Friday 5 October 2018

समाविष्ट ११ गावांसाठी एकाच प्रभागाचा प्रस्ताव; आज प्रभाग रचना जाहीर होणार; २ नगरसेवकांची भर

फुरसुंगी-लोहगाव या नावे पुणे महापालिकेचा ४२ वा प्रभाग ; प्रभाग रचनेचा होणार प्रताप !



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================


पुणे महापालिकेचा नगरसेवकांची संख्या १६४ होणार


फुरसुंगी-लोहगाव या नावे पुणे महापालिकेच्या ४२ व्या प्रभाग रचनेचा प्रताप होणार आहे. नव्याने समाविष्ट ११ गावांसाठी एकाच प्रभागाचा प्रस्ताव असून आज प्रभाग रचना जाहीर होणार आहे. यानुसार नव्याने २ नगरसेवकांची भर पडून पुणे महापालिकेचा नगरसेवकांची संख्या आता १६४ होणार आहे. या विचित्र प्रभाग रचनेवर १२ ऑक्टोबर पर्यंत हरकती/सूचना मागवण्यात येणार असून १७ ऑक्टोबरला सुनावणी घेण्यात येणार आहे तर अंतिम प्रभाग रचना 20 ऑक्टोबर २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी 4 ऑक्टोबर २०१७ रोजी ११ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली या भागात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र प्रभाग रचना करण्याच्या निकषाप्रमाणे कोणताही समाविष्ट भाग रचनेच्या संकल्पनेत बसत नाही. सलग क्षेत्रफळ नसल्याने भौगोलिकदृष्ट्या न्यायास पात्र ठरत नाही. निवडणुका झाल्यातरी चारही भागांमध्ये विखुरलेल्या प्रस्तावित प्रभागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे. तरीही समाविष्ट गावांच्या भागासाठी 1 नव्याने प्रभाग अस्तित्वात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार या समाविष्ट भागाची लोकसंख्या २ लाख ३९ हजार नमूद करण्यात आली प्रभाग रचना नियमाप्रमाणे नगसेवकांची संख्या २ ने वाढत आहे. २ नगरसेवकांचा पुणे महापालिकेतील ४२ प्रभाग असणार आहे. या प्रभागाची रचना सर्वाधिक विचित्र असणार आहे. अशी रचना महाराष्ट्र राज्याच्याच काय देशाच्या पातळीवर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत आढळून येणार नाही. पुणे शहरातील चारही दिशांना असणाऱ्या भाग मिळून अफलातून प्रभाग रचना केली जाणार असून त्याची प्रारूप रचना आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभाग रचनेच्या निकषानुसार व नियमानुसार अशी रचना न्यायालयीन प्रक्रीयेत कितपत टीकेल हे आगामी काळात समजेल.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

महापालिका हद्दीत चौतीस गावांचा समावेश करण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून रखडली होती. या पार्श्वभूमीवर या गावांच्या समावेशाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीरंग चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी अकरा गावे महापालिका हद्दीत घेणार असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने न्यायालयात सादर केले होते. ‘उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पूर्णत: महापालिका हद्दीत घेण्यात आली आहेत. लोहगांव, साडेसतरा नळी, केशवनगर, धायरी, आंबेगाव, बावधन, शिवणे, उत्तमनगर, उंड्री ही गावे महापालिका हद्दीमध्ये अंशत: समाविष्ट करण्यात आली होती.उर्वरित तेवीस गावांचा समावेश करताना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, घनकचरा व्यवस्थापन, प्रस्तावित वर्तुळाकार मार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांचा विचार करण्यात येईल आणि तीन वर्षांत त्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येईल,’ असे राज्य शासनाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते.उरुळी देवाची, फुरसुंगी, लोहगांव (उर्वरित), शिवणे (उत्तमनगर), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (साडेसतरानळी), शिवणे, आंबेगांव (खुर्द), आंबेगाव (बुद्रुक), उंड्री आणि धायरी या गावांचा समावेश करण्यात आला होता. तर अजून तेवीस गावांच्या समावेशाची प्रतीक्षा आहे. महापालिका हद्दीत गावांचा समावेश करावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर आणि जगदीश मुळीक आग्रही होते. पालकमंत्री गिरीश बापट यांचा मात्र गावांच्या समावेशाला विरोध होता. त्यामुळे ही गावे टप्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातील काही गावे या आमदारांच्या मतदारसंघात असल्यामुळे त्यांची आग्रही भूमिका होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गावांच्या समावेशाला तत्त्वत: मंजुरी दिली होती. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सादर केल्यामुळे अकरा गावे महापालिका हद्दीत समावेश करण्याची अधिसूचना काढण्यात आली. मात्र उर्वरित तेवीस गावांच्या समावेशासाठी किमान तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. उर्वरित तेवीस गावांच्या समावेश केल्यानंतर पुन्हा सुधारीत प्रभाग रचना करावी लागणार आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रभाग संख्येत वाढ होऊन नगरसेवकांची संख्या देखील १० ते 15 ने वाढ होईल. महापालिकेचे क्षेत्रफळाच्या आकारात मोठ्या प्रमाणत वाढ होऊन महापालिकेचे देखील विभाजन सरकारच्या विचारात आहे. आगामी काळात या बदलाचा परिणाम राजकारणावर निश्चितच होईल.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.