Friday 6 September 2019

वंचित आघाडीत फूट, एमआयएम स्वबळावर लढणार

वंचित आघाडीत फूट, नुकसान दोन्ही पक्षांचे

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपात सन्मान राखला नाही, असं सांगत एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडीत फूट पडली आहे. प्रकाश आंबेडकरांवर हेकेखोरपणाचा आरोप करत माजी आमदार लक्ष्मण माने हे या आधीच वंचित आघाडीतून बाहेर पडले होते. त्यापाठोपाठ आता असाच आरोप करत एमआयएमनेही वंचित आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वंचितसाठी हा फार मोठा फटका असल्याचं मानलं जात आहे. एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी वंचितकडे 98 जागांची मागणी केली होती. मात्र आंबेडकर यांनी तेवढ्या जागा देता येणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आंबेडकर आणि एमआयएमदरम्यान बेबनाव निर्माण झाल्याने अखेर इम्तियाज जलील यांनी वंचित आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. जागा वाटपावरून दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडतांना दिसून येत होते. दलित-मुस्लीम ऐक्य घडल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात असे सांगत लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी विशेष सभा घेतली होती. या सभेनंतर एमआयएने कधीही आक्रमक भूमिका घेतली नाही. उलट प्रकाश आंबेडकर हे आमचे नेते आहेत, ते जे सांगतील तसेच होईल, असे एमआयएमचे नेते सांगत होते.एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचे निर्णय होऊ शकला नव्हता. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत काडीमोड होण्याची शक्यता वर्तविली जात होती.एमआयएमकडून सतत बदलणारे विधान लक्षात घेऊन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाच्या दृष्टीने व्यूव्हरचना आखण्यास सुरुवात केल्याची माहिती होती. लोकसभा निवडणुकीत अकोला, सोलापूरमध्ये वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना एमआयएमकडून जशी मदत मिळायला हवी तशी मिळाली नाही, तेव्हापासून दोन्ही पक्षांतील संबंध ताणत चालले आहे. या दुराव्यात तेल ओतण्याचे काम अलीकडे एमआयएमकडून झाले. औरंगाबाद शहरातील तिन्ही मतदारसंघांवर एमआयएमने दावा ठोकला होता. त्यानंतर वंचितच्या स्थानिक नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त करीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय खा. असदोद्दीन ओवेसी, प्रकाश आंबेडकर दोघे घेतील. इतर कोणीही यात हस्तक्षेप करू नये, अशी प्रतिक्रिया दिली होती. एकीकडे जागा वाटपावरून दोन्ही पक्षांतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत असताना प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम मतदान एमआयएममुळे पडत नाही, मुस्लिम धर्मगुरू जे सांगतील तेच होते, असे विधान केले. औरंगाबाद शहरातील काही मुस्लिम धर्मगुरूंची भेटही त्यांनी घेतली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपात सन्मान राखला नाही, असं सांगत एमआयएमचे नेते व खासदार इम्तियाज जलील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे मात्र एमआयने प्रकाश आंबेडकर यांच्याकडे 98 जागा मागितल्या असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने खोटा ठरवला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात आलेल्या प्रसिध्द पत्रकात याचा खुलासा करण्यात आला आहे. जलील यांनी काढलेल्या पत्रकानंतर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा प्रसिध्द पत्रक काढले आहे. ज्यात म्हंटले आहे की, एमआयएम अध्यक्ष असुद्दिन ओवेसी यांनी आम्हाला 17 जागेंची यादी पाठवली होती. त्यावर त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे एमआयएमने 98 जागा मागितल्या असल्याच्या वृत्ताचे यातून खंडन करण्यात आला आहे. त्याच बरोबर युती तुटल्याचे संदेश किंवा कोणतेही पत्र आमच्याकडे आले नसल्याने, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील युती कायम असल्याचे आम्ही मानतो, असेही वंचित बहुजन आघाडीच्या वर्किंग कमिटीतर्फे रतन बनसोडे यांनी काढलेल्या पत्रकात म्हंटले आहे. अद्यापही एमआयएमसोबतची युती तुटली नसल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असलं तरी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितचा हा दावा फेटाळून लावला आहे. वंचितसोबतची युती तोडण्याचा इतका मोठा निर्णय मी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीने शिवाय घेऊ शकत नाही.  हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी  यांनीच घेतला असल्याचं जलील यांनी म्हंटले आहे. वंचितच्या निर्णयाची किती दिवस वाट पहायची आणि आठ जागा जर देत असतील का शांत बसायचे का? म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं जलील यांनी सांगितले. शिवाय आता तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि आम्ही आमची ताकद दाखवतो, असे आव्हानही वंचित बहुजन आघाडीला दिले आहे.

वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणूक 2019 मध्ये

20 हजार ते 1 लाख मते मिळालेले 66 विधानसभा मतदारसंघ

मतदारसंघ क्र.
मतदारसंघ नाव
वंचित मते
107
107 – औरंगाबाद मध्य
99450
109
109 – औरंगाबाद पूर्व
92347
286
286 – खानापूर
78024
108
108 – औरंगाबाद पश्चिम
71239
31
31 – अकोला पूर्व
61712
29
29 – बाळापूर
56981
111
111 – गंगापूर
56023
287
287 – तासगाव-कवठेमहाकाळ
54787
288
288 – जत
53083
32
32 – मुर्तिजापूर
52230
74
74 – चिमुर
50989
33
33 – रिसोड
44400
278
278 – हातकणंगले
42325
285
285 – पळूस खडेगाव
40169
28
28 – अकोट
39177
86
86 – नांदेड उत्तर
38795
26
26 – खामगाव
38732
281
281 – मिरज
38506
93
93 – कळमनुरी
38442
27
27 – जळगाव(जामोद)
36688
112
112 – विजापूर
35462
105
105 – कणाद
34263
72
72 – बल्लारपूर
33759
94
94 – हिंगोली
33473
92
92 – बसमत
33348
97
97 – गंगाखेड
32806
282
282 – सांगली
32780
24
24 – सिंदखेडराजा
30552
247
247 – मोहोळ
30145
252
252 – पंढरपूर
29323
84
84 – हदगाव
28670
34
34 – वाशिम
28351
251
251 – सोलापूर दक्षिण
28092
280
280 – शिरोळ
27913
250
250 – अक्कलकोट
27625
89
89 – नायगाव
27530
249
249 – सोलापूर शहर मध्य
27468
73
73 – ब्रम्हपुरी
27283
87
87 – नांदेड दक्षिण
27222
248
248 – सोलापूर शहर उत्तर
26870
98
98 – पाथरी
26829
90
90 – देगलूर
26339
95
95 – जिंतूर
26079
85
85 – भोकर
26020
173
173 – चेंबुर
25146
22
22 – बुलढाणा
24917
123
123 – नाशिक पूर्व
24776
70
70 – राजुरा
24480
126
126 – देओली
24459
30
30 – अकोला पश्चिम
23741
235
235 – लातूर शहर
22654
20
20 – मुक्ताईनगर
22636
82
82 – उमरखेड
22223
242
242 – उस्मानाबाद
22058
99
99 – परतूर
21700
23
23 – चिखली
21658
96
96 – परभणी
21335
88
88 – लोह
21184
100
100 – घनसावंगी
21085
208
208 – वडगाव शेरी
21084
71
71 – चंद्रपूर
21048
232
232 – केज
20908
125
125 – नाशिक पश्चिम
20784
21
21 – मलकापूर
20702
233
233 – परळी
20683
241
241 – तुळजापूर
20412
विधानसभा निवडणूक २०१४
एमआयएमने 24 जागा लढविल्या होत्या यामध्ये 2 जिंकल्या 4 लाख 89 हजार मते मिळाली होती तर भारिप बहुजन संघाने 70 जागा लढविल्या होत्या यामध्ये 1 जागा जिंकली होती तर एकूण 4 लाख 72 हजार मते मिळाली होती.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.