विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी २७ मार्चला निवडणूक
विधानपरिषदेच्या पाच रिक्त झालेल्या जागांसाठी २७ मार्चला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १० ते १७ मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येईल. अर्जांची छाननी १८ मार्च रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २० मार्च पर्यंत असेल. रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २७ मार्च रोजी संध्याकाळी होईल आणि निकाल जाहीर केले जातील. राज्याच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर विधानसभेचे आमदार झालेल्या पाच जणांनी विधान परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. याच जागांसाठी निवडणूक होणार आहे.
आमश्या पाडवी, प्रविण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे पाच विधान परिषदेचे सदस्य आता विधानसभेचे आमदार झाले आहेत. या पाच जणांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. चार महिन्यापूर्वी राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या मध्ये भाजपच्या तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका आमदारासाठी ही निवडणूक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची लॉटरी लागणार याची उत्सुकता लागली आहे.
विधानसभा सदस्यामधून विधानपरिषदेसाठी निवडून द्यायच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. विधानसभेत महायुतीला प्रचंड बहुमत आहे. हे बहुमत लक्षात घेता पाचही जागा त्यांनाच मिळतील असे चित्र आहे. हे पाच सदस्य नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या पाच जणांचा कार्यकाळ वेगवेगळा असणार आहे. या आमदाराचा कार्यकाळ वेगवेगळा असणार असल्याने विरोधकांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जी अधिसूचना जारी केली आहे. त्या आधीसुचनेत या पाच जागांची निवडणूक एकाच दिवशी पण वेगवेगळी निवडणूक घ्यावी असे म्हटले आहे. याचा अर्थ प्रत्येक जागेसाठी जिंकण्यासाठीचा कोटा हा वेगवेगळा असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत विरोधकांना जिंकण्याची संधी नाही. दुसरीकडे ज्यांचा कार्यकाळ एकाच वेळेस समाप्त होतो. त्या तीन जागांची निवडणूक एकत्र व अन्य दोन जागांची निवडणूक वेगवेगळी झाली असली तरी जिंकण्यासाठीचा कोटा विरोधकाकडे नसणार आहे. त्यामुळे ही निवडणूक जवळपास बिनविरोध होणार असल्याचे लक्षात येते. अजित पवार गटाकडून ज्यांना आमदारकीची संधी मिळेल त्याचा कार्यकाळ सव्वा पाच वर्षाचा असणार आहे तर शिंदेसेनेकडून संधी मिळेल त्याचा कार्यकाळ सव्वातीन वर्षाचा असणार आहे. भाजपकडून ज्यांना आमदारकी मिळेल त्याचा कार्यकाळ 13 महिन्याचा असणार आहे. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्या फळीतील एक, दोन जणांना संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
=============================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
============================="महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book