नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर
नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2019 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
निवडणूक कार्यक्रम
· नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019
· नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019
· अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019
· अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020
· मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020
· मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नाव
धुळे जिल्हा परिषद
शिरपूर पंचायत समिती
सिंदखेडा पंचायत समिती
साक्री पंचायत समिती
धुळे पंचायत समिती
नंदुरबार जिल्हा परिषद
अक्कलकुवा पंचायत समिती
अक्राणी पंचायत समिती
तळोदा पंचायत समिती
शहादा पंचायत समिती
नंदुरबार पंचायत समिती
नवापूर पंचायत समिती
अकोला जिल्हा परिषद
तेल्हारा पंचायत समिती
अकोट पंचायत समिती
बाळापूर पंचायत समिती
अकोला पंचायत समिती
मुर्तीजापूर पंचायत समिती
पातूर पंचायत समिती
बार्शीटाकळी पंचायत समिती
वाशिम जिल्हा परिषद
मालेगाव पंचायत समिती
मंगळूरपीर पंचायत समिती
कारंजा पंचायत समिती
मानोरा पंचायत समिती
वाशिम पंचायत समिती
रिसोड पंचायत समिती
नागपूर जिल्हा परिषद
नरखेड पंचायत समिती
काटोल पंचायत समिती
कळमेश्वर पंचायत समिती
सावनेर पंचायत समिती
पारशिवनी पंचायत समिती
रामटेक पंचायत समिती
मौदा पंचायत समिती
कामटी पंचायत समिती
नागपूर (ग्रा) पंचायत समिती
हिंगणा पंचायत समिती
उमरेड पंचायत समिती
कुही पंचायत समिती
भिवापूर पंचायत समिती
नागपूर जिल्हा परिषदेची सात वर्षांनंतर निवडणूक

गेल्या दोन वर्षांपासून राजकीय आणि न्यायालयीन डावपेचात अडकलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. नागपूर जिल्हा सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१२ मध्ये तर अन्य जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबर २०१३ मध्ये पार पडल्या होत्या. पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये तर अन्य जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबर २०१८ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र काही जिल्हा परिषदांमध्ये ५२ टक्यांपेक्षा अधिक आरक्षण जात असल्याने खुल्या प्रवर्गावर अन्याय होत असल्याचा दावा करीत काहींनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर इतर मागास प्रवर्गास( ओबीसी) लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा निर्णय घेत एकूण आरक्षण ५२ टक्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र त्यावरही न्यायालयात वाद-विवाद झाले. या दरम्यान सरकारने ओबीसी समाजाची आकडेवारी आयोगाला उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र ही अकाडेवारी उपलब्ध करून देण्यात सरकारने असमर्थता दाखविल्यानंतर पूर्वीप्रमाणेच आरक्षण ठेवून निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आयोगाने आज निवडणुकीची घोषणा केली असून या जिल्ह्य़ांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. नागपूरमध्ये सत्ताधारी भाजपमधील वादातून निवडणुकीचा वाद रंगला होता. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी असताना जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्याची टाळत असल्याची टीका विरोधकांनी तेव्हा केली होती.
अकोला जिल्हा परिषदेत भारिप बहुजन महासंघापुढे आव्हान
अकोला जिल्हा परिषदेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाची सत्ता होती. पण अंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीला अकोला जिल्ह्य़ात अपयश आले. १९९९ नंतर प्रथमच आंबेडकर यांच्या पक्षाचा एकही आमदार जिल्ह्य़ात निवडून आलेला नाही. जिल्हा परिषदेची सत्ता कायम राखताना पक्षापुढे आव्हान असेल. वाशीम जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असून, भाजप आणि शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीचा फायदा उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. वाशिम जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. अध्यक्षपदी काँग्रेसच्या हर्षदा देशमुख, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे हे विराजमान होते. वाशिम जिल्हा परिषदेमध्ये सध्या काँग्रेसचे 17, राष्ट्रवादीचे 08, शिवसेनेचे 08, भाजपचे 06, अपक्ष 06 तर भारिपचे 03 सदस्य आहेत. 52 सदस्यांपैकी 27 महिला सदस्या आहेत. जिल्ह्यात 06 पंचायत समित्या आहेत. कारंजा लाड, मानोरा आणि वाशिम पंचायत समितींमध्ये काँग्रेसचा सभापती, तर मंगरुळपीर आणि मालेगावमध्ये सभापती राष्ट्रवादीचा आहे. 20 वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या रिसोड पंचायत समितीवर शिवसेनाचा सभापती आहे. नंदुरबार हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला होता. या जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्याचे काँग्रेसपुढे आव्हान असेल.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून निरीक्षकांची नियुक्ती
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून निरीक्षकांची नियुक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अकोला, वाशीम, धुळे, नंदूरबार आणि नागपूर या जिल्ह्यातील काँग्रेस नेते व पदाधिकार्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, प्रकाश सोनावणे, अभिजित सपकाळ, विनायक देशमुख आदी उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीबाबत आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी खालील निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
1. नागपूर - आ. सुभाष धोटे, शेखर शेंडे
2. अकोला - माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, रवींद्र दरेकर
3. वाशिम - तुकाराम रेंगे पाटील, प्रफुल्ल गुडधे पाटील
4. धुळे - डॉ. कल्याण काळे
5. नंदुरबार - विनायक देशमुख, ज्ञानेश्वर गायकवाड.
================================
नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक
राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नंदुरबारमध्ये अयशस्वी झाला. सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबारमध्ये बडय़ा राजकीय नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना रिंगणात उतरविल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घराणेशाहीला खतपाणी मिळाले आहे. वारसदारांना विजयी करण्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे कोणताही धोका न पत्करता सुरक्षित जागा आणि सोईनुसार पक्षाचे तिकीट घेण्याचे मनसुबे संबंधितांनी आखल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्व पक्षांनी ताकद लावली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नंदुरबारमध्ये अयशस्वी झाला. दुसरीकडे भाजप संपूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. निवडणुकीचे वैशिष्टय़े म्हणजे सर्वपक्षीय मोठय़ा नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये मंत्रिपद लाभलेले अॅड. के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता या तोरणमाळ गटातून जिल्हा परिषदेत नशीब अजमावत आहेत. अॅड. पाडवी यांच्याकडे जिल्ह्य़ातील काँग्रेसची धुरा आहे. त्यांची पत्नी निवडणूक रिंगणात असल्याने या लढतीकडे सर्वाचे लक्ष आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे धडगाव तालुकाप्रमुख गणेश पराडके उभे असल्याने ही लढत अधिक रंगतदार मानली जात आहे. तर काँग्रेसमधून विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये डेरेदाखल झालेले दीपक पाटील यांची पत्नी जयश्री पाटील या लोणखेडा गटातून रिंगणात आहेत. भाजपचे शहादा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचा मुलगा अभिजीत पाटील काँग्रेसकडून म्हसावद गटात डॉ. भगवान पाटील यांच्या विरोधात मैदानात आहे. काँग्रेसचे माजी मंत्री अॅड. पद्माकर वळवी यांची कन्या सीमा वळवी यादेखील या निवडणुकीतून राजकारणात प्रवेश करत आहे. त्या अमोणी गटातून उमेदवार आहेत. या ठिकाणी भाजप आणि सेनेची कडवी झुंज असणार आहे. अक्राणी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांचा मुलगाही नशीब अजमावत आहे. माजी आमदार दिलवरसिंग पाडवी यांचा मुलगा आणि भाजपचे नेते नागेश हे गंगापूर गटातून भाजपचे उमेदवार आहेत. नवापूर तालुक्यातही मोठय़ा राजकारण्यांचे कुटुंबीय निवडणुकीपासून दूर राहू शकले नाहीत. माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित पुन्हा जिल्हा परिषदेत आपले नशीब अजमावत आहेत. माजी मंत्री सुरुपसिंग नाईक आणि आमदार शिरीष नाईक यांचे बंधू मधुकर नाईक हेदेखील रिंगणात आहेत. घराणेशाहीच्या झटक्यातून नंदुरबार तालुक्याची सुटका झालेली नाही. शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार चंद्रकात रघुवंशी यांचे पुत्र राम हेदेखील राजकारणात प्रवेश करत आहेत. ते कोपर्ली गटातून रिंगणात असून त्यांच्या विरोधात भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र गिरासे उभे आहेत. भाजपचे जिल्ह्य़ातील नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या पत्नी आणि भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या मातोश्री कुमोदिनी गावित या कोठली गटातून पुन्हा रिंगणात आहेत. राष्ट्रवादीची जिल्ह्य़ाची धुरा सांभाळणारे शरद गावित यांची कन्या अर्चना गावित या थेट भाजपकडून नांदर्खे गटातून निवडणूक लढवीत आहेत. जिल्ह्य़ातील सर्व राजकीय नेत्यांचे कुटुंबीय निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात चुरस निर्माण करून नेत्यांना त्यांच्या गट, गणात अडकवून ठेवण्याचे तंत्र सर्वानी अवलंबले आहे. निवडणुकीनंतर नेते वारसदारांसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदांवर दावे करणार असतील तर इतरांनी राजकारण करण्याचा उपयोग काय, असाही प्रश्न अन्य उमेदवार उपस्थित करतात. जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपात घराणेशाहीचा वरचष्मा राहिल्याने पक्षाचे प्रामाणिक काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते बाजूला फेकले गेले आहेत. पक्षीय बलाबल- काँग्रेस-२९, राष्ट्रवादी- २४, भाजप-१, अपक्ष-१.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-