रथमच थेट जनतेतून उमेदवार निवडण्यात येणार असल्याने मतदानात खूप उत्साह जाणवत होता. तेवढीच चुरस ही निर्माण झाली होती. तालुक्यातील वाल्हे, वीर, एखतपुर,- मुंजवडी, वनपूरी, उदाचीवाडी, राजुरी, माळशिरस, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, कोथळे, भोसलेवाडी, रानमळा, या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते.  वाल्हे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन चार ग्रामपंचायती निर्माण झाल्याने त्या चारही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालेली होती. वाल्हे गावातील मतदान केंद्रावरील दोन गटात काहीकाळ झालेला तणावाचा प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.पुरंदर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्तेच्या तुलनेत अपेक्षित कामगिरी शिवसेनेला करता आली नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीचे राजकारण करीत पाच- पाच ग्रामपंचायतीत विजय मिळवला. कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला 13 पैकी 10 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला तीन ठिकाणी यश मिळाले. या निवडणुकीत कॉंग्रेसने माळशिरस, राजुरी, कोथळे, वीर, रानमळा ह्या ग्रामपंचायती; राष्ट्रवादी कॉंग्रेसने वाल्हे, वनपुरी, भोसलेवाडी, सुकलवाडी, उदाचीवाडी आदी ग्रामपंचायती; तर शिवसेनेने एखतपूर- मुंजवडी, आडाचीवाडी, वागदरवाडी, भोसलेवाडी या ग्रामपंचायतीत यश मिळाल्याले आहे.
बारामती तालुक्यात रविवारी पार पडलेल्या एकूण १५ ग्रामपंचायतींसाठी ८७.९ टक्के मतदान झाले. यामध्ये १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर २ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत लढत होत झाली., तर चांदगुडेवाडीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत आणि भाजपा पुरस्कृत पॅनलमध्ये लढत झाली. तालुक्याजवळील कोहाळे खुर्द, सुपे, वंजारवाडी, करंजे, मगरवाडी, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, दंडवाडी, जराडवाडी, कारखैलेवाडी, कुतवळवाडी, पानसरेवाडी, साबळेवाडी, शिर्सुफळ, उंडवडी क.प. या गावांची सार्वत्रिक निवडणूक या टप्प्यात होती. त्यापैकी मगरवाडी आणि भोंडवेवाडी ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली, तर वडगाव निंबाळकर, गोजुबावी, सांगवी, वाकी, मेडद, मोरगाव या गावांची पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी वडगाव निंबाळकर आणि मेडद गाव वगळता उर्वरित चार गावांची पोटनिवडणूक बिनविरोध पार पडली. वडगाव निंबाळकरमध्ये एका जागेसाठी ६८ टक्के मतदान झाले होते. 
इंदापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत ८०.३९ टक्के मतदान झाले. दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकी साठी ८९.०७ टक्के मतदान झाले. बावडा, वकीलवस्ती, काझड, शिंदेवस्ती, लाकडी या पाच ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक व वरकुटे खुर्द, गिरवी, भिगवण, पिठेवाडी, रुई (थोरातवाडी) या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. बावडा ग्रामपंचायतीच्या १६ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या. शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या ९ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या. लाकडी ग्रामपंचायतीची १ जागा बिनविरोध झाली. भिगवण, वरकुटे खुर्द व गिरवी या ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी लागलेल्या पोटनिवडणूका बिनविरोध झाल्या. पिठेवाडी ग्रामपंचायतीच्या दोनपैकी एका जागेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. बावडा ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी, शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सहा जागा व काझड, वकीलवस्ती ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी व रुई व पिठेवाडी या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झाले होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


================================

विराट आकर्षणामुळे विठ्ठल सरपंच! 

हुबेहुब विराटसारखा दिसणारया सौरभ गाडेचा करिष्मा!


सौरभ गाडे ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आला होता. ते विठ्ठल घावटे लोकनियुक्त सरपंचपदाची निवडणूक लढवत होते, अखेर विठ्ठल घावटे हे रामलिंग गावाच्या सरपंचपदी निवडणुकीत निवडून आले आहेत. विठ्ठल घावटे हे १७०० मतांनी निवडून आले आहेत.मतदारांना आकर्षिक करण्यासाठी उमेदवार अनेक कल्पना लढवतात कारण शिरूर तालुक्यात रामलिंग गावात रामलिंग पॅनलच्या प्रचारासाठी चक्क क्रिकेटर, टीम इंडियाचा कॅप्टन सारखा दिसणारा हा विराट कोहली आला होता. रामलिंग पॅनलचं प्रचार चिन्हं देखील बॅट होतं, तेव्हा त्यांनी या विराटला प्रचारासाठी आणले आणि जीपवरून संपूर्ण गावात त्याची हातात बॅट घेऊन रॅली देखील काढण्यात आली, गावकऱ्यांनी विराट सारख्या दिसणाऱ्या या विराट सोबत सेल्फी काढण्याची हौस देखील भागवली.

डुप्लिकेट विराट कोहलीकडून ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार


निवडणुकीच्या मैदानात उभे राहिल्यानंतर मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार शक्य ते सर्व प्रयत्न करतात. या निवडणुकीतील रामलिंग पॅनलचा प्रचार करण्यासाठी ज्युनिअर विराट कोहली मैदानात उतरला होता. रामलिंग विकास पॅनलचे निवडणूक चिन्ह बॅट असल्यामुळे हातात बॅट घेऊन हा ड्युप्लिकेट विराट कोहली रामलिंग विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले होते. ड्युप्लिकेट विराट कोहलीच्या रोड शोला नागरिकांनी विशेषत: तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला होता. या विराट कोहलीला पाहण्यासाठी, त्याच्याशी हात मिळवण्यासाठी तरुणांची ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

हुबेहुब विराटसारखा दिसणारा हा कोण?


हुबेहुब विराटसारखा दिसणारा हा आहे, सौरभ गाडे. सौरभ गाडे हा इंजीनिअर आहे. सौरभ हा देहूचा आहे. मी देखील क्रिकेट खेळतो, लोक मला विराटसारखा दिसणारा म्हणून प्रेमाने बोलतात, फोटो काढतात, पण जास्त गर्दी झाली तर मला भीती वाटते, असे सौरभ गाडे याने म्हंटले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

+++====+++=====+++====+++=====+++====+++=====
+++====+++=====+++====+++=====+++====+++=====

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक वृत्त --












POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

Saturday 26 May 2018

"साम दाम दंड भेद" ही राजकीय कुटनीतीच! पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत कोण जिंकणार!

"साम दाम दंड भेद" ही राजकीय कुटनीतीच! 


चाणक्य यांच्या राजनीति शास्त्रातील मूळ नीतीमध्ये "साम दाम दंड  भेद" याचा समावेश आहे. "साम दाम दंड भेद" ही राजकीय कुटनीती  आहे. आजच्या काळात सर्वच राजकीय पक्ष या नीतीचा अवलंब करीत  आहेत. "साम दाम दंड भेद" असे शब्द प्रयोग वापरणे गैर नाहीच. 
   

साम- दाम -दंड- भेद म्हणजे साधारण अर्थ ?

(१) साम :---- साम म्हणजे सामोपचार. प्रतिस्पर्ध्याशी सर्वप्रथम सामोपचाराची बोलणी करावी. एकाएकी संतप्त होऊन संघर्षाला उभे ठाकू नये. (२) दाम :---- दाम म्हणजे पैसा, संपत्ती. प्रतिस्पर्धी  सामोपचाराने ऐकत नसेल, तर त्याला दाम देऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा. (३) दंड :---- दंड म्हणजे शिक्षा.प्रसंगी युद्ध करण्याची वेळ आली, तर युद्ध करावे. (४) भेद :--- भेद म्हणजे भिन्नभाव, दुरावा. प्रतिस्पर्ध्याशी सामोपचाराची बोलणी करूनही तो ऐकत नसेल, तर या टप्प्यावर त्याच्याशी असलेले शत्रुत्व उघडपणे मान्य करावे  आणि त्यानुसार पावले उचलावीत.


पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष शिगेला 


पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत केलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. 

निवडणूक आयोगाकडे भाजप व शिवसेनेने परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या तरी यामधून काहीही निष्पन्न होणार नाही. कारण ज्यांनी ही क्लिप एडिट करुन, लोकांना दिशाभूल केलं असा आरोप आहे त्यामध्ये क्लिप एडिट केली नसून ती अर्थवट जाहीर केल्याचे दिसून येत आहे. एखादी क्लिप किती जाहीर करावी किवा करू नये याबाबत काही बंधन नाही व असण्याचे कारण नाही, यामध्ये निवडणूक नियमांचे उलंघन होत नाही. तसे आक्षेपार्ह देखील नाही. मात्र पैसे वाटपप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलिसाच्या सखोल तपासातून स्पष्ट होईलच की हे कृत्य कोणाचे आहे. 

पैसे वाटपप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल

पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने ‘साम दाम दंड भेद’ वापरल्याचा आरोप अधिक गडद होत आहे. पैसे वाटपाच्या आरोपानंतर आज अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली. कलम १७१ अंतर्गत पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून एकूण १२ युवकांवर डहाणू पोलिस स्थानकात गुन्हा दाखल दाखल झाला. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पालघरमधील रानशेत भागात आज शिवसैनिकांनी काही लोकांना पैसे वाटताना रंगेहात पकडलं. त्यावेळी पैसे वाटणाऱ्यानी हे पैसे भाजपने आपल्याला दिल्याची कबुली दिली. भाजपचे शहराध्यक्ष अशोक अंबोरे यांचेच हे पैसे असल्याची कबुली पैसे वाटणाऱ्या तरुणांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून भाजपच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

भाजपने आरोप फेटाळले

शिवसेनेने केलेले आरोप भाजपने फेटाळले आहेत. हा शिवसेनेचा कट असून प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेकडून अशा नाट्यमय घडामोडी घडवून आणल्या जातात, असं प्रत्युत्तर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिलं. पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून या प्रकाराची सध्या चौकशी सुरु आहे.


ती वाक्ये ऐकवली असती तर शिवसेना तोंडावर पडली असती: मुख्यमंत्री

शिवसेनेने माझी ऑडिओ क्लिप जाहीर सभेत ऐकवली. पण ऑडिओ क्लिपमध्ये मोड- तोड करुन ती लोकांना ऐकवण्यात आली. साम-दाम-दंड- भेद याचा अर्थ कूटनीती असा होतो. कूटनीतीने प्रहार करणाऱ्यांना कूटनीतीचा उतारा द्यावा लागतो, असे माझे म्हणणे होते. त्या क्लिपच्या सुरुवातीची आणि शेवटची दोन वाक्ये ऐकवली असती तर शिवसेना तोंडावर पडली असती आणि त्यांना तोंड दाखवायलाही जागा उरली नसती, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली होती. यात फडणवीस यांनी साम-दाम-दंड- भेद याचा वापर करावा, असे म्हटल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या कथित ऑडिओ क्लिपवरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत होती. अखेर या क्लिपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वसईतील सभेत स्पष्टीकरण दिले. फडणवीस म्हणाले, ती ऑडिओ क्लिप माझीच आहे. ती ऑडिओ क्लिप १४ मिनिटांची असली तरी शिवसेनेने ती मोडून- तोडून जनतेसमोर आणली. क्लिपची पहिली आणि शेवटची दोन वाक्ये ऐकवली असती तर शिवसेना तोंडघशी पडली असती. आता मी स्वत:च ही क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे. मी काही चुकीचे केले असेल तर निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरे जाण्यास मी तयार आहे. पण मी निर्दोष सुटलो तर क्लिपमध्ये मोड- तोड करुन ती जनतेसमोर आणून त्यांची दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पराभव दिसू लागल्याने शिवसेना इतक्या खालच्या स्तराला गेली. ती क्लिप ऐकवणाऱ्या आदेश बांदेकर यांनी किमान सिद्धिविनायक मंदिराचा अध्यक्ष असेपर्यंत खरे बोलायला हवे होते.  पण तो आदेशाने काम करणारा आदेश बांदेकर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आम्ही कोणतेही काम केले की काही लोकांकडून विरोध केला जातो. त्यांनी पालघरच्या विकासाबाबत भाष्य केले नाही. ते फक्त प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेना होती. पण दुर्दैवाने ती आता शिवविरोध सेना झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. वसईतील माणिकपूर येथे शनिवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. यात त्यांनी शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली. पालघरमधील पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाठित खंजीर खुपसला. वनगा यांच्या मृत्यूचे भांडवल शिवसेना आणि वनगा यांचे चिरंजीव करत आहे. चिंतामण वनगा यांचा आत्मा त्यांना माफ करणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेनेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, शिवसेनेचे नेते आता मते मागायला येत आहेत. पण वसईतील बसेसच्या २६ फेऱ्या कोणी बंद केल्या?. शिवसेनेचे काही स्थानिक पदाधिकारी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्याकडे गेले. त्यावेळी रावतेंनी बससेवा सुरु करण्यास नकार दिला होता. आता हीच लोकं पोपटासारखं बोलत आहेत, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना हा बाळासाहेबांचा पक्ष आहे, त्यांची स्वप्नं होती, आता तो पक्ष कुठे गेला?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या भाषणांनी खालचे स्तर गाठले आहे. भाजपाचे रक्त तुम्ही पाहिलं नाही. तुमच्या जन्मापूर्वीपासून भाजपाने संघर्ष केला आहे. आमच रक्त भेसळयुक्त असल्याची टीका तुम्ही करताय. मग चिंतामण वनगा यांचे रक्तही भेसळयुक्त असल्याचे तुम्ही म्हणताय का? आणि हे बोलून त्यांच्याच मुलाला गावोगावी घेऊन फिरता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

श्रीनिवास कुठे फसलास रे बाबा

शिवसेनेने ‘सामना’मध्ये जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमधून श्रीनिवास वनगा गायब आहेत. निवडणुकीपूर्वीच ही अवस्था असेल तर नंतरच्या परिस्थितीचा अंदाज येईल. श्रीनिवास तू कुठे फसलास रे बाबा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.


मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप

पालघरमध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या भरसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप जगजाहीर केली. हे संभाषण मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. या ऑडिओ क्लिपची निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये केली.

काय आहे ही फडणवीसांची कथित ऑडिओ क्लीप?

एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता... आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे? ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही. आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा...साम, दाम, दंड, भेद...ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे.'अरे ला कारे'च करायचं..'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.


मुख्यमंत्र्यांनी जारी केलेली ऑडिओ क्लिप

एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता... आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?..ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही..आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे..ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा...साम, दाम, दंड, भेद...ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही...कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे...तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे...'अरे ला कारे'च करायचं..'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे..चिंता करु नका. आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी सक्षम आहोत. 

(शिवसेनेने इथवर दाखवली होती, त्यापुढची क्लिप मुख्यमंत्र्यांनी जारी केली)

आपण सरकार पक्ष आहोत. आपण कधी सत्तेचा दुरुपयोग करत नाहीत. 
परंतु आपल्या विरुद्ध जो कोणी दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला सोडणारही नाही. ही मानसिकता या निवडणुकीत ठेवली पाहिजे.

संपूर्ण क्लिप 14 मिनिटांची आहे. त्यात काही माझ्याबद्दल आक्षेपार्ह असेल, तर माझ्यावर कारवाई करा....पण ज्यांनी ही क्लिप एडिट करुन, लोकांना दिशाभूल केलं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे. असे मुख्यमंत्री यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्र्यांवर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा ! नवाब मलिक यांची मागणी

राज्याचे मुख्यमंत्री ऑडिओ क्लीपमध्ये सरळसरळ धमक्या देत आहेत. ते विरोधकांवर हल्ले करण्याची चितावणीखोर भाषा वापरत आहेत त्यामुळे त्यांच्यावर ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.पालघरमध्ये शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची एक ऑडिओ क्लीप ऐकवून दाखवली. त्यामधील मुख्यमंत्र्याची भाषा अशोभनीय आहे. विरोधकांवर हल्ले करा. मी सर्वाधिक मोठा गुंड आहे असे मुख्यमंत्री बोलत आहेत. त्यांची भाषा ही चितावणीखोरपणाची आहे. त्यामुळे ही ऑडिओ क्लीप निवडणूक आयोगाने ऐकून त्याची खात्री करुन किंवा वेळ पडल्यास फॉरॅन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवावी आणि पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही मलिक यांनी केली. पालघर,भंडारा-गोंदिया पोटनिवडणूका पराभूत होत असल्याचे लक्षात येताच भाजप साम-दाम-दंड-भेदाचा वापर करुन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. बळाचा वापर आणि पैशाचा वापर भाजपकडून केला जात आहे. कालच पालघरमध्ये पैसे वाटणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.शिवसेनेने ही ऑडिओ क्लीप बाहेर काढली आहे ती सभेत जनतेसमोर पुंगी म्हणून न वाजवता हिम्मत असेल निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. त्यावर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल होवू शकतो असेही  मलिक म्हणाले.

‘ती’ क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : अशोक चव्हाण


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कथित ऑडिओ क्लिपवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेतील वाद टोकाला पोहोचला असून शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला ‘जशास तसे उत्तर द्यावे’ असे म्हटले होते. साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला पाहिजे. अरे ला कारे करायचं. ‘अरे ला कारे’ मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे’, असे या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले होते. शिवसेनेने ऑडिओ क्लिप जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘निवडणुक आयोगाने याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी. क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा. क्लिप खोटी असेल तर उध्दव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी’, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवार, २८ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान 


पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून 2097 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.मतदान सोमवार 28 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, तर मतमोजणी 31 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे.या पोटवडणुकीसाठी 12 हजार 894 कर्मचारी, तसेच 4 हजार 219 सुरक्षा कर्मचारी कार्यरत राहणार आहे. पालघर जिल्ह्यातील 2097 केंद्रांपैकी 14 केंद्रांना संवेदनशील आहे.भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
तालुकानिहाय मतदान केंद्र
पालघर लोकसभा क्षेत्रातील डहाणू विधानसभा क्षेत्रात 327, विक्रमगडमध्ये 328, पालघरमध्ये 318, बोईसरमध्ये 338, नालासोपारामध्ये 449, तर वसई विधानसभा क्षेत्रात 327 मतदान केंद्र आहेत.
संवेदनशील मतदान केंद्र
यापैकी डहाणूमधील पतीलपाडा (63), बोईसरमधील बोईसर (34), धोंडीपूजा (85), खैरपाडा (294) तसेच वळीवमधील तीन केंद्र, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण 14 केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 9 उपविभागीय पोलीस अधिकारी, 18 पोलीस निरीक्षक, 182 पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार 602 पोलीस शिपाई, 495 नवीन भरती झालेले पोलीस, एक हजार 117 होमगार्ड आणि 46 नागरी सुरक्षा विभागाचे स्वयंसेवक याना तैनात करण्यात आले  आहेत. मतदानासाठी दोन हजार 737 मतदान केंद्र अध्यक्ष, 7 हजार 737 मतदान अधिकारी आणि दोन हजार 308 शिपाई यांचा फौजफाटा कार्यरत राहणार आहे.
पालघर येथे 31 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीला सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी 14 असे एकूण 84 मोजणी टेबल मांडण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबलवर सुपरवायझर, सहाय्यक आणि मायक्रो ऑब्झर्वर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे 600 अधिकारी - कर्मचारी कार्यरत असतील.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे




POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================








Thursday 24 May 2018

चार विधानपरिषदेच्या जागांसाठी येत्या 25 जून रोजी मतदान तर 28 ला निकाल

नाशिक विभाग शिक्षक, मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघांत 25 जूनला निवडणूक 


मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निर्वाचन आयोगाने गुरूवारी (24 मे) जाहीर केला. त्यानुसार या चार विधानपरिषदेच्या जागांसाठी येत्या 25 जून रोजी मतदान होईल तर 28 जून मतमोजणी होईल.या निवडणुकीसाठी आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली असून, 7 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येतील. तर 11 जूनपर्यंत आपले अर्ज मागे घेता येतील.नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून अपक्ष प्रा. डॉ. अपूर्व प्रशांत हिरे हे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करत आहेत. तर मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातून लोकभारती पक्षाचे व आता जेडीयूमध्ये गेलेले कपिल पाटील प्रतिनिधित्व करत आहेत.कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीतून आजच भाजपमध्ये गेलेले निरंजन डावखरे प्रतिनिधित्त्व करत आहेत तर मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघातून राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक रामचंद्र सावंत हे प्रतिनिधित्त्व करत आहेत. या चारही आमदारांची 7 जुलै 2018 रोजी मुदत आहे.

उन्हाळी सुट्टीमुळे पुढे ढकलली होती निवडणूक

राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची 8 जून रोजी निवडणूक होणार होती मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. मे महिन्याची उन्हाळी सुट्टी लक्षात घेत निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त मुंबई बाहेर गेलेले शिक्षक, पदवीधर मतदानापासून वंचित राहतील अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार भारत निर्वाचन आयोगाने या निवडणूका पुढे ढकलल्या होत्या.

खालील आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत संपुष्टात येत आहे.

1. प्रा. डॉ. अपूर्व हिरे (नाशिक विभाग शिक्षकअपक्ष
2. डॉ. दीपक सावंत (मुंबई पदवीधरशिवसेना
3. निरंजन डावखरे (कोकण पदवीधरराष्ट्रवादी
4. कपिल पाटील (मुंबई शिक्षकलोकभारती


उस्मानाबाद- बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर, 6 जूनला पुढील सुनावणी


21 मे रोजी विधान परिषदेच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक झाली होती. त्यापैकी पाच मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. पाच मतदारसंघात प्रत्येकी शिवसेना व भाजपने प्रत्येकी दोन-दोन जागा जिंकल्या तर नाशकात राष्ट्रवादीला धक्का बसला. परंतु कोकणात राष्‍ट्रवादीला यश मिळाले आहे. दुसरीकडे, उस्मानाबाद- बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक निकाल आणखी लांबणीवर पडले आहेत. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार आहे. परिणाम उस्मानाबाद-बीड- लातूर विधान परिषद निवडणुकीचे निकाल लांबणीवर पडणार आहेत.बीडमधील अपात्र 11 नगरसेवकांना मतदानाची मुभा देताना त्यांची मते निकालावर परिणामकारक ठरत असतील तर या निवडणुकीचा निकाल जाहीर करू नये. हा निकाल संबंधित याचिकेच्या अंतिम निकालास अधीन राहील, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्याविरोधात संबंधित नगरसेवकांनी पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कोर्टाला निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावर आज (गुरुवार) सुनावणी झाली. याचिकेवरील पुढील सुनावणी 6 जूनला होणार आहे. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील मतमोजणी स्थगित ठेवण्यात आली आहे.दरम्यान, या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे यांच्यात चुरशीची लढत झाली होती.

कोकण पदवीधरसाठी पक्ष आणि उमेदवार
भाजप : निरंजन डावखरे
राष्ट्रवादी काँग्रेस : नजीब मुल्ला
शिवसेना : संजय मोरे

एकूण मतदार : एक लाख चार हजार
ठाणे : 45 हजार
पालघर : 16 हजार
सिंधुदुर्ग : 5308
रत्नागिरी : 16 हजार
रायगड : 19 हजार




मुंबई पदवीधर मतदार संघ - पक्ष आणि उमेदवार
भाजप : अॅड. अमितकुमार मेहता
शिवसेना : विलास पोतनीस
लोकभारती : जालिंदर सरोदे
अपक्ष ( मनसे स्वाभिमानी पुरस्कृत) : राजू बंडगर
अपक्ष : डॉ. दीपक पवार

एकूण मतदार 70 हजार
मुंबई उपनगर : 52 हजार मतदार
शहर : 18 हजार मतदार




मुंबई शिक्षक मतदारसंघ पक्ष आणि उमेदवार
शिवसेना : शिवाजी शेंडगे
लोकभारती : कपिल पाटील
अपक्ष (भाजप पुरस्कृत) : अनिल देशमुख

एकूण मतदार 10 हजार 169
मुंबई उपनगर : 8273
मुंबई शहर : 1896


पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार

नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे
मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील
मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत
कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

विधानपरिषद निवडणूक- 2018 निकाल ; नाशिकमध्ये राष्ट्रवादीला धक्का तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा

विधान परिषद निवडणूक: नाशकात राष्ट्रवादीला धक्का तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा


शिवसेनेच्या विजयाला भुजबळांची मदत: नरेंद्र दराडे
नाशिक विधान परिषदेत शिवसेनेच्या विजयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांचीही मदत लाभली, असा खळबळजनक दावा विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला आहे.
विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक मतदार संघाच्या निवडणुकीत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे. या विजयात छगन भुजबळांनीही हातभार लावला, अशी  प्रतिक्रिया शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांच्या पुत्राने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे दराडे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, मनसे अशी महायुती असतानाही दराडे यांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर दराडे यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची ठरली. ‘शिवसेनेकडे २११ मतेच होती. तर विजयासाठी ४०० मतांची गरज होती. पण सर्वच पक्षातील नेतेमंडळी माझ्या मदतीला धावून आली. छगन भुजबळांनीही माझ्या विजयात हातभार लावला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या सर्व जागेचे निकाल जाहीर झाले आहेत. पाचपैकी दोन जागेवर शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली असून दोन जागेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. कोकणात राष्ट्रवादीला एका जागेवर यश मिळवण्यात यश आले. विधान परिषदेच्या जागेवरील निकालात  काँग्रेसच्या हात रिकामाच राहिला आहे. कारण काँग्रेसला पाचपैकी  एकाही जागेवर यश मिळालेले नाही. अमरावतीमध्ये काँग्रेसला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला.परभणी - हिंगोलीत शिवसेनेच्या विप्लव बजोरिया यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांना पराभूत केले. विप्लव बजोरिया यांना २५६ मते मिळाली. तर सुरेश देशमुख यांना २२१ मते पडली. परभणी-हिंगोली पाठोपाठ अमरावतीध्येही काँग्रेसला धक्का बसला. अमरावतीमध्ये भाजपच्या प्रविण पोटे यांनी मोठा विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अनिल माधोगढीया यांना पराभूत केले. याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी १७ मते मिळाली. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी ४१२ मते मिळवत विजय मिळवला. चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार रामदास अांटकर ५५० मिळवत विजय झाले. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना पराभूत केले. सराफ यांना ४६२ मते पडली.  कोकणातील रत्नागिरी - सिंधुदुर्ग जागेवर राष्ट्रावादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी सेनेच्या साबळेंना पराभूत केले.



विधानपरिषद निवडणूक 2018 संपूर्ण निकाल

अशी मिळाली मते-

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था

1) अमरावती- प्रविण पोटे (भाजप) विजयी

एकूण मतदान- 488
एकूण वैध मते- 475
एकूण बाद मते- 10
नोटा- 3 मते
प्रवीण पोटे (भाजप) यांना मते- 458 विजयी
अनिल माधोगडिया (काँग्रेस) - 17 मते (पराभव)

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था

2) परभणी-हिंगोली- विप्लव बाजोरिया (शिवसेना) विजयी

एकूणमतदान- 499
एकूणवैध मते- 481
एकूणबाद मते- 16
नोटा- 2 मते
विप्लव बाजोरिया यांना मते- 256
सुरेश देशमुख (काँग्रेस)- 221 मते
सुरेश नागरे (अपक्ष)- 2 मते
निकाल- विप्लव बाजोरिया 35 मतांनी विजयी.

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था

3) नाशिक- नरेंद्र दराडे (शिवसेना) विजयी

नरेंद्र दराडे- 412 मते
शिवाजी सहाणे- 219 मते
निकाल- शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे 193 मतांनी विजयी

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था

4) कोकण- अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)- विजयी

अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)- 620 मते
राजीव साबळे (शिवसेना) 306 मते
निकाल- कोकणात राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे 314 मतांनी विजयी

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था
5) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली- रामदास आंबटकर (भाजप) विजयी
रामदास आंबटकर (भाजप)- 550 मते
इंद्रकुमार सराफ (काँग्रेस)- 462 मते
निकाल- भाजपचे रामदास आंबटकर 88 मतांनी विजयी



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

अमरावतीत काँग्रेसवर नामुष्की! शंभरहून अधिक मतं भाजपला

विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यात काँग्रेसची मोठी नामुष्की झाली. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसच्या अनिल माधोगडिया यांचा दारुण पराभव झाला आहे. याठिकाणी भाजपच्या प्रविण पोटे यांनी ४५८ मते मिळवत विक्रमी विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे माधोगडियांना केवळ १७ मतं मिळाली. या मतदार संघात काँग्रेसचे १२८ मतदार होते. पण, १११ मतदारांनी  माधोगडियांना नापंसती दर्शवल्याचे चित्र निकालानंतर समोर आले आहे.या मतदारसंघात भाजपाचे २०० राष्ट्रवादी काँग्रेसचे ४०, शिवसेना २८, प्रहार, युवा स्वाभिमान आणि इतर पक्ष मिळून ४८९ मतदार होते. यातील ४८८ जणांनी मतदान केले होते. शिवसेना, प्रहार, युवा स्वाभिमान आणि काही अपक्षांनी मतदानापूर्वीच पोटे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच पोटेंचे पारडे जड होते. पण, १२८ मतदार असल्यामुळे काँग्रेसला एवढा मोठा पराभव अपेक्षित नव्हता. काँग्रेसच्या शंभरहून अधिक मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे भाजपचा विजय द्विगुणित झाला आहे.  
अमरावती, चंद्रपूरमध्ये काँग्रेसला दणका, भाजपाची बाजी
विधान परिषदेतील अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज संस्थेच्या मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. अमरावतीमध्ये भाजपाचे प्रवीण पोटे तर वर्धा येथे भाजपाचे रामदास आंबटकर विजयी झाले आहेत.चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या तीन जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत व महानगरपालिका सदस्यांनी निवडणुकीत मतदान केले होते. यामध्ये जिल्हा परिषदेचे एकूण १९४, महानगरपालिका ७१, नगर पालिका ४७५, नगर पंचायत ३१९ असे एकूण १०५९ मतदार होते. भाजप व काँग्रेस अशी थेट निवडणूक असली तरी नगरसेवकांच्या नाराजीचा फटका नेमका कोणत्या उमेदवाराला बसतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपाकडून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांपासून आमदार खासदारांपर्यंत सर्वच कामाला लागले होते. या निवडणुकीत रामदास आंबटकर यांवना ५२८ मते मिळाली. तर काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ यांना ४९१ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण १०१९ मते वैध ठरली. तर ३६ मते बाद ठरली. १ मतदाराने नोटाचा वापर केला. रामदास आंबटकर यांच्यासाठी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी शेवटच्या क्षणी सूत्रे हाती घेत रचलेले डावपेच निर्णायक ठरल्याचे दिसते.विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे विरुद्ध काँग्रेसचे अनिल माधोगडिया यांच्यात लढत होती. या मतदारसंघात भाजपाचे २००, काँग्रेसचे १२८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४०, शिवसेनेचे २८, प्रहार, युवा स्वाभिमान, इतर पक्ष आणि अपक्ष मिळून ४८९ मतदार होते. यातील ४८८ जणांनी मतदान केले आहे. शिवसेना, प्रहार, युवा स्वाभिमान आणि काही अपक्षांनी पोटे यांना पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड मानले जात होते. गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात पोटे यांनी बाजी मारली. अमरावतीमध्ये काँग्रेसची स्वत:ची १२८ मते होती. पण माधोगडिया यांना केवळ १७ मते मिळाली. या निवडणुकीत प्रवीण पोटे यांनी ४५८ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. या दोन्ही जागांवरील विजय भाजपासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.


रायगडात राष्ट्रवादी- भाजपाची छुपी युती, अनिकेत तटकरेंचा दणदणीत विजय

विधान परिषदेतील रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे विजयी झाले आहेत. भाजपाच्या छुप्या पाठिंब्यामुळे अनिकेत तटकरे यांना भरघोस मताधिक्याने विजय मिळवता आला असून त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा पराभव केला.रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातील तीन जिल्ह्यांमध्ये मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण ९४० मतदार होते. रायगड जिल्ह्यातील ४६९ मतदारांपकी ४६७ सदस्यांनी तर रत्नागिरी (२५९) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (२१२) सर्व सदस्यांनी मतदान केले होते. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत ९४० पैकी १२ मते बाद ठरली. तर दोन जण मतदानादरम्यान अनुपस्थित होते. उर्वरित मतांपैकी ६२० मते अनिकेत तटकरे यांना मिळाली असून राजीव साबळे यांना फक्त ३०६ मतांवर समाधान मानावे लागले. तटकरे हे ३१४ मतांनी विजयी झाले असून भाजपाच्या छुप्या पाठिंब्यामुळेच त्यांना हा विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस, शेकाप, स्वाभिमान पक्षानेही तटकरे यांच्या मुलाला पाठिंबा जाहीर केल्याने अनिकेत तटकरे यांचे पारडे जड होते.रायगडमध्ये राजकीय हिशेब चुकते करण्याचीही संधी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी साधली. राणेंच्या ‘स्वाभिमान’ने तटकरेंना पाठिंबा जाहीर केला. तर दुसरीकडे पालघरमधील वचपा काढण्यासाठी भाजपानेही राष्ट्रवादीशी छुपी करत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

विधान परिषद निवडणूक: परभणी- हिंगोलीत आघाडीला धक्का, शिवसेनेचे बाजोरिया विजयी

विधान परिषदेतील परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराभव केला आहे.विधान परिषदेच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात २१ मेला मतदान झाले होते. परभणी हिंगोलीत ५०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत विप्लव बाजोरिया यांना २५६ मते मिळाली. तर सुरेश देशमुख यांना २२१ मते मिळाली.सहा मतदारसंघातील मतदारांचे आकड्यांचे गणित पाहता, तीन जागांवर लढणाऱ्या शिवसेनेची कसोटी लागणार आहे. राज्यात २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय स्थिती बदलली असून भाजपाने स्थानिक राजकारणातही आघाडी घेतली आहे. विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड, नाशिक, अमरावती, परभणी-हिंगोली, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि लातूर-बीड-उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात २१ मे रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत स्थानिक संस्था मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांचे नगरसेवक हे मतदार होते. परभणी-हिंगोलीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने काँग्रेसची बाजू भक्कम होती.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी- भाजपा तोंडघशी

विधान परिषदेतील नाशिक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाच्या साथीने दराडे यांचा पराभवाचा डाव रचला होता. पण शेवटी दराडे यांनी बाजी मारत नाशिकमध्ये भगवा फडकावला.विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र दराडे, काँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे आणि भाजपाशी संबंधित अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांच्यात लढत होती. या निवडणुकीसाठी ६४४ मतदार होते. पक्षीय बलाबलाचा विचार करता शिवसेनेचे २०७, काँग्रेस आघाडी १७१, भाजपा (मित्रपक्ष) १७८, माकप १३, आणि इतर छोटे-मोठे पक्ष आणि अपक्ष मिळून ७५ मतदार होते.कोणत्याही पक्षाकडे पहिल्या पसंतीची मते गाठण्याइतके संख्याबळ नसल्याने उमेदवार न देणाऱ्या भाजपाच्या मतांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले होते. भाजपाने अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. परंतु तोवर पक्षात वेगवेगळे गट पडले होते. शिवसेनेने भाजपाची मते त्यांच्या बाजूने फिरवली होती. तसेच मालेगाव आणि नाशिकमध्ये काँग्रेस- शिवसेना आघाडी असून याचा फायदाही शिवसेनेला झाला.पालघरमधील घडामोडीनंतर भाजपाने हा निर्णय घेतला होता. या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे