Monday 21 January 2019

गोपीनाथ मुंडेंच्या हत्येमागे ईव्हीएम घोटाळा! सायबर एक्सपर्टचा दावा!

गोपीनाथ मुंडेंच्या हत्येमागे ईव्हीएम घोटाळा! सायबर एक्सपर्टचा दावा!

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टने केला आहे. त्याने पत्रकार परिषद घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोपही त्याने केला आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना होती. तसेच फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांनाही इव्हीएम घोटाळा कसा करतात हे ठाऊक आहे असे या सय्यद शुजाने म्हटले आहे. फक्त भाजपाच नाही तर काँग्रेस, बसपा, सपा, यांच्यासह डझनभर पक्षांना इव्हीएममध्ये घोळ कसा करायचा हे माहित होतं असा दावा लंडनच्या सायबर एक्स्पर्टने केल आहे. सय्यद शुजा असे या सायबर एक्सपर्टचे नाव आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना होती. तसेच फक्त भाजपाच नाही तर इतर पक्षांनाही इव्हीएम घोटाळा कसा करतात हे ठाऊक आहे असे या सय्यद शुजाने म्हटले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुका या इव्हीएममध्ये घोळ करुन त्यांचे निकाल नियोजित करण्यात आले होते. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांच्या निवडणुकाही मॅनेज करण्यात आल्या होत्या असाही आरोप सय्यद शुजा या सायबर एक्स्पर्टकेला आहे. लंडनमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत व्हिडिओ लिंकद्वारे सय्यद शुजा हा सायबर एक्स्पर्ट सहभागी झाला असून त्याने भाजपावर आणि इतर पक्षांवर इव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला आहे.शुजावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता, त्यामुळे तो गुप्त ठिकाणावरून व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात आहे. याआधीही सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले होते असंही त्यानं म्हटले आहे.दिल्लीतल्या 2015 मधल्या निवडणुकांमध्येही घोळ होणार होता, परंतु वेळीच दुर्घटना रोखली आणि आपने 70 पैकी 67 जागा जिंकल्या अन्यथा भाजपने निवडणुका जिंकल्या असत्या असे शुजाने म्हटले आहे. ईव्हीएम डिझाईन केलेल्या टीममध्ये आपण होतो असा शुजाचा दावा आहे. ही मशिन कशी हॅक करता येतील हे आपण दाखवू शकतो असेही त्याने म्हटले आहे. सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले होते असंही त्यानं म्हटलं आहे. शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा 2009 ते 2014 या कालावधीत कर्मचारी होता असं त्याने सांगितले आहे. त्यानं सांगितलं की निवडणूक आयोग तसेच राजकीय पक्षांनाही बोलावण्यात आले होते. परंतु कपिल सिब्बल वगळता अन्य कुणी गेलेले नाही. ही पत्रकार परिषद लंडनमध्ये सुरू असून शुजावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता, त्यामुळे तो गुप्त ठिकाणावरून व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात आहे. फक्त भाजपच नाही तर काँग्रेस, बसपा, सप, यांच्यासह डझनभर पक्षांना इव्हीएममध्ये घोळ कसा करायचा हे माहित होते असा दावाही त्याने केला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुका या इव्हीएममध्ये घोळ करुन त्यांचे निकाल नियोजित करण्यात आले होते. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांच्या निवडणुकाही मॅनेज करण्यात आल्या होत्या असाही आरोप सय्यद शुजा या सायबर एक्स्पर्टकेला आहे. लंडनमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत व्हिडिओ लिंकद्वारे सय्यद शुजा हा सायबर एक्स्पर्ट सहभागी झाला असून त्याने भाजपवर आणि इतर पक्षांवर इव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाचे अधिकारी ही पत्रकार परिषद तसेच प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक पहात असून लवकरच आयोग आपले म्हणणे मांडणार आहे. दरम्यान, ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा चुकीचा असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून त्याच्याशी छेडछाड केली जाऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगाने परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. ईव्हीएम हॅकिंगबाबत काँग्रेस अपप्रचार असल्याचा पलटवार भाजपने केला आहे. गोपीनाथ मुंडे मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी सर्वपक्षीयांनी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली असून ईव्हीएमवर बंदी आणण्याची वेळ आल्याचेही राष्ट्रवादीतर्फे म्हंटले आहे.हॅकर्सने केलेल्या कथित दाव्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी काही दिवसांचाच कालावधी राहिला असल्याने ईव्हीएमवरून पुन्हा एकदा रणकंदन माजण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने EVM हॅकरचे हे दावे फेटाळून लावले आहेत. लंडनमधील एका कार्यक्रमात भारतातील EVM हॅक होऊ शकतात, असा दावा केला जात आहे. मात्र निवडणूक आयोग या प्रकरणात पडू इच्छित नाही. भारतातील EVM सुरक्षित आहेत, त्यांमध्ये छेडछाड होऊ शकत नाही, या दाव्यावर आम्ही कायम आहोत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

सईद शूजा कोण आहे?

[?]   सय्यद शुजा हा 2009 ते 2014 दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये कार्यरत होता.
[?]   निवडणूक आयोग तसेच राजकीय पक्षांनाही लंडनमध्ये आयोजित एका हॅकेथॉनमध्ये बोलावण्यात आले होते.
[?]   विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्या व्यतिरिक्त लंडनमध्ये कोणीही उपस्थित नव्हते.
[?]  दरम्यान, सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर चार दिवसांपूर्वी हल्ले झाले होते, त्यामुळे तो गुप्त ठिकाणावरून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात आहे.
[?]   ईव्हीएम डिझाईन केलेल्या टीममध्ये आपण होतो, असा दावा शुजा याने केला आहे.
[?]   ईव्हीएम मशीन हॅक कशी करता येते, हे आपण दाखवू शकतो, असे शुजाने म्हटले आहे.
[?]   भारतातील ईव्हीएम बनविणारी Electronics Corporation of India Limited (ECIL)चा कर्मचारी होता.
[?]  मूळचा हैदराबाद येथील रहिवाशी. 2014 पासून अमेरिकेत राजकीय आश्रय घेतला आहे.
[?]  सायबर एक्स्पर्ट सईद शूजा असे या एक्स्पर्टचे नाव आहे.
[?]  सायबर तज्ज्ञ सय्यद शुजा याने लंडनमधून स्काईपद्वारे हा संवाद साधला होता.
[?]  या व्हीडीओमध्ये  त्याने फेस मास्क परिधान केले होते.
[?]  शुजाच्या काही सहकाऱ्यांचा खून झाला. त्यामुळे त्याला भारतात असुरक्षित वाटायला लागले. या कारणाने २०१४ साली त्याने भारत सोडला.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण-

[?]  ईव्हीएमला हॅक केले जाऊ शकत नाही.
[?]  ईव्हीएमपासून दूर राहून त्यात छेडाछेडा केली जाऊ शकत नाही.
[?]  त्यात ब्ल्यू-टुथ किंवा वाय-फायद्वारे ईव्हीएमचा अक्सेस मिळेल असे कोणताही नेटवर्किंग उपकरण नाही.
[?]  ईव्हीएममध्ये छेडछाड करायची असेल, तर मशीनच खोलावी लागते आणि मशीन खोलण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी लागते.

सईद शूजा याने केलेले काही महत्त्वाचे खुलासे - 

[?]  इंडियन जर्नॅलिस्ट असोसिएशन ऑफ युरोप आणि फॉरेन प्रेस असोसिएशन लंडन यांनी ही परिषद आयोजित केली होती यामध्ये ईव्हीएम हॅकिंगबाबत दावा 
[?]  काही दिवसांपूर्वी आपल्यावर भाडोत्री व्यक्तींनी हल्ला केला होता
[?]  ECIL याकंपनीने 2014च्या निवडणुकीसाठी EVMs बनवले होते
[?]  2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होते, त्यामुळेच त्यांची हत्या झाली
[?]  लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केले होते. 14 लोकांच्या टीमने हे काम केले होते. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा 
[?]  ईव्हीएम हॅक करण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशनने भाजपला 'लो फ्रेक्विनसी सिंग्नल' मिळवून दिले माझ्या सदस्यालाही मारले - मृत्यू प्रकरणाला जातीय रंग देण्यात आला 
[?]  आमच्या तज्ज्ञांनी भाजपचा डाव हाणून पाडला नसता तर राजस्थान, छतीसगड, मध्यप्रदेश भाजपचा विजय झाला असता
[?]  दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या सांगण्यावरुन हॅक केले असल्याचाही दावा
[?]  ईव्हीएममध्ये घोटाळा होऊ शकतो, असे आम आदमी पक्षाला माहीत होते
[?]  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ईव्हीएममध्ये घोटाळा करण्यात आला होता. या निवडणुका पारदर्शक नव्हत्या. त्यामुळे काँग्रेसचा २०१ जागांवर पराभव झाला होता.
[?]  डेटा ट्रान्समीट करण्याचे नेटवर्क रिलायन्सकडे आहे. त्याचा भाजपला फायदा झाला.
[?]  ईव्हीएम हॅक करण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशनने भाजपला 'लो फ्रेक्विनसी सिंग्नल' मिळवून दिले
[?]  ईव्हीएममध्ये घोटाळा झाला याची जाणीव इतर कर्मचाऱ्यांना नव्हती. डेटा एन्ट्री करत असल्याचे त्यांना वाटत होते
[?]  गौरी लंकेश या ज्येष्ठ महिला पत्रकाराला ईव्हीएम घोटाळ्याबद्दल माहिती होती. त्यांनी या घोटाळ्याची माहिती प्रकाशीत करण्याची तयारीही दर्शविली होती. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. 
[?]  रिलायन्स जियो या कंपनीने भारतीय जनता पक्षाला ईव्हीएम हॅक करण्यासाठी मदत केली. यासाठी त्यांनी कमी वारंवारतेचे तरंग (फ्रिक्वेन्सी) पुरवले असा खळबळजनक दावा शुजाने केला आहे. पण, त्याच्या या दाव्याची पुष्टी करेल असा कोणताही पुरावा त्याने दिला नाही. 
[?]  भारतीय जनता पक्षासोबतच समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस देखील ईव्हीएम हॅक करण्याच्या कारस्थानात गुंतल्याचे त्याने म्हटले आहे.
[?]  ब्ल्यूटूथने ईव्हीएम हॅक करता येत नाही.
[?]  ग्रॅफाइटवर आधारित ट्रान्समिटरने हॅकिंग शक्य असते. या ट्रान्समिटरच्या मदतीने २०१४ मध्ये घोटाळे करण्यात आले.
[?]  भाजपने मिलिट्री ग्रेडफ्रिक्वेन्सी ट्रान्समिट मॉड्यूलर वापरले
[?]  भाजपने कमी फ्रिक्वेन्सीच्या मशीनच्या चाचणीचा प्रयत्न केला. 
[?]  ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपानंतर भाजपने तज्ज्ञांनाही हॅक करता न येणाऱ्या ईव्हीएमचा वापर केला होता.
[?]  रिलायन्स जिओने लो फ्रिक्वेसी सिग्नल हॅकसाठी मदत केली. जिओकडे डाटा ट्रान्समिट करण्यासाठी नेटवर्क आहे. त्याचाच लाभ भाजपने घेतला.

माझ्या सहका-यालाही मारले-सईद शूजा

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी माझ्या कर्मचाऱ्याला या घोटाळ्याबाबत एप्रिल २०१४ मध्ये माहिती समजली होती. हैदराबाद येथे भाजपच्या नेत्याबरोबर मी आणि माझ्या सहकाऱ्याची बैठक होती. यावेळी आमच्यावर गोळीबार झाला. त्यात मी थोडक्यात बचावलो तर माझ्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाला जातीय रंग देण्यात आला. 

शुजा यांना विचारण्यात आलेले काही प्रश्न :

प्रश्न : अमेरिका आणि काँगो या देशांत EVM कोणत्याही तक्रारींशिवाय कसे वापरले जात आहेत?
शुजा - मी अमेरिकेतील EVMचा अभ्यास केलेला नाही. तशी संधी मला मिळालेली नसल्याने मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही. काँगोतील EVM बद्दल मला काही माहिती नाही.

प्रश्न : गेल्या वर्षी भारतीय निवडणूक आयोगाने EVM हॅक करून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. तुम्ही ते आव्हान का स्वीकारलं नाही?
शुजा  मी अमेरिकेत आश्रय घेतला आहे. जर मी भारतात आलो असतो तर माझ्या सुरक्षेच्या काय शक्यता होत्या? जे हे आव्हान स्वीकारू इच्छित होते त्यांना मी पर्याय देऊ केला होता, पण त्यांनी माघार घेतली.

प्रश्न : तुम्ही आताच या विषयावर का बोलत आहात. आताच्या परिषदेतून काय साध्य होईल, असं तुम्हाला वाटतं?
शुजा मी कशाचीही अपेक्षा करत नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर काहीही होणार नाही. EVM राहणारच आहेत आणि जे सुरू आहे ते सुरूच राहणार, काहीही बदलणार नाही. सर्वांनी मतपत्रिकांची मागणी केली तरीही काही होणार नाही. कारण भाजपकडे मतं विकत घेता येतील इतका पैसा आहे. लोकांना काय हवं ते लोकांनी ठरवायचं आहे. लोकांनी निवडून न दिलेलं आणि अफरातफर करून सत्तेत आलेलं सरकार नंतर सगळ्याच गोष्टींत अफरातफर करतं आणि ते तसंच करत राहणार आणि त्याबद्दल कुणी काही करूही शकत नाही.

प्रश्न : तुमच्याकडे काय पर्याय आहे?
शुजा छेडछाड करता येणार नाहीत, असे EVM भारतात आहेत. पण त्याचा वापर भारत करणार नाही. कसलीही छेडछाड करता येणार नाही अशा EVMचं डिझाईन मी दिलेलं आहे. किचकट रचना असलेलं हे मशिन वायरलेसपद्धतीने कनेक्ट होत नाही किंवा त्यातून कोणतंही ट्रान्समिशन करता येत नाही.

संयोजक पत्रकार खासदार कपिल सिब्बल यांचे मित्र


शुजा यांनी जे दावे केले आहेत त्याची पडताळणी करावी लागेल, त्यानंतरच यावर काही भाष्य करता येईल. असे काँग्रेस नेते आणि खासदार कपिल सिब्बल यांनी म्हंटले आहे. संयोजकांतील एक पत्रकार माझे मित्र आहेत. त्यांनीच मला आणि इतर काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आंमत्रित केले होते. शुजा यांनी काय दावे केले आहेत ते आम्ही ऐकावेत अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणून पत्रकार परिषदेला 
उपस्थिती होती.

ईव्हीएम हॅकिंगचा आरोपाची चौकशी करा- खासदार सुप्रियाताई सुळे 

ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्टने केला. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पारदर्शक चौकशीची गरज व्यक्त केली आहे. तर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात रॉ कडून चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. सीबीआयवर आमचा विश्वास नसून सरकारने सीबीआयचे कंबरडे मोडल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. सीबीआयवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची रॉ कडून चौकशी व्हावी, तसंच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. ईव्हीएम हॅकिंगची घटना धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाकडे अनेक वर्षांपासून आम्ही ईव्हीएम बंदीची मागणी करत आहे. अनेक विकसित देशात बॅलेटवर मतदान होतं, मग आपणच का ईव्हीएमचा आग्रह धरतोय असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोग ईव्हीएम हॅकिंगचा आरोप फेटाळून लावत असले तरी चौकशी झाली पाहिजे. मुंडे साहेब लोकनेते होते, त्यामुळे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर येत्या निवडणुकीत मतदान हे मतपत्रिकेवर व्हावे, ईव्हीएमबाबत लोकशाहीला धक्का देणारा आरोप झाला आहे. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे. तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत रॉ कडून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळें यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रिया देताना केली आहे.

Evm hacking: हॅकरची पत्रकार परिषद काँग्रेस प्रायोजितच: भाजपा

भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासंदर्भात हॅकर सय्यद शुजा याने केलेल्या दाव्यानंतर काँग्रेस- भाजपात जुंपली आहे. हॅकरची पत्रकार परिषद आशीष रे यांनी आयोजित केली होती, आशीष रे हे काँग्रेसच्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ या दैनिकासाठी स्तंभलेखन करतात आणि त्यांनी काही स्तभांमधून राहुल गांधींचे भरभरुन कौतुक केले होते, याकडे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले आहे. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा सवाल उपस्थित करत ही पत्रकार परिषद काँग्रेस आणि राहुल गांधी प्रायोजितच होती, असा आरोप भाजपाने केला आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांच्या (ईव्हीएम) साहाय्याने ‘घोटाळा’ करण्यात आल्याचा दावा अमेरिकेत राजकीय आश्रय मागितलेला भारतीय हॅकर सय्यद शुजाने सोमवारी केला होता. ईव्हीएममध्ये हेराफेरी करता येऊ शकते, असा दावा त्याने केला होता. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बलही उपस्थित होते.  या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीका केली. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवासाठी काँग्रेस आत्तापासूनच कारणं शोधत आहेत. काँग्रेस पक्ष हा सुनियोजितपणे भारताचे संविधान आणि देशाच्या सर्वोच्च संस्थांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. २०१४ मध्ये देशात यूपीएची सत्ता होती, याकडेही रविशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले आहे.

हॅकर हा शेवटी चोरच, सय्यद शुजावर विश्वास नाही

हॅकर सय्यद शुजाने केला असतानाच या वृत्तावर आता प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हॅकर हा शेवटी चोरच असतो, त्यामुळे त्याच्यावर विश्वास नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले असून गेली साडेचार वर्षे हा हॅकर कुठे होता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूसंदर्भात त्याने हे विधान केले होते. या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाची रॉ मार्फत चौकशी करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. या घडामोडी घडत असतानाच प्रकाश महाजन यांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ‘गोपीनाथ मुंडे यांच्यावर श्रद्धा असणारे लाखो लोक आहे. शुजाच्या विधानांमध्ये किती तथ्य आहे, हा देखील प्रश्नच आहे’, असे प्रकाश महाजनांनी म्हटले आहे. गोपीनाथ मुंडे यांचा थेट जनतेशी संबंध होता, प्रत्येक मतदारसंघाची त्यांना अचूक माहिती होती. त्यामुळे त्यांना ईव्हीएमची कधीही चिंता वाटली नसेल, असे त्यांनी म्हटले आहे. गैरमार्गाने युद्ध जिंकणे ही गोपीनाथ मुंडे यांची विचारधारा नव्हती. त्यांचा मतदारांवर विश्वास होता. १९८५ मधील एका निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा फार कमी मतांनी पराभव झाला होता. त्या काळी मतपत्रिका होती. पण मुंडे यांनी मतदानाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवला आणि मोठ्या मनाने स्वत:चा पराभव स्वीकारला होता, अशी आठवणही प्रकाश महाजन यांनी सांगितली. गोपीनाथ मुंडे हे राजकारणातील शिखर गाठत असताना धनंजय मुंडे यांनीच त्यांच्यावर टीका केली होती. अशी टीका गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधकांनीही कधी केली नव्हती. आता तेच धनंजय मुंडे पुळका दाखवत आहेत. आता गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूवरुन राजकीय फायदा घेतला जात आहे, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.