Monday 6 March 2017

रायगड जिल्ह्यातील नगरपालिका निकाल 2017

रायगड जिल्ह्यातील नगरपालिका निकाल




राष्ट्रवादी- 4 काँग्रेस- 3 शेकाप, भाजप, सेना महायुती – 3 रायगड राष्ट्रवादी 10 पैकी 4 नगर परिषद राष्ट्रवादीला, काँग्रेसने 3, शेकाप सेना भाजपने 3 नगर परिषद ताब्यात
----------------------------------------------------
रायगड जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद निवडणूकीत 49 नगरसेवक शिवसेनेचे
रायगड जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणूकीचे निकाल जाहिर झाले असून, 9 पैकी सर्वाधिक 3 नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉग्रेसने बाजी मारली आहे, तर काँग्रेस व शिवसेने प्रत्येकी दोन नगराध्यक्षपदे काबीज केली आहेत. शेकाप आणि भाजपाने प्रत्येकी एक नगराध्यक्षपद मिळवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा येथे संतोष पोटफोडे, श्रीवर्धन येथे नरेंद्र भूसाणो आणि खोपोली येथे सुमन अवसरमल हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे पेण येथे प्रितम पाटील तर महाड येथे स्नेहल जगताप या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. शिवसेनेच्या माथेरान येथे प्रेरणा सावंत तर मुरुड-जंजीरा येथे स्नेहा पाटील या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. शेकापचे प्रशांत नाईक अलिबागमध्ये पून्हा नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत तर भाजपाच्या सायली म्हात्रे या उरण नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत.
170 नगरसेवक पदांपैकी सर्वाधिक 49 जागी शिवसेना
जिल्ह्यातील या नऊ नगरपरिषदांतील एकूण 170 नगरसेवक पदांपैकी सर्वाधिक 49 जागी शिवसेनेने यश संपादन करुन शिवसेना जिल्हात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 39 जागी यश संपादन करुन आपले जिल्ह्यात दूसरे स्थान राखले आहे. काँग्रेसने 29 तर शेकापने 25 जागी यशसंपादन करुन अनूक्रमे तिसरे व चौथे स्थान पटकावले आहे. भाजपाला 23 जागी विजय संपादन करुन जिल्ह्यात पाचव्या स्थानावर थांबावे लागले आहे.
नऊ पैकी सहा ठिकाणी महिला बनल्या थेट नगराध्यक्ष
नऊ पैकी सहा नगराध्यक्षपदी महिला विराजमान झाल्या आहेत. उरण मध्ये भाजपाच्या सायली म्हात्रे, खोपोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन अवसरमल, पेण मध्ये काँग्रेसच्या प्रितम पाटील, मुरुड-जजीरा येथे शिवसेनेच्या स्नेहा पाटील, महाडमध्ये काँग्रेसच्या स्नेहल जगताप तर माथेरान मध्ये शिवसेनेच्या प्रेरणा सावंत या महिला थेट नगराध्यक्ष बनल्या आहेत.
ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठेचा मतदारांनी मांडला लेखाजोगा
रायगड मधील या नऊ नगरपरिषदांच्यानिवडणूकांच्या निमीत्ताने विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्याची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांचा या राजकीय प्रतिष्ठेचा लेखाजोगा मतदारांनी आपल्या मतदानातून दाखवून दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी 9 पैकी सर्वाधिक 3 नगराध्यक्षपदे आणि 39 नगरसेवक निवडून आणून आपली राजकीय प्रतिष्ठा अबाधीत राखली आहे. त्याचे पुतणो संदिप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करुन रोह्यात सेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बनले होते, तेथे त्यांना पराभूत करुन आपले व्याही संतोष पोटफोडे यांना निवडून आणण्यात आ.सुनील तटकरे यांनी यश महत्वाचे मानले जात आहे. श्रीवर्धन मध्ये देखील नरेंद्र भूसाणो यांना पून्हा नगराध्यक्षपदी निवडून आणून श्रीवर्धन मधील आपली पक त्यांनी सिद्ध केली आहे. खोपोलीमध्ये भाजपाने मोठा जोर लावलेला असतानाही तेथेही राष्ट्रवादीच्या सुमन अवसरमल यांना निवडून आणण्यात त्याना यश आले आहे. अर्थात शेकाप व अन्य राजकीय पक्षांची त्यांना लाभलेली साथ देखील महत्वाची आहे.
शिवसेना नेते व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी 9 पैकी केवळ 2 नगराध्यक्षपदे तर सर्वाधिक 49 नदरसेव पदे काबीज करुन आपले वर्चस्व अबाधीत राखले आहे.रायगडचे पासकमंत्री भाजपा नेते प्रकाश मेहता, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी घेतलेल्या महनतीच्या प्रमाणात त्यांना यश लाभले नाही. एक नगराध्यक्ष आणि 23 नगरसेवक अशी मजल ते मारु शकले आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी पेण आणि माजी आमदार माणीकराव जगताप यांनी महाड काबिज करुन विरोधकांना चपराख दिली आहे. काँग्रेसने 29 नगरसेवकपदे काबीज केली आहेत. शेकापने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या अलिबाग नगरपरिषद शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी 1क्क् टक्के य़श संपादन करुन नगराध्यक्ष पदी शेकापचे प्रशांत नाईक यांच्यासह 17 पैकी 17 नगरसेवक शेकापचे असे यश संपादन करुन विरोधकांना डोके वर काढूच दिले नाही. 25 नगरसेवक देखील शेकापचे विजयी झाले आहेत.
--------------------------------------------------------------------
Chandrakant Bhujbal
Political Research And Analysis Bureau (PRAB) 
Mob:-9422323533



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.